Wednesday, December 05, 2018

बुध्दिचे औदार्य

आत्मसाक्षात्कार हा केवळ परिपक्व बुध्दिमंत योग्यांनाच प्राप्त होऊ शकतो

अध्यात्मिक साधना करणारे भक्त व योगी यांना आत्मसाक्षात्काराचि प्रचंड ओढ लागलेली असते. आत्मा व परमात्मा म्हणजे नेमके काय हे प्रत्यक्षात स्वतः अनुभवण्याचि प्रत्येकाचि तळमळ असते. परंतु परिपक्व झालेले बुध्दिमान योगीच फक्त आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतात.

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ गिता १५:११॥

आत्मसाक्षात्कारा बाबत अपरिपक्व संधिसाधुंनी बराच गैरसमज करून ठेवला आहे. ज्यांना आत्मज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाहि अशांनीच त्याचे प्रचंड प्रदर्शन मांडलेले आहे. या प्रदर्शनांमुळे बहुतेक साधकांचि दिशाभुल होत असते व ते चुकिच्या संकल्पनांच्या नादि लागतात. स्वतः अधिक मेहनत न घेता बाजारू गुरूंच्या मदतीने शॉर्टकट शोधत असतात. संसार असो वा अध्यात्म असो कष्ट, मेहनत हे करावेच लागतात. संसारामध्ये शॉर्टकटचि सवय असणाऱ्यांना अध्यात्मामध्येहि शॉर्टकट हवा असतो. संसारामधिल हव्यास, वाईट सवयी वा व्यसने हि अध्यात्मामध्ये अडथळे ठरत असतात. म्हणुन ‘आधि संसार करावा नेटका’ याचा अर्थ निट लक्षात घ्यायला हवा.

परिपक्व होणे म्हणजे जे आपणास साध्य करावयाचे आहे त्यासाठिचि जि शरीर, मन, बुध्दिचि साधने आहेत त्यांना परिपक्व करणे होय. यम, नियम, आसन… या अष्टांग योगाने साधनशुचिता साध्य करता येते. या साधन शुचितेच्या आपल्या साधनांवर होणाऱ्या परिणामांचा अंदाज आपणास अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह या क्रमाक्रमाने प्राप्त होणाऱ्या आपल्या मधिल मानसिक स्थित्यंतरावरून आपणास काढता येतो. आपण साधनेच्या कोणत्या टप्प्यावर आहोत व अजुन किती टप्पे पार करावयाचे आहेत याचिहि कल्पना यांवरून येते. परिपक्वतेचि लक्षणे ओळखण्याचि अजुन एक खुण म्हणजे साधकाचि तामसीक, राजसीक, सात्वीक अवस्थांमधिल संक्रमणे व त्याहि पलीकडिल त्रिगुणातीत अवस्थेमधिल स्थीर होणे हे होय. साधक परिपक्व होत असताना त्याच्या बाह्य राहणिमानावरहि त्याचा परिणाम होताना दिसत असतो. ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम हे त्याच्या जिवनामध्ये सहज घडत असलेले दिसुन येतात. अध्यात्मिक मार्गदर्शक निवडताना त्याचि साधनशुचिता तपासुन नंतरच त्याच्यावर विश्वास ठेवावा, संभाषण चतुरांपासुन नेहमी सावध रहावे.

साधनशुचितेमुळे साधकाचे शरीर, मन व बुध्दि परिपक्व होते व पुर्ण परिपक्व अवस्थेमध्ये विवेक बुध्दि अतिशय तल्लख होते. विवेकबुध्दिने त्याचे असत्य ज्ञान नाहिसे होते व वेदांच्या पलीकडिल, वेदांतामध्येहि वर्णन केलेले नसलेली, नेती नेती अवस्था प्राप्त होते. अशा आत्मसाक्षात्काराचे दर्शन झालेल्या अवस्थेमध्ये सांगण्यासारखे, बोलण्यासारखे वा लिहिण्यासारखे काहिहि शिल्लक रहात नाहि, प्रदर्शन पुर्णपणे बंद होते. जिथे बाह्य प्रदर्शन आहे तिथे अंतः दर्शन नाहि हि खुणगाठ नेहमी लक्षात ठेवावी.

Tuesday, October 30, 2018

मी विचार करतो म्हणून मी आहे

रेने डेकार्टेस (१५९६ - १६५०) हे एक जगप्रसिध्द फ्रेंच तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांना तर्क आणि विज्ञान यांच्या पाश्चात्य विचारांच्या मूलभूत विकासाचे एक तत्वचिंतक म्हणून श्रेय दिले जाते.

त्यांचे तत्त्वज्ञान हे मानवीय अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांच्या संकल्पनांशी बांधले गेले आहे. जे काही आपण अनुभवतो किंवा जे काहि आपण समजतो ते सत्य असतेच असे नाही.

डेकार्ट यांच्या मते शरीर व मन हे एक नसुन स्वतंत्र व
वेगवेगळे आहेत. परंतु मनाच्या अस्तित्वा ईतके शरिराच्या अस्तीत्वास ते किंमत देत नसत. याचे कारण आपले मन हे विश्वामधिल ईतर गोष्टिंप्रमाणेच आपल्या शरीराचेसुध्दा साक्षी असते. मन जसे विश्वाचा अनुभव घेत असते त्याप्रमाणे ते आपल्या शरीराचाहि अनुभव घेत असते.

1663 मध्ये डेस्कार्टेसचे लिखाण पोपने प्रतिबंधित पुस्तकांच्या यादीत टाकले होते, कारण त्याच्या तत्त्वज्ञानात देवाऐवजी तर्क आणि मनास प्राधान्य दिले गेले होते. ज्ञान प्राप्तीसाठि तार्किक मनाच्या केंद्रस्थानाबद्दल त्यांचे स्पष्टीकरण येथे दिले आहे:

मी जेव्हा सत्याच्या शोधात पूर्णपणे स्वतःस झोकुन देण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी अस्तीत्वात असलेल्या सर्व धार्मिक, अध्यात्मिक विचारसरणिंचा पुर्णपणे त्याग केला कारण पुर्वग्रह दुषीत मनाने मी सत्याचा छडा कधिहि लावु शकणार नाहि.
आपली ज्ञानेंद्रिये आपणास फसवत असतात, चुकिचि माहिती सादर करत असतात, हे पाहून मला असे वाटते की ते आपणास जे काही सादर करतात तसे खरोखर विश्व अस्तित्त्वात नसणार. जागेपणि विश्वाचा ज्या विचारांच्या माध्यमातुन आपण अनुभव करत असतो तसेच आपण झोपेमधिल स्वप्नांचा विचारांच्या माध्यमातुन अनुभव करत असतो. स्वप्न हि असत्य असतात हे आपणास माहित आहे. ज्याप्रमाणे झोपेमधिल स्वप्निल विचारांचे विश्व असत्य असते त्याप्रमाणे जागेपणाचे भौतिक विचारांचे जगतसुध्दा असत्य का असु नये?

जेव्हा मी असा विचार करण्याचा प्रयत्न केला की सर्व काहि असत्य आहे, तेव्हा लगेचच मला असे दिसले कि असा विचार करणारे जे साक्षी तत्व म्हणजे जे मन वा आत्मा आहे ते सुध्दा असत्यच असणार. आणि या सत्याचा मला जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा मी असा निष्कर्ष काढला कि, आपण विचार करतो म्हणूनच सर्व काहि सत्य भासते अन्यथा सर्व भ्रम आहे. आणि हे ईतके ठाम व तितकेच प्रकर्षाने मला जाणवले कि त्यासाठी मला कोणत्याही पुराव्याचि गरज द्यावीशी वाटत नाहि. त्यामुळे ज्या सत्याचा मी शोध घेत होतो त्याचे पहिले तत्व म्हणुन मी त्याचा स्वीकार करत आहे.

ज्याला मी ‘मी’ समजत आहे तो एक असा पदार्थ आहे कि ज्याचे संपूर्ण अस्तित्व केवळ आणि केवळ विचारांमुळे आहे. आणि या ‘मी’ ला अस्तित्वासाठि जागेचि आवश्यकता नाहि, तो कोणत्याहि वस्तुशिवाय राहु शकतो, त्याला कोणत्याहि वस्तुंचि आवश्यकता नाहि. तसेच तो शरीराहुन पुर्णतः वेगळा आहे आणि त्याला शरीरा व्यतिरिक्त समजले तर तो सहज लक्षात येण्यासारखा आहे. हे जे विचार करणारे तत्व आहे ते अगदि सुस्पष्ट आहे. तेच विचार करते, शंका घेते, समजुन घेते, कल्पना करते, होकार देते, नकार देते, भावना, प्रेम व्यक्त करते.

जागेपणि आपणास जे अनुभव येत असतात ते शरीराच्या जाणीवेमुळे आपणास सत्य भासत असतात परंतु ते सर्व विचारच आहेत व स्वप्नाप्रमाणे असत्य आहेत. शरीरास येणारे अनुभव हे मनाच्या अंतर्पटलावर ऊमटणाऱ्या जाणीवा, अनुमान, गृहितके आहेत जे अपुर्ण वा चुकिचे असु शकतात.

Sunday, October 28, 2018

आपले विचार हेच आपले अस्तीत्व अाहे


फ्रेंच विचारवंत डेकार्ट यांचे ‘I think therefore I am’ हा विचार पाश्चात्य विचारसरणी व विज्ञानाचा पाया आहे. अपघातामध्ये शरीर व मेंदु निकामी असताना कोमामध्ये गेलेले रूग्ण अनुभव व विचार करतात असे आढळुन आलेले आहे. पृथ्वीतलावर अपघाताने जिवसृष्टि निर्माण झाली व या जिवसृष्टिमधुन मनुष्य प्राणि निर्माण झाला. जिवांच्या ऊत्क्रांतावस्थेमध्ये मनुष्य प्राण्याने आपल्या अफाट बुध्दिमत्तेच्या जिवावर स्वतःचि प्रचंड प्रगती केली व ईतर जिवसृष्टिवर त्याने आपले अधिराज्य स्थापन केले. बुध्दि व स्मरणशक्तिचा मुळ पाया हा मानवी विचार होत.

विचार म्हणजे आपल्या मेंदुमधिल विद्युत रासायनीक आवेगांना आपण दिलेला अर्थ होय. त्यामुळे आपले विचार हे सत्य असतातच असे नाहि. आपण जे विचार करत असतो त्यावर लगेच विश्वास ठेवता कामा नये.

दररोज आपण ७०,००० ते १००,००० ईतके विचार करत असतो. या विचारांमुळे आपल्या सभोवतालच्या घटना, दृश्ये, आवाज, वास यांचे आपण आपल्या पुर्वानुभवाशी संबंधित असा अर्थ लावत असतो. त्यांचा खरा अर्थ लक्षात न घेता आपण त्यांचा आपणास हवा तसा अर्थ करून घेत असतो. आपण त्यांना चांगले, वाईट, धोकादायक, सुरक्षीत, ऊपयोगी, निरूपयोगी असे वर्गीकरण करत असतो.

काहीतरी घटना घडते किंवा काहितरी आठवते किंवा काहीतरी आपणास जाणवते त्यामुळे विचार सुरू होतात. विशिष्ट प्रकारचे विचार विशिष्ट भावनांना प्रवृत्त करत असतात.

मनुष्य प्राणि हा घटनांपेक्षा त्या घटनांचा विपरीत अर्थ लावण्याने जास्त दुःखी होत असतो. घटनांना भावना नसतात, परंतु त्या घटनांना आपण दिलेला अर्थ व त्या घटनांबाबत आपण करत असलेल्या विचारांतुन भावना निर्माण होत असतात.

एखाद्या घटने विषयीचे मुल्यांकन, त्याचा अर्थ व त्याच्याशी निगडीत असलेल्या भावना या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या असतात याचे कारण प्रत्येकांचा पुर्वानुभव, पालनपोषण, कौटुंबिक मुल्ये, धार्मिक श्रध्दा, संस्कार हे वेगवेगळे असतात.

आपला मेंदु हा विचार निर्माण करत नाहि तर बाह्य घटनांचा तो आपल्या परीने अर्थ लावत असतो व त्यानुरूप शरीर कार्य करत असते. मेंदुसहित शरीर हे आपल्या आईवडिलांचि देणगी असते तर त्यांचे शरीर हे त्यांच्या विचारानुरूप बनलेले असते. त्यांच्या केवळ शरीरांचिच नव्हेतर त्यांच्या विचारांचि फलनिष्पत्ती म्हणजे आपले शरीर व आपले विचार होत. प्रत्येकाच्या विचारांचि क्षमता म्हणजे बुध्दिमत्ता हि त्याच्या पुर्वजांच्या विचारांचा व नितीमत्तेचा वारसा असतो.

विचार हे स्वयंचलीत असल्यामुळे ते आपल्या मेंदुमध्ये निरंतर चालु असतात, बरेच विचार आपणास आठवतहि नाहित. तर काहि विचारांचे आपणास व्यसन लागते व ते परत परत येत राहतात. पुनरावर्ती विचारांबाबत आपणास खात्री होऊ लागते. हे पुनरावर्ती विचार नवीन ईच्छांच्या विचारांना जन्म देतात व त्यामधिल काहि विचार अनेक वर्ष आपला पिच्छा सोडत नाहित.

स्वयंचलीत विचारांना थांबवणे अशक्य आहे कारण तेच आपले अस्तित्व आहेत. दुःखद व वाईट विचारांपासुन मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न जरूर करता येतो. स्वयंचलीत विचारांबरोबर वहात असताना काहीतरी असे करावे ज्याने आपण आपल्या स्वयंचलीत विचारांना काहिकाळ थांबवु शकु. प्रत्येकाने आपापल्या शारीरीक व बौध्दिक पात्रतेनुसार व्यायाम, प्राणायाम, योगासने, ध्यान, वाचन, लेखण, कला, संगीत आदि वेगळी वाट चोखाळली कि वेगळा रस्ता व वेगळा मुक्काम आपण गाठु शकतो व आपल्या पुढिल पिढिंचे भवितव्य जास्तीत जास्त सुरक्षीत करू शकतो.

Tuesday, September 18, 2018

विचारांनी संस्कृती व संस्कृतींनी धर्माचा पाया रचला

विश्वाचि रचना झाल्यानंतर पृथ्वीतलावर अनेक नैसर्गिक घडामोडिंमधुन सजीव निर्मिती झाली. सजिव निर्मितीमागे कोणाचाहि कोणताहि ऊद्देष नाहि, ती फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया होती. सजिवांमधिल मानव प्राण्याने संवादासाठि वेगवेगळ्या आवाजांमधुन भाषेचि निर्मिती केली. भाषेमुळे मानव विचार करू लागला व विचार लक्षात ठेऊ लागला. पिढि दर पिढि हे विचार अधिकाधिक ऊन्नत होऊ लागले व ऊपजिविका व स्वसंरक्षण यापलीकडे जाऊन त्याने विज्ञान, संस्कृती, धर्म, अध्यात्म, साहित्य, कला, खेळ आदि वेगवेगळी क्षेत्रे निर्माण केली. ऊन्नत विचारांमुळे मानवाने स्वतःस निसर्गापासुन वेगळे व श्रेष्ठ बनविले व तो सुखदुःखांच्या कधिहि न संपणाऱ्या मायाजालामध्ये अधिकाधिक अडकु लागला.

आजकाल जगभरचे बुध्दिमंत आपल्या बुध्दीला वाव मिळण्यासाठी नविन संधिच्या शोधात ज्याप्रमाणे अमेरिकेकडे धाव घेत असतात त्याप्रमाणे साधारणपणे ३ ते ४ हजार वर्षापुर्वी युरोप, आफ्रिका व आशिया खंडामधिल बुध्दिमंत मध्य पुर्व आशिया मधिल ईराण मध्ये एकत्रीत येत असत व वेगवेगळ्या विचारांचि देवाणघेवाण होत असे. यामधुन पर्शियन व वैदिक या एकाच ज्ञानाच्या दोन संस्कृती निर्माण झाल्या. या दोन्हि संस्कृती एकाच विचारांच्या होत्या, त्या एकाच ठिकाणि म्हणजे ईराण मध्ये निर्माण झाल्या व त्यांचा नंतर भारत, युरोप, अरबस्तान, आफ्रिका व तिथुन नंतर सर्व जगभर प्रसार झाला. ज्या विचारांना धनाश्रय व राजाश्रय मिळाला त्यांचा प्रसार जास्त झाला व ज्यांना तसा आश्रय मिळाला नाहि व स्थानीक शक्तिंचा विरोध झाला त्या अस्तंगत झाल्या. या संस्कृतींच्या विचारांमधुन वा त्यांच्या विरोधि विचारांमधुन नंतर वेगवेगळे प्रेषीत निर्माण झाले. प्रेषितांनी काळानुरूप नवनवीन समाज कायदे निर्माण केले आणि त्यांच्या अनुयायांनी त्या कायद्यांचे संप्रदाय निर्माण केले, संप्रदायांचा रूपांतरण धर्मामध्ये झाले.

धार्मिक व्यवस्था निर्माण होण्यापुर्वी जगभर वेगवेगळ्या वंशाचे राजे राज्य करीत असत. सुसंस्कृत व प्रस्थापित राज्यावर बाहेरील रानटि टोळ्या आक्रमण करीत व नंतर ते त्या समाजाचे एक भाग बनुन रहात. परत दुसरी रानटि टोळीचे आक्रमण होई व परत समाजामध्ये सरमिसळ होत असे. असे सतत वर्षानुवर्षे चाललेले असे. नाईल व सिंधु नद्यां दरम्यान अशा नवनवीन वसाहती व राजांचे ऊदयअस्त होत असत व हि भुमि भविष्यकालीन जागतीक धर्मांचि एक प्रयोगशाळा बनली गेली होती.

मध्य पुर्व आशियामध्ये पर्शियन म्हणजेच ईराणियन साम्राज्य होते. ईराणियन्स म्हणजेच आर्यन्स होत. ईराणि साम्राज्यामध्ये बाहमन वा वाहमन (Kai Bahman or -Wahman) या नावाचा एक महान सम्राट झाला होता. पारशी अवेस्था या धर्मग्रंथामध्ये त्याचा ऊल्लेख Vohu Manah म्हणजे चांगल्या मनाचा राजा असाहि आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये त्याचा ऊल्लेख विष्णुंचे वामन अवतार व परशुराम अवताराशी खुपच साधर्म्य आहे.

बाहमन चे वडिल Esfandiar यांचा Rostam या राजाने वध केला होता त्याचा बदला घेण्यासाठि बाहमन याने रुस्तमचा वध केला, रूस्तमचे वडिल झाल यांचा वध केला, रुस्तमच्या भावांचा वध केला. रुस्तमच्या मुली काश्मीरमध्ये होत्या त्यांचाही त्याने वध केला. भारतामध्ये येऊन त्याने रूस्तुमच्या Faramarz या मुलाचा वध केला होता. रुस्तमच्या पुर्वजांच्या कबरीसुध्दा बाहमनने ऊध्वस्त केल्या होत्या. यावरून परशुरामाने केलेल्या क्षत्रीय राजांच्या हत्यांचि आठवण येते. पर्शिया मध्ये पुर्वी परशु म्हणजे कुऱ्हाडिंचा युध्दशस्त्र म्हणुन वापर होत असे. भटक्या दरवेशींचे परशु हेच हत्यार असे. भारताच्या पश्चिमेकडे परशुरामाचि मंदिरे सापडतात याचे कारण ईराण व अरबस्तान मधुन बाहमनी वंशीय लोक येऊन पश्चिम व दक्षिण भारतामध्ये स्थायिक झाले होते.


मध्यपुर्व आशिया मध्ये नंतर बाहमनी वंशीय राजे झोरास्ट्रीयन म्हणजे पारशी धर्मीय बनले. भारतामध्ये त्याचि पुनरावर्ती ब्राम्हण धर्मामध्ये झाली. त्यांनी (पारशी परशुराम) भारतामधिल क्षत्रीय राजांचा पराभव करून त्यांचे वर्चस्व कमी करून स्वतः सर्वश्रेष्ठ झाले व त्याप्रमाणे वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली गेली. ईराणचा पारशी धर्म व भारतामधिल ब्राम्हण धर्मीयांमध्ये गोपालन, अग्नीपुजा, सोमरस, होमहवन, जानवे, वेद - अवेस्था ग्रंथ, देवांचि नावे आदि बरेचसे साम्य आहे. वेद व अवेस्ता या धर्मग्रंथामधिल विचार सारखेच आहेत.

मध्यपुर्व आशिया मध्ये बाहमनी पारशी धर्माविरूध्द अब्राहमीक ज्यु, ख्रिस्ती, मुस्लीम धर्म निर्माण होऊन तिथुन बाहमनी पारशी धर्म हद्दपार केला गेला. भारतामध्येहि बाहमनी ब्राम्हण धर्माच्या वर्णाश्रम आचरणा विरूध्द एतद्देशीय बौध्द, जैन, शैव, शिख धर्म निर्माण झाले. भारतामध्ये मात्र गुप्त राजांच्या काळामध्ये ब्राम्हण धर्मास राजाश्रय व धनाश्रय मिळाला व त्यांनी वेगवेगळ्या देवतांच्या मुर्तीपुजा व त्यांचि मंदिर निर्मिती करून भारतभर धार्मिक वातावरण निर्माण केले. ब्राम्हण वेदांतींनी बौध्दांचे मोठ्या प्रमाणावर परत धर्मांतरं केले. सिंधु नदीवरून ब्राम्हण धर्मास भारतामध्ये हिंदु धर्म हे नाव पडले गेले व ईंग्रजांनी जनगणने दरम्यान त्यावर शिक्कामोर्तब करून टाकले.

भारतामध्ये मुघलांच्या अगोदर अनेक मुस्लीम सुलतान राज्य करीत असत त्यामधिल एक होते बाहमनी सुलतान. हे बाहमनी सुलतान ईस्लामी झाल्यानंतर सुध्दा स्वतःस ईराणच्या पुर्वीच्या बाहमन या सम्राटाचे वंशज मानण्यात धन्यता मानत असत.

गायत्री व गोमाता यांचे मुळसुध्दा पर्शियन आहे. पारशी धर्माच्या अवेस्ता धर्मग्रंथा नुसार गायोमार्ट हा त्यांचा आदिगुरू आहे ज्याने त्यांच्या अहुरा माजदा या ईश्वराची आराधना सुरू केली. ग्रीक समाज धरतीमातेला गैया म्हणतात. मश्य व मश्याना या प्रथम दंपत्ती पासुन मानव वंशाचि सुरूवात झाली असे ते मानतात ज्यांस भारतामध्ये मस्त्यावतार असे संबोधले जाते. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, परशुराम, वामन हे दैवी अवतार पर्शियन धरतीवरील आहेत तर नंतरचे राम, कृष्ण, बुध्द या भारतीय महाविरांना अवतारांचा दर्जा दिला गेला.

अतिरिक्त व अनावश्यक विचारांमुळे बुध्दिचे वैभव वाढत गेले व बुध्दिमत्तेच्या फापटपसाऱ्या मधुन आधुनिक संस्कृती, धर्मांचे व विज्ञानाचे अवडंबर वाढत गेले व मुळचि नैसर्गिक जीवनशैली मानव हरवुन बसला. विज्ञानामुळे धर्माचे पितळ ऊघडे पडत चालले आहे परंतु त्यामधुन चंगळवाद जोपासला जात आहे. पहिला काटा काढण्यासाठि दुसऱ्या काट्याचा आधार घ्यावा लागतो परंतु त्याने जखम भरली न जाता ति अधिकच चिघळत जाते याचे भान रहायला हवे.

Thursday, September 13, 2018

भाषा व मानवी ऊत्क्रांती

संवादासाठि आवाजाचे भाषेमध्ये रूपांतर करण्यात आदिम मानव यशस्वी झाले. भाषेमुळे विचार व मन अस्तित्वात आले. मनाने मानवी जिवनाच्या विकासा बरोबर श्रध्दा व भावनांच्या मोठमोठ्या कल्पना निर्माण केल्या. भाषेविना शरीर विचार करू शकत नाहि, विचारांविना मनास अस्तित्व प्राप्त होत नाहि. सुख, दुःख, आनंद, शांती या सर्व मनाच्या, विचारांच्या, भाषेच्या कल्पना आहेत. मनाच्या कल्पनां शिवाय शरीर आपले नैसर्गिक जिवन जगु शकते. डॉक्टर असूनही जंगलामध्ये राहणारे आमटे कुटुंबिय सुखी आहेत कि गडगंज संपत्ती असुनहि बँकांचे पैसे बुडवुन देश सोडणारे कोट्याधीश सुखी आहेत? मन हे सतत एैश्वर्याचि नवनविन ऊंचि गाठत असते परंतु ते कधिहि सुखी होत नाहि. मनाच्या वासना व हव्यास या कधिहि तृप्त होत नाहित.

लहानपणी आईवडिलांचे बोट धरून चालावयास शिकणारे मुल मोठे होताच स्वावलंबी होते व आपल्या विश्वामध्ये भराऱ्या मारू लागते. यासाठि त्याला यथावकाश आपल्या आईवडिलांचे बोट सोडावे लागते. आठवा ते अजरामर गीत,
     आकाशी झेप घेरे पाखरा, सोडि सोन्याचा पिंजरा....

मुक्त वाहणाऱ्या नदि प्रमाणे आपले नैसर्गिक जिवन असते, तिथे सुख व दुःख या कल्पनांचे बांध नसतात. झाडापासुन पाने, फुले व फळे अलग होताना ना झाडाला दुःख होते व ना झाडाला सोडणाऱ्यांना सुख होते. सतत वाहणे हा सृष्टिधर्म आहे. त्यागेन एक अमृतत्व लभते...

विचारांच्या व मनांच्या श्रध्दांच्या व भावनांच्या विविध संकल्पनांनी मानवी जिवनास ठिकठिकाणी बांध घातले जातात. खळाळत वाहणारा जिवन प्रवाह डबक्या डबक्यामध्ये नासवला, सडवला जातो. अशा कुजक्या जिवन प्रवाहांचे संस्कार व संस्कृतीच्या रितीरिवाजांखाली अवडंबर माजवले जातात. डबक्यांमधिल नाशीवंत जिवन प्रवाहांचि वेगवेगळी नक्षीदार कुंडे नदिच्या प्रवाहाच्या भितीने आपले वेगवेगळे अस्तित्व कसोशीने टिकवुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओबडधोबड खडकाळ दगड गोट्यांच्या व धबधब्यांच्या जिवंत नदि प्रवाहा एैवजी प्रवाहा पासुन वेगळ्या असणाऱ्या नक्षिदार कुंडामधिल जिवन सुरक्षित व सुखी भासणे हेच आपले फार मोठे दुर्दैव असते. 

Monday, September 10, 2018

देवपुजा


प्रश्नकर्ता: आपण देवपुजा का करतो?

जे कृष्णमुर्ती: माफ करा, आपण देवांचि खरोखरी पुजा करीत नाहि. आपण देवांवर प्रेम करीत नाहि. जर आपण खरेच देवावर प्रेम करीत असु तर हि असली देवपुजा आपण खचितच करणार नाही. आपण अज्ञाताला घाबरत असतो म्हणून देवांचि पुजा करीत असतो. आपण प्रेमापोटी नव्हे तर भीतीपोटि देवतांचि पुजा करत असतो. मुर्ती, मंदिरे, पुजाविधी, जानवे, माळा, अंगारे धुपारे हे काहिहि ईश्वरनिर्मित नाहि. या सर्व निरूपयोगी गोष्टि मानवाने भितीपोटि तयार केलेल्या आहेत. दुःखी, निराश, भयग्रस्त माणसे देवतांच्या पुजा करत असतात. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती, अधिकार, सत्ता आहेत ती माणसे सुखी नसतात. महत्वाकांक्षी माणसे हि सर्वात जास्त दुःखी असतात.

आपण जेव्हा सर्व आशा - आकांक्षामधुन मुक्त होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखी होतो. अशी सुखी माणसे देवतांच्या पुजा करीत बसत नाहित. दुःखाने पिचलेली, निराश झालेली, अन्यायाने त्रस्त झालेली माणसे मंदिराच्या पायऱ्या झिजवत असतात. परंतु त्यांनी मंदिरामध्ये आपला वेळ व पैसा व्यर्थ व्यतीत करण्या एैवजी आपल्या दुःखाचे मुळ असणारे अज्ञान शोधून काढले तर त्यांना निश्चितच सत्याचे दर्शन होईल, ईश्वर नेमका काय आहे हे समजेल व ते सर्व नरनारी सुखी होतील.

Saturday, September 08, 2018

वास्तवतेचे मृगजळ


मन म्हणजे विचारांच्या न संपणाऱ्या शृंखला होत. विचारांच्या शृंखलांना मन हि संज्ञा दिली गेली आहे. मनास अस्तित्व नाहि, जे काहि चैतन्य जाणवते ते केवळ विचार होत. विचारांचे मुळ शोधले असता आपण आवाजाच्या स्पंदना पर्यंत जातो. तर स्पंदने हि ऊर्जाशक्तिचे आविष्कार आहेत. ऊर्जाशक्तिच्या स्पंदनांचा म्हणजे जिवनऊर्जेचा ऊपयोग करून सजिव जिव आपल्या जीवनावश्यक गोष्टि मिळवीत असतात व प्रजोत्पादन करत असतात. मानवी ऊत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये मनुष्य प्राण्याने या ऊर्जेच्या स्पंदनांचा भाषेमध्ये रूपांतरण केले व त्याच्या भाषा संवादाच्या प्रभुत्वाने म्हणजेच त्याच्या अधिक ऊच्च विचारांनी त्याने पृथ्वीवर प्रभुत्व मिळविले.

ऊर्जा स्पंदनांना भाषेमध्ये रूपांतरण करून आपण जे विचार करत असतो त्या विचारातुन ‘मी’ चि संकल्पना निर्माण झालेली आहे. जर विचार नसतील तर ‘मी’ सुध्दा नसणार. विचार हे शरीराहुन भिन्न आहेत. शरीर बेशुध्द झाले अथवा मृत झाले तरी विचार जिवंत असतात. कारण विचार हे ऊर्जेच्या स्पंदनांचे वेगवेगळे प्रकार आहेत व ऊर्जेचा विनाश होत नाहि. मृत व्यक्तीचि ऊर्जा स्पंदने हि दुसऱ्या जिवंत मनुष्याच्या संपर्कात येतात व त्यांचा पुढिल प्रवास सुरू राहतो. ऊर्जा स्पंदनांचे विचार हे शरिरास एक वाहन म्हणुन वापरत असतात. विचार हे सुध्दा ऊर्जेच्या स्पंदनास भाषेने दिलेले वेगवेगळी रूपे असतात. जसे एकाच हवेचे बासरीमधुन वेगवेगळे सुर निघतात त्याप्रमाणे एकाच वैश्वीक ऊर्जेच्या स्पंदनामधुन प्रत्येक शरीर वेगवेगळे विचार करत असते.

विचार व शरीर यांच्या संगनमताने मी, माझे आप्तेष्ट, माझा धर्म, माझा देश आदि वेगवेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक आपत्ती व त्यामधिल अनेक जडणघडणीमुळे अपघाताने जिव निर्मिती झाली आहे. अनेक वनस्पती व अनेक प्रकारचे प्राणि निर्माण झाले व त्यामधिल एक मानव प्राणी आहे. मानव प्राण्याने भाषा निर्माण केली व या भाषेच्या माध्यमामुळे त्याचि अफाट वेगाने भौतिक प्रगती झाली. भौतिक प्रगती बरोबरच अफाट मानसिक कल्पना तो रंगवु लागला. देवता, राक्षस, भुते, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य हे त्याच्या अफाट मानसिक कल्पनांचे आविष्कार आहेत.

बोलाचिच कढि व बोलाचाच भात या ऊक्तिप्रमाणे विचारां मधुन जन्मलेल्या सर्व कल्पना या असत्य आहेत त्यांचा वास्तवाशी काहिहि संबंध नाहि. शरिर हे सुध्दा पृथ्वीतलावरील एक अपघात आहे. शरीर व मन हे ज्या ऊर्जेमधुन निर्माण झाले आहेत ती ऊर्जा अविनाशी आहे परंतु तिला ना शरीर आहे वा ना मन आहे, तिथे काहिहि अनुभवगम्य नाहि. अशा अवस्थेमध्ये आपण समाजामध्ये समाजाच्या नियमांप्रमाणे राहुन कालव्यतीत करण्याहुन तरणोपाय नाहि. सर्व आशा आकांक्षा, वासना नाहिशा झाल्याने भिती नाहिशी होते व आपण आपले आयुष्य निर्धोकपणे जगु शकतो. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान हे संतांचे वचन याच सत्याचि साक्ष आहे. नवनविन वैज्ञानीक संशोधना मुळे जे ज्ञान आज विकसीत झालेले आहे ते पुर्वी संतांना उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांचि अनुभुती हि त्यावेळच्या ज्ञानावर आधारीत होती त्यामुळे ते चुकिचे होते कि काय असा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

Friday, August 24, 2018

‘मी’ च्या चैतन्याचि जाणिव हा मेंदु निर्मित भ्रम आहे


अध्यात्मिक ध्यान साधने मधुन जे काहि अतींद्रिय अनुभव साधकास येतात वा साधकाच्या जीवनशैली मध्ये जो आमुलाग्र बदल होतो तसेच बदल व तसेच अतिंद्रिय अनुभव हे Psilocybin या औषध सेवनाने सुध्दा येतात असे मानस शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. अपघातामध्ये वा भुल दिल्याने वा मादक पदार्थ सेवनाने मनुष्याचा मेंदु तात्पुरता नादुरूस्त होतो तरीहि मेंदुविना मनुष्य अनुभव घेऊ शकतो, विचार करू शकतो व ते अनुभव नंतर तो आठवु शकतो हे सिध्द झाले आहे. अशा मेंदुविरहित अवस्थेमध्ये मनुष्य प्रामाणिक व स्वच्छ विचार करतो व या अनुभवामुळे नंतरच्या आयुष्यामध्ये तो सात्वीक विचारसरणीचा अध्यात्मिक मनुष्य बनतो.

आपण ज्यास जिवन असे म्हणतो ते आपले शरीराच्या सांगाड्या मधिल वास्तव्य हे खरे जिवन नसुन तेच खरे जिवन आहे असे भासवुन मेंदु आपणास भ्रमित करत असतो. आपण अखंड, अनंत वाहणाऱ्या जिवनप्रवाहाचा एक भाग आहोत. मेंदु आपणामध्ये असे विचार निर्माण करतो कि ज्यामुळे आपण स्वतःस या जिवन प्रवाहापासून वेगळे समजु लागतो. या वेगळे पणाच्या भावनेमुळे मनुष्य दुःख भोगतो व वैयक्तिक संसारास बांधला जातो. मेंदु हाच चैतन्य शक्तिचा भ्रम तयार करत असतो. आपल्या मेंदु मधिल अगणित न्युरॉन्स हे आपणास चेतन अनुभव देण्यासाठी सतत कार्यरत असतात, ते आपल्या देहा सहित सभोवतालच्या विश्वाचा देखावा निर्माण करत असतात. शरिर व मेंदुविरहित बेशुध्दावस्थेमध्ये जिवंत असल्याचा अनुभव म्हणजे व्यावहारीक दृष्ट्या जिवंत नसताना जिवंतपणाचा अनुभव अनेकांस आलेला आहे.

स्वतंत्र व वेगळ्या अस्तित्वाच्या ओळखिचि जाणिव हि अहंकारामधुन येते. अहंकारामुळे वेगळ्या अस्तीत्वाच्या निरनिराळ्या सीमा आखल्या जातात, त्या सीमांचे प्राणपणाने रक्षण केले जाते. अहंकार वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळे रूप घेत असतो. लहानपणापासून ते प्रौढावस्थे पर्यंत त्याने अनेक रूपे बदललेली असतात, वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये तो वेगवेगळा दिसत असतो. अध्यात्मिक साधने द्वारा वा औषधि वनस्पती सेवनाने अहंकार हा कमी करता येतो.

आपल्या स्वतःच्या व ईतरांच्या सुरक्षेच्या दृष्टिने समाजा मध्ये वावरताना आपणास काहि बंधने घालावी लागतात. आपला मुळ स्वभाव हा अतिशय दयाळु, कमालीचा प्रामाणिक असा आहे परंतु काहिजण याचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा समाज विघातक शक्तिं पासुन आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आपणास अहंकाराचि आवश्यकता असते. आपण आपले हितसंबंध सुरक्षित केल्यानंतर आपला अहंकार कमी केल्याने बरेचसे फायदे होतात. मेंदुमधिल जुनी स्वार्थी केंद्रे बंद होऊन नवीन पारमार्थिक संवेदना प्रवाहित होऊ लागतात. षडरिपुंचे षडगुणांमध्ये रूपांतरण होते. मेंदु निर्मित वैयक्तिक ओळख कमी होऊन मुळच्या वैश्वीक जिवन प्रवाहाशी आपण एकरूप होऊन जातो.

https://qz.com/1196408/scientists-studying-psilocybin-accidentally-proved-the-self-is-an-illusion/

Sunday, August 19, 2018

बौध्दिक गुलामि

आदिमानवा पासुन आधुनिक मानवा पर्यंतचि ऊत्क्रांती हि मानवाच्या बुध्दिमत्तेमुळे झाली आहे. पिढि दरपिढि हि बुध्दिमत्ता अधिकाधिक विकास पावत आहे. आपल्या पुढिल पिढीच्या बुध्दिमत्तेचा विकास कळत नकळत आपल्या बुध्दीच्या विकासावर अवलंबुन असते. बुध्दिमान मनुष्य बिकट परिस्थिती मधुन आपला व आपल्या समाजाचि प्रगति करत असतो.

मनुष्याच्या बुध्दिमत्तेचा विकास झाला आहे हे त्याच्या वाचन, लेखण, कला, साहित्य, संगित, सामाजिक कार्ये व सामाजिक चळवळी मधिल सहभाग, व्यायाम, योग, ध्यान आदि अतिरिक्त छंदामधुन दिसून येतो.

सतत एकच प्रकारचा कामधंदा केल्याने, एकाच संप्रदायाचि वा एकाच गुरूंचि एककल्ली साधना केल्याने, एकाच राजकिय पक्षाची सतत पाठराखण केल्याने मनुष्याच्या विवेक बुध्दिचा पुर्ण विकास होत नाहि. विवेकि बुध्दि शिवाय कामाधंद्या मधिल बारकावे वा अध्यात्मा मधिल सुक्ष्मातीत सुक्ष्म ज्ञान आकलन होत नाहि.

काहितरी एकच छंद जोपासुन आयुष्यभर त्यामध्येच अडकण्याने त्या छंदाचे आपण गुलाम बनत असतो. 'सांग काम्या हो नाम्या' प्रकारच्या गुलाम अवस्थेमध्ये बुध्दिचा विकास संभवत नाहि. प्रत्येक स्त्री पुरूषास स्वातंत्र्य देण्याने त्यांचि बुध्दिमत्ता स्वतंत्र होत असते.

वेगवेगळे काम केल्याने, वेगवेगळे छंद जोपासल्यामुळे वा आहे त्या कामामध्ये व छंदामध्ये सतत नाविन्य आणल्यामुळे बुध्दिचा अधिक विकास होत असतो व मानसिक समाधान सुध्दा मिळत असते. विवेकि बुध्दि व समाधानी मानसिकता हि आर्थिक स्वावलंबनाचे आधारस्तंभ आहेत.

विवेकि बुध्दिस निरक्षीर बुध्दि असेहि म्हणतात. हंस हा पक्षी दुधामधिल पाणि वेगळे करतो व फक्त दुध पितो. सत व असत काय आहे हे समजावून घेऊन सत चा स्विकार करणे म्हणजे योग करणे होय व असतचा अस्विकार करणे म्हणजे असतचा संन्यास करणे होय. जि बुध्दि मनुष्यास अशाप्रकारच्या योग व संन्यासापर्यंत घेऊन येते तिला सदसद्विवेक बुध्दि असे म्हणतात.

|| तन्नो हंस प्रचोदयात ||

Monday, August 13, 2018

शरीर हार्डवेअर, मन सॉफ्टवेअर व आत्मा परमात्मा हे गेम्स आहेत


आपण कोण आहोत, सभोवतालचे विश्व काय आहे व हे सर्व कोणि व कशासाठी बनविले आहे हे प्रश्न ज्यावेळी आपणास पडायला लागतात त्यावेळी आपली ब्रम्हजिज्ञासा (कुंडलीनी) जागृत झाली असे समजावे. वेदांतात यालाच अथातो ब्रम्हजिज्ञासा असे संबोधले आहे.

पृथ्वीवरील सर्व संस्कृतींनी, धर्मांनी, गुरूंनी अशी शिकवण सर्व मानवजातीस दिलेली आहे कि ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे व तोच विश्वाचे पालन पोषण करत आहे. पिढि दर पिढि तेच ज्ञान सर्वत्र पसरविले जाते व आपण शहानिशा न करता केवळ श्रध्देने त्यावर विश्वास ठेवतो.

वैज्ञानिक संशोधनातुन असे सिध्द झाले आहे कि एका छोट्याशा अणुचा प्रचंड मोठा महास्फोट होऊन (big bang theory) हे विश्व निर्माण झाले. विश्वामधिल अगणित तारे व ग्रहांपैकि पृथ्वी हा एक ग्रह आहे. या ग्रहावर अनेक अपघातांमधुन जिवसृष्टिचि निर्मिती झाली आहे. लाखो वर्षांच्या जडण घडणि मधुन श्रेष्ठ पेशींचे संवर्धन व निकृष्ट पेशींचा विनाश होत अनेक प्रकारचे जैव वैविध्य पृथ्वीतलावर निर्माण झाले आहे. महास्फोटाच्या आवाजाचे ध्वनी व प्रतिध्वनी आजहि अवकाशामध्ये कंपनांच्या स्वरूपामध्ये निनादत आहेत. हि कंपने अवकाशाप्रमाणेच पृथ्वीवरील प्रत्येक अणुरेणुमध्येहि होत आहेत. या कंपनांच्या माध्यमातून सजिव आपल्या अस्तित्वासाठि व प्रजोत्पादनासाठि विचार निर्मिती करत असतात. सजिवांमधिल दोन पायांवर चालणाऱ्या मानव प्राण्याने आपल्या बुध्दिमत्तेच्या जिवावर या विचारांमधुन संवादासाठि भाषा विकसीत केली. भाषा विकसीत झाल्याने विचारांना स्मृतीमध्ये ठेवणे सहज शक्य झाले, यातुन नवनविन संकल्पना अस्तित्वात येऊ लागल्या. संकल्पनांना ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले. या काल्पनीक ज्ञानामधुन त्याने ईश्वराचि व धर्माचि निर्मिती केली व आपल्याच बुध्दिचा तो गुलाम बनला. हजारो वर्षांच्या संकल्पनांना चित्रे, मुर्ती, मंदिरे, ग्रंथ यामधुन मुर्त स्वरूप प्राप्त झाले व आपल्याच कल्पनांना तो सत्य समजु लागला व त्यांचा त्याने अध्यात्माच्या नावाने नविन शोधहि सुरू केला.

अध्यात्मिक साधने दरम्यान साधक आपल्या शरीरास व मनास तपश्चर्येच्या नावाखाली अत्यंतीक यातना देतो. खडतर साधनेच्या परिणाम स्वरूप मेंदु कडे जाणाऱ्या प्राणवायु व रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामुळे साधकाचा मेंदु काहिकाळ बधिर होतो. मेंदुविरहित अवस्थेमधिल अतींद्रिय अनुभव (out of body experiences) त्याला सुखावतात व त्याला स्वतःविषयी विशेष अभिमान होऊ लागतो व तो अधिकाधिक अध्यात्मिक, परोपकारी, विवेकि, संन्यस्त होऊ लागतो.

शरीर व मेंदु विरहित अवस्थेत आपण विचार करू शकतो, अनुभव घेऊ शकतो व ते स्मृतीतहि ठेऊ शकतो हे मानस शास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. अपघात वा गंभीर आजारा दरम्यान अनेक रूग्णांचा मेंदु निकामी होतो व ते बेशुध्द होतात. (Near death experience) सामान्य अवस्थेमध्ये मेंदु निकामी असताना विचार करणे वा कोणताहि अनुभव घेणे शक्य होत नाहि. परंतु बेशुध्द अवस्थेमधिल अनेक रूग्णांनी ते बेशुध्द असताना त्यांनी शरीराबाहेर येऊन काय पाहिले हे नंतर व्यवस्थीत सांगितलेले आहे. काहींनी त्यांच्या पुर्वजन्मा मधिल घटना सांगितलेल्या आहेत, काहींचा पुर्वजन्मी एखादा अवयव कापला गेला असेल तर याजन्मी तो अवयव अपंग होऊन त्यांनी जन्म घेतलेला आहे हे सुध्दा सिध्द झालेले आहे.

आपण जे काहि विचार करत असतो त्यामुळे आपल्या शरीरामधिल व आसपासच्या वातावरणामधिल कंपनामध्ये बदल होत असतो व ती कंपने आपल्या आयुष्यामध्ये त्यानुरूप बदल घडवीत असतात. विचारांशी निगडित कंपने हि आसमंतात जिवंत राहतात व एक शरीर नादुरूस्त झाल्यानंतर दुसऱ्या शरिराच्या संपर्कामध्ये येऊन परत आपला कार्यभाग चालु ठेवतात.

कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स हि अगदि अलीकडिल संशोधने आहेत फार पुर्वी ती अस्तित्वातहि नव्हती त्याप्रमाणे संपुर्ण विश्वाच्या कालगणनेच्या तुलनेमध्ये आधुनिक मनुष्य प्राणि हा खुप अलीकडिल आहे. कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स मध्ये एक हार्डवेअर रूपि सांगाडा असतो व दुसरे सॉफ्टवेअर रूपि प्रोगॅम्स व अॅप्स असतात. हार्डवेअर निकामी झाले तरी प्रोगॅम्स व अॅप्सचा बॅकअप दुसऱ्या हार्डवेअर मध्ये रिस्टोअर करून आपण तेच काम दुसऱ्या हार्डवेअर मधुन जसेच्या तसे करून घेतो. आपले शरीर हे एक हार्डवेअर आहे व मन हे एक सॉफ्टवेअर आहे. एक शरीर निकामी झाल्यानंतर मन दुसऱ्या नवीन शरीराचा आधार घेते. मनामध्ये कुटुंब, समाज, जात, धर्म, समाजकारण, राजकारण, संस्कृती, देश, स्वर्ग, देवता, आत्मा, परमात्मा, प्रेम, भक्ति, अध्यात्म आदि वेगवेगळे गेम्स लोड केलेले असतात. प्रत्येक जण तल्लीन होऊन आपापल्या आवडि प्रमाणे एकामागुन एक हे खेळ खेळत असतात.

(डॉ ब्रुस ग्रेसन यांचे मेंदु विरहित अवस्थेतील संशोधन जाणुन घेण्यासाठि हा व्हिडियो पाहु शकता: https://youtu.be/2aWM95RuMqU )

Sunday, August 05, 2018

देव, देश व धर्म कोणांसाठि?


हजारो वर्षापुर्वी ज्यावेळी पृथ्वीतलावर सर्वत्र जंगल होते त्यावेळी आदिमानव अन्न व स्वतःच्या संरक्षणार्थ पृथ्वीवर सतत दाहि दिशा फिरत असे. त्यामुळे कोणताहि मानवी समाज हा एका ठराविक भौगोलिक प्रदेशाचा मुळचा रहिवासी वा मालक नाहि. आज जगामधिल सर्व मानव हे एकाच गुणसुत्रांचे आहेत कि जे सर्वात अगोदर सापडलेल्या होमी सेपियन या आफ्रिकेच्या जंगलातील आदिमानवाशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे कोणिहि खरा भुमीपुत्र नाहि, कोणि ऊच्च वर्णिय नाहित तर कोणि निच जातीचा नाहि.

मानवी समाज भटकत असताना व ऊत्क्रांत होत असताना भाषा, अग्नी, शेती, वस्त्र, धातु आदिंचे शोध लागत गेले व कालांतराने तो स्थीराऊ लागला. वस्ती, गावे, नगरे निर्माण होऊ लागली, जमीन जायदादिच्या वाटपातुन संघर्ष निर्माण होऊ लागले, बळी तो कान पिळीतुन राजसत्ता निर्माण झाली. नैसर्गिक आपत्तींना घाबरणारा मनुष्य सहाय्या साठि आकाशाकडे बघु लागला व समाजातील काहि धुर्त लोकांनी आकाशा मधिल बापाचि म्हणजे दैवी शक्तिचि संकल्पना निर्माण केली. दैवी शक्तींशी संपर्क साधणारा नवीन पुजारी वर्ग व त्यांच्या गुरू शिष्य परंपरा सुरू झाल्या. यामधुनच नंतर धर्म तयार झाले. राजसत्ते बरोबर धर्मसत्ता सुध्दा प्रबळ झाल्या व दोघांना अधिकाधिक सत्ता व अधिकाधिक सुखांच्या लालसा निर्माण होऊ लागल्या. या लालसेमधुन अधिकाधिक सुखांच्या नवनविन वस्तुंचि निर्मिती व त्यांचा व्यापार सुरू झाला व तिसरा धनिकांचा व्यापारी वर्ग निर्माण झाला. राजसत्ता, धर्मसत्ता व धनीकसत्ता यामधिल अल्पसंख्य सत्ताधाऱ्यांनी ऊर्वरीत बहुसंख्य समाजास आपले गुलाम बनविले. सामान्य जनतेच्या अभ्युदयासाठी काल्पनीक देव, देश व धर्म यांचे संरक्षण करणे हेच सर्व समाजाचे कर्तव्य आहे हे अपप्रचाराने पटवुन देण्यात सत्ताधारी कमालीचे यशस्वी झाले. बहुसंख्य समाज एकत्र येऊन त्यांचि मोठि ताकद निर्माण होऊ नये यासाठि त्यांच्यामध्ये अनेक जाती जमाती व कुळे निर्माण करून त्यांच्यामध्ये सतत संघर्ष होत राहिल यासाठि सत्ताधारी नेहमी राजकारण करत राहिले.  सत्ताधाऱ्यांच्या देव, देश व धर्मांच्या रक्षणासाठि बळि मात्र सामान्य, अशिक्षित, अज्ञानी गुलामांचे जात राहिले.

औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावरील गुलाम मजदुर समाज एकवटु लागला, सुशिक्षित होऊ लागला. पश्चिमे कडिल गुलामांना देव, देश व धर्मापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे श्रेष्ठ वाटु लागले व त्यामधुन अमेरिकन, फ्रेंच, रशियन राज्य क्रांती झाल्या व तेथील सर्वसामान्य जनतेने प्राणांचे बलिदान देऊन राजसत्ता व धर्मसत्ता ऊलथवुन टाकल्या व जनतेचे जनतेने चालविलेले लोकशाहि राज्ये निर्माण केली. याचे लोन सर्व जगभर पसरले व सर्वत्र लोकशाहि जनसत्ता निर्माण होऊ लागल्या.

लोकशाहि जनसत्तेने राजसत्ता पुर्णपणे नामशेष केल्या परंतु धर्मसत्ता अजुनही आपला प्रभाव राखुन आहेत. भ्रष्ट कारभाराने राजसत्ता लोकांच्या मर्जीतुन ऊतरल्या परंतु देव, धर्म, गुरू व त्यांचे धर्मग्रंथ यांच्यावरील अंधश्रध्दांमुळे धर्मसत्ता जिवंत राहिली व जगभर ति परत अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर न करता धर्मगुरू व त्यांच्या धार्मिक ग्रंथांवर डोळे झाकुन विश्वास ठेवतात व त्यांचि गुलामी आनंदाने स्वीकारतात. श्रध्दांचि नशा ईतकि भिषण असते कि विज्ञान युगामधिल सुशिक्षित भक्तगण सुध्दा त्या श्रध्दांसाठि आपले सर्वस्व पणाला लावण्यास तयार होतात.

भारताचा ईतिहास पाहिला असता साधारण ३००० वर्षापुर्वी राजसत्ता व धर्मसत्ता स्थिरावण्यापुर्वी भारत खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम् शस्य शामलाम होता. परंतु नंतर राजसत्ता, त्यांचा सत्तासंघर्ष, कलींगचा भिषण नरसंहार, बुध्द, महावीर, वेदांती, ब्राम्हण यांचे संन्यासी धर्म, संप्रदाय यांनी भारतातील स्वयंपुर्णता व स्वसंरक्षण सिध्दता पार कोलमोडुन पाडली व अनेक शतके भारत परक्यांची दस्युभुमी बनला गेला.

ब्रिटिशांच्या नंतर कंगाल भारत निधर्मी, लोकशाहि देश बनला. पहिला आघात धर्मानेच केला व भारताचि फाळणि झाली. स्वातंत्र्याच्या सुखाचि स्वप्ने पहाणाऱ्यांचा पहाटेच स्वप्नभंग झाला. नंतर कॉंग्रेस राज्यकर्ते व सरकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनविला. ३० वर्षापुर्वी सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नसणाऱ्या भाजपाने अयोध्येमध्ये रामजन्मभुमीचा शोध लावला व धार्मिक दंगेधोपे करत सत्ता हस्तगत केली. ना परकीयांनी, ना कॉंग्रेसने व ना भाजपाने जनतेचे प्रश्न सोडविले. कारण राज्यकर्ता हा ना परकिय असतो ना स्वकिय असतो. तो फक्त सत्ता संपादन व सत्ता टिकविणे यामध्येच व्यस्त असतो. तो जनतेला परत परत देव, देश व धर्म यांचि गाजरे दाखवुन खेळवत असतो.

जनता हि धर्म, भाषा, प्रांत, जात, संप्रदाय, वर्ग यामध्ये विभागलेली असते. समाजामध्ये जितकी जास्त विभागणि असते तितके जास्त त्याचे राजकारण करता येते व तितके जास्त राजकारणी निर्माण होत असतात. फोडा व राज्य करा हि निती अनेक प्रकारच्या विभाजनांमुळे प्रचंड यशस्वी होत असते. त्यामुळे समाज तिथेच राहतो व राज्यकर्ते मात्र त्यांच्या जिवावर सर्वसत्ताधिश होत असतात.

संपुर्ण समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी समाजामधिल सर्व प्रकारच्या विभाजनाच्या दऱ्या भरल्या गेल्या पाहिजेत. देव, धर्म, धर्मगुरू, धर्मग्रंथ हे चतुर मानवांनी आपल्या स्वार्थासाठी बनवलेली श्रध्दास्थाने आहेत त्यांचा सत्याशी सुतराम संबंध नाहि हे आपल्या आजपर्यंतच्या अनुभवांनी व वैज्ञानीक संशोधनाने सप्रमाण सिध्द केले आहे. जोपर्यंत या श्रध्दास्थानां वरील लोकांचि विश्वासार्हता कमी होणार नाहि तोपर्यंत समाजा मधिल धर्म, जातींची विभागलेली दरी आपण भरू शकणार नाहि व सत्ताधारी या विभाजनांचा राजकारणासाठी वापर करतच राहणार. या विभाजनांमुळेच युध्दे व दंगली होत असतात व गोरगरीब समाज त्यामध्ये नाहक होरपळला जात असतो. धर्म व जाती व्यवस्था राज्यकर्ते व धार्मिक संस्था कधिहि नष्ट करणार नाहित ऊलट त्यांचे ते आरक्षणच करत राहतील कारण तेच त्या सर्वांचे मोठे चराऊ कुरण आहे.

समाजामधुन दुहिचि पाळेमुळे नष्ट करावयाची असतील तर समाजासच पुढाकार घ्यावा लागेल, त्यासाठि ...
देव, देश व धर्मासाठि वाया जाणारी आपली सर्व शक्ति व बुध्दि हि आपल्या स्वतःच्या विकासासाठी वापरावी.
जात व धर्म हे काल्पनीक आहेत म्हणुन आंतर धर्मिय व आंतर जातीय विवाहांना प्राधान्य द्यावे. समाजाने अशा विवाहितांनाच नोकरीमध्ये आरक्षण वा व्यवसायासाठी व संसारोपयोगी बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना संरक्षीत व प्रोत्साहित करावे.
आपल्या गुलामीचि प्रतीके असणारे सर्व खर्चिक धार्मिक समारंभ व केंद्रे बंद करून फक्त राष्ट्रिय स्मारके व राष्ट्रिय समारंभ साजरे करण्यास प्राधान्य द्यावे.
जनगणने मध्ये आपली जात व आपल्या धर्माचा ऊल्लेख टाळावा.
जातीय व धार्मिक प्रचार करणाऱ्या राजकिय पक्षांना मत देणे टाळावे.

मानवाचि मुक्तता हि देव, देश व धर्म कदापिहि करू शकणार नाहित कारण त्या त्याच्या बेड्या आहेत. स्वातंत्र्य, समता व बंधुता याच मानवाच्या मुक्ततेच्या खऱ्या खुऱ्या पायऱ्या आहेत.

Wednesday, July 25, 2018

पांडुरंग... विठ्ठला



पांडुरंग विठ्ठलाचि ईतरत्र अनेक मंदिरे आहेत परंतु मुळ क्षेत्र हे पंढरपुर आहे. पंढरपुरच का यामागचा इतिहास जाणणे खुप महत्वाचे आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्या | वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।

ई.स.आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी भिमा नदीकाठच्या महायोगाचे क्षेत्र असणाऱ्या पंढरपुर येथील पांडुरंगाचे स्तोत्र 'पांडुरंगाकष्टकम' गायले आहे. वरं पुंडरीकाय (पुंडलीक वरदा...) म्हणजे भक्त पुंडलीकाला आशीर्वाद देण्यासाठी अवतरलेल्या परब्रह्मलिङ्गं, शिवं, शांतं परमेश्वराचे हे स्तोत्र आहे. याचा अर्थ पांडुरंगाचे क्षेत्र हे आठव्या शतकापुर्वीचे आहे व क्षेत्रपती पुंडलिकांचा त्यामध्ये स्पष्ट ऊल्लेख आहे. विठ्ठल हे नाव नंतर आलेले आहे.

भक्त पुंडलीक हे सहाव्या शतकापुर्वी होऊन गेलेले असावेत कारण सहाव्या शतकातील राष्ट्रकुटांच्या ताम्रपटामध्ये पांडुरंगाचा ऊल्लेख आहे. भक्त पुंडलिकांचा फार मोठा संप्रदाय असावा ज्याचे त्यावेळचे व नंतरचे राजे महाराजे शिष्य असावेत. भक्त पुंडलीक व पांडुरंगाचि मुर्ती पाहता या दोघांचा शैव संप्रदायामधिल कुंडलीनी महायोगाशी खुप जवळचा संबंध असावा असे नक्किच लक्षात येते.

कुंडलिनी, कुंडलीक, पुंडलीक, पांडुरंग, पंढरपुर या नावामधुन सुध्दा बऱ्याच गोष्टि स्पष्ट होतात. कुंडलिनी महायोगाचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये खुप लांबलचक व सुंदर वर्णन केलेले आहे. कुंडलिनी महायोग हा शिव व शक्ति यांच्या अध्यात्मिक व सांसारिक समन्वयाचा शास्त्रशुध्द योगप्रकार आहे. शैव संप्रदायामधिल नाथ संप्रदाय व तांत्रीक संप्रदायांनी त्याचा अध्यात्मिक साधनेसाठि खुप वापर केलेला आहे. नंतरच्या ईतर सामान्य संप्रदायांमुळे हा योगप्रकार सामान्य जनते पासुन अलिप्त राहिला आहे.

साधनावस्थेच्या सुरूवातीस साधक हा संसारी असतो म्हणजे स्त्रीशक्तिस्वरूप असतो परंतु जसजशी त्याचि साधना वाढत जाते व पराकोटिस पोहोचते त्यावेळी तो शिवस्वरूप होतो. हि कुंडलिनी महायोगाचि अतिशय थोडक्यात  माहिती म्हणता येईल. पाठिच्या मेरूदंडाच्या तळाशी मुलाधार चक्र आहे तिथे कुंडलिनी शक्ति साडेतीन वेटोळे घातलेल्या सर्पाच्या आकारामध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये असते. ध्यानसाधने मुळे मुलाधार चक्रास गती मिळते व शक्ति जागृत होऊन ती मेरूदंडामधिल सुषुम्ना नाडिमधुन वरवर सरकु लागते. ऊर्ध्वगमन करताना ती नाभी, ह्रदय, कंठ, दोन्ही भुवयांमधिल चक्रांना गतिमान करत मस्तकावरील सहस्त्रार चक्रापर्यंत येते जिथे भगवान शिवांचे स्थान आहे. शक्तिचे शिवाशी मिलन होते व साधकास परम समाधिअवस्था प्राप्त होते. समाधि अवस्थेमध्ये त्याला शिवाच्या पांढऱ्या शुभ्र म्हणजे त्यावेळच्या भाषेमधिल पांढुर रंगाचे दर्शन होते व त्यावरून पांढुररंग... पांडुरंग हे ईश्वराचे नाव पडले असावे.

साधकाच्या मुलाधार ते सहस्त्रार चक्रापर्यंतचा प्रवासाचे मुर्त स्वरूप म्हणजे पांडुरंगाचि मुर्ती होय. पांडुरंग वा मुर्तीमधिल आकाराचे कोणत्याहि वैदिक वा पौराणिक ग्रंथांमध्ये ऊल्लेख नाहित म्हणजेच हि मुर्ती कोणत्याहि हिंदु दैवतांची नाहि. जैन वा बौध्दांच्या शिल्पकलेशी कसलेहि साधर्म्य नाहि त्यामुळे ती महावीर वा बुध्दाचिहि नाहि. हिंदु, जैन व बौध्द या भारतीय धर्माशि कसलाहि संबंध नसतानाही हे क्षेत्र ईतके प्रसिध्द का असावे याचा विचार होणे आवश्यक आहे.

भक्त पुंडलिकांच्या कुंडलिनी महायोगामुळे अनेकांना अध्यात्मिक अनुभवांचि प्रचीती तात्काळ येत असावी त्यामुळे हे क्षेत्र ऊत्तर भारतीय धर्मांचे प्राबल्य निर्माण होण्यापुर्वी दक्षिणेकडिल निधर्मी सर्वसामान्यांच्या अध्यात्मिक ऊन्नतीचे फार मोठे केंद्र झाले असावे.

पांडुरंगाच्या ऊघड्या मुर्तिचा अभ्यास केला असता, पायाशी विट आहे, विट म्हणजे साधनेचा मुळ आधार असलेल्या मुलाधार चक्राची ती प्रतीक आहे. मुर्तीच्या मान ते कंबरेचे साधर्म्य हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. कमरेवरील हात हे एकमेकांना भेदुन जाणाऱ्या ईडा व पिंगळा नाडिंचे ते प्रतिक आहे. मधले शरीर हे सुषुम्ना नाडिचे प्रतिक आहे. डोक्यावरील शिवलींग हे शिवाचे प्रतिक आहे. कुंडलिनी महायोगाचे प्रतिक म्हणुन शिवलिंग व काहि ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचे प्रतिके वापरतात. शिवलिंगाचा खालील भाग योनी व वरील भाग हा लींग असा बिभस्त प्रकार दिसतो म्हणुन कदाचित भक्त पुंडलिकांनी शिव-शक्तिंच्या समाधि योगाचे नवीन प्रतिक म्हणुन हि मुर्ती तयार केली असावी. गळ्याखाली हि मुर्ती स्त्रीशक्ति स्वरूप दिसते तर गळ्यावरती ती शिवस्वरूप दिसते. तामिळ, आंध्रा, केरळ, कर्नाटक सहित महाराष्ट्र, गुजरात मधिल मुल निवासी भारतीय या मु्र्तीच्या ईतक्या प्रेमात का पडला असावा याचे खरे कारण म्हणजे शिव-शक्तिच्या समाधि मिलनाच्या साधनेचे ते एकमेव सत्य स्वरूप होय. सुमारे पाचशे वर्षानंतरच्या मराठि व कानडी संतांना हि माहीती ऊपलब्ध असणे शक्य नव्हते. त्यामुळे नंतरच्या वैष्णवी भक्ती संप्रदायांनी तिचि विष्णु, कृष्ण व विठ्ठल या स्वरूपामध्ये भक्ति सुरू केली असावी. भक्त पुंडलिकांच्या मंदिरा शेजारी मोठया पितळी नागाचि मुर्ती नेहमी असते, कुंडलीनी शक्तिचे तेही एक प्रतीक आहे.

शोध अस्तित्वाचा

वैज्ञानीक संशोधना मधुन हे सिध्द झाले आहे कि, १३.७ अब्ज वर्षांपूर्वी आतासारखे विश्व नव्हते. आताच्या विश्वामधिल सर्व ग्रह, तारे, आकाशगंगा मिळुन एक फार मोठि अजस्त्र अशी प्रचंड तापमानाचि एकच एक वस्तु अस्तित्वात होती. १३.७ अब्ज वर्षांपूर्वी त्या अजस्त्र वस्तुमध्ये प्रचंड मोठा महास्फोट झाला. त्या महास्फोटामुळे त्या अजस्त्र वस्तुमधिल सर्व काहि प्रचंड वेगाने सर्वदुर फेकले गेले. सुरूवातीस प्रचंड गती, प्रचंड ऊष्णता, एकमेकांवर आदळ आपट करत करत विश्व हळु हळु शांत होऊ लागले. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांच्या कोट्यावधि आकाशगंगा, तारे, ग्रह, ऊपग्रह, धुमकेतु आदि बनले गेले.
साधारणपणे महास्फोटा नंतर ६०० दशलक्ष वर्षांनंतर आपली आकाशगंगा बनली गेली. महास्फोटाच्या ९.५७ अब्ज वर्षांनंतर पृथ्वीसह आठ मोठ्या ग्रहांचे मिळुन आपले सौर मंडल विकसित झाले. पृ्थ्वी ग्रहावर थिअया नावाच्या एका छोट्या ग्रहाने जोरदार धडक मारली व त्यामधुन चंद्र या पृथ्वीच्या ऊपग्रहाचि निर्मिती झाली.
पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाल्यानंतर पृथ्वीवर जल निर्मिती झाली व कालांतराने सुमारे ३ अब्ज वर्षापुर्वी पासुन पृथ्वीवर जिवाश्म निर्मिती सुरू झाली. जिवाश्मापासुन प्राणवायु तयार झाला. नंतर वनस्पती, किटक, पशु, पक्षी यांनी पृथ्वी गजबजुन गेली. २ दशलक्ष वर्षांपूर्वी मनुष्याचा आद्य पुर्वज आदिमानव निर्माण झाला.
७५ हजार वर्षांपूर्वी आशिया खंडामधिल तोबा या बेटावर प्रचंड मोठा ज्वालामुखीचा विस्फोट झाला. संपुर्ण पृथ्वीवर त्यामधिल विषारी वायु, रसायने, राख पसरली गेली. ९९% जिवसृष्टिचा विनाश झाला, पृथ्वीचे तापमान ४°C ईतके कमी झाले, व नंतर १० वर्षे पृथ्वीवर हिमयुग अवतरले होते. अन्न व पाणि नाहिसे झाले होते. संपुर्ण पृथ्वीवर मध्य आफ्रिकेमधिल घनदाट जंगलामधिल फक्त ५००० च्या आसपास वन्यमनुष्य जिवंत राहिले होते. अचानक झालेल्या वातावरणा मधिल बदलाने घाबरून त्या सर्वांनी एकत्रीतपणे आफ्रिका सोडुन समुद्राच्या कडे कडेने पुर्व दिशेला मार्गक्रमण सुरू केले. अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये आफ्रिका, अरबस्तान मार्गे ते मजल दरमजल करत भारतामध्ये आले. भारतामध्ये तोपर्यंत वातावरण पुर्ववत झाले होते, अन्न व पाणि मुबलक मिळु लागले होते. भिषण परिस्थितीचा सामना करत आलेल्या त्या मनुष्य समुहाला भारत नंदनवन वाटु लागला व त्यांनी भारतामध्ये आपले बस्तान बसविले. शेती व गुरे पाळत त्यांनी आपली भाषा व रितीरिवाज समृध्द केले. हा एकत्र राहिलेला, समान भाषा बोलणारा व समान रीतीरिवाज पाळणारा मनुष्य समाज हळुहळू चारी दिशांना फैलावु लागला. भारतामधुन हाच मानव समाज युरोप, दक्षिण पुर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, ऊत्तर ध्रुव सगळीकडे पसरला. ५०,००० वर्षापासुन ते ३००० वर्षापुर्वी पर्यंतचा आधुनिक मानव हा देव व धर्म न मानता स्वतःच्या धाडसाच्या व बुध्दिमत्तेच्या जोरावर सर्व पृथ्वीवर निसर्गाशी एकरूप होऊन गुण्या गोविंदाने नांदत होता याचि साक्ष ईजिप्त, ईराण, भारतामधिल सिंधु संस्कृतीने दिली आहे. परंतु पोट भरले कि तत्वज्ञान सुचु लागते. माणसाची बुध्दिमत्ता जसजशी वाढु लागली तसतसे त्याला आकाश ठेंगणे वाटु लागले व त्याने आपल्या बुध्दिचि अचाट कल्पकता वापरून आकाशा मधिल बापाचा शोध लावला!!!
आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर 'आपण विचार करतो म्हणुन आपण आहोत' असे म्हणुन पाश्चात्य तत्वचिंतक गप्प बसले व वैज्ञानीक संशोधनाच्या मागे लागले. भारतीय नेहमी एक पाऊल पुढे असतात. आपल्या तत्वचिंतकांनी विचारशुन्य अवस्थेचा काल्पनीक शोध लावला व विचार नाहि म्हणजे आपण नाहि, हे जग सत्य नसुन एक माया आहे व या मायावी विश्वापलीकडे ईश्वर आहे व तोच एक सत्य आहे! झाले पिढ्यानपिढ्या सगळे अफाट बुध्दिमत्तेचे तरूण संन्यासी होऊन अफु गांजा सेवन करून विश्वा पलीकडिल ईश्वराचा शोध घेऊ लागले. देश दरिद्री झाला, नपुंसक झाला व परकिय सत्तांचा अगदि सहज गुलाम झाला. ज्या तत्वज्ञानाने भारत व भारतीयांचा विकास झाला नाहि तेच तत्वज्ञान परदेशात निर्यात केले जात आहे! विज्ञान व तंत्रज्ञान युगातील भारताचे पंतप्रधान परदेशात गायी घेऊन फिरत आहेत, हे किती भयानक व विदारक चित्र आहे?
करोडो वर्षामध्ये पृथ्वीवर जि काही उलथापालथ झाली त्यातुन अपवादाने प्रथम जिवसृष्टि व नंतर मानव प्राणि निर्माण झाला. पृथ्वी शिवाय ईतरत्र जशीच्या तशी उलथापालथ झाली असेल व तीथेहि जिवसृष्टि असेलच याचि फार कमी शक्यता आहे. त्यामुळे आपले अस्तीत्व फक्त या शरीरापुरतेच मर्यादित आहे. मनाच्या नादि लागुन आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यांचे खेळ बंद करून आपण आपला, आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास करूया.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पृथ्वीवरच्या सर्व जिवसृष्टिवर अधिराज्य गाजविणाऱ्या मानव प्राण्यामध्येच नंतर आपापसामध्ये स्पर्धा सुरू झाली. निसर्गाच्या नियमाविरूध्द राजसत्ता व धर्मसत्ता उदयास आल्या. त्यांच्यामध्ये एकमेकावर कुरघोडि करण्यासाठि एकिकडे रक्तरंजीत संघर्ष तर दुसरीकडे आधुनिक शस्त्रास्त्रांसाठिचे वैज्ञानिक संशोधन सुरू झाले. मानवता बाजुला पडली व सर्व गोष्टिंचे धर्मकारण व राजकारण सुरू झाले. या काळातील काहि महत्वाच्या घटना:

५००० वर्षापुर्वी ईजिप्त ते भारता पर्यंतचि सिंधु संस्कृती निर्माण झाली.
३५०० वर्षापुर्वी भारतामध्ये ऋग्वेदाचि निर्मिती
३२०० वर्षापुर्वी ईस्त्रायल येथे मोजेस या ज्यु धर्मगुरूने १० धर्माज्ञा दिल्या
२८०० वर्षापुर्वीच्या छांदोग्य ऊपनिषदामध्ये श्रीकृष्णाचा ऊल्लेख
२६०० वर्षापुर्वी ईराण मध्ये पारशी साम्राज्य व धर्म स्थापना
२५०० वर्षापुर्वी महावीर जैन व गौतम बुध्द यांचा जन्म व त्यांच्या धर्मांचि स्थापना
२३०० वर्षापुर्वी चंद्रगुप्त मौर्य याचे भारतामध्ये तर अलेक्झांडर याचे युरोपमध्ये साम्राज्य
२२०० वर्षापुर्वी सम्राट अशोक याचे साम्राज्य
२०२७ वर्षापुर्वी १५०० वर्षे युरोप, आफ्रिका व आशिया वर अधिपत्य गाजविणाऱ्या रोमन साम्राज्याचा ऊदय.
२००० येशु ख्रिस्त यांचा जन्म
१८०० वर्षापुर्वी भारतामध्ये गुप्त साम्राज्य, पुराण कथा व मंदिर निर्मितीस चालना
१४०० वर्षापुर्वी अरबस्तानात मोहम्मद पैगंबर यांचा इस्लाम धर्म
१२०० वर्षापुर्वी आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचि शिकवण भारतामध्ये रूजविली जि पुढे जाऊन हिंदु धर्माचा पाया बनला.
१५२६ भारतामध्ये बाबरचे मुघल साम्राज्य
१६७४ शिव राज्याभिषेक, मराठा साम्राज्य
१७०० पंजाब मध्ये गुरू नानक यांनी शिख धर्माची स्थापना केली.
१८५० भारतामध्ये ब्रिटिश कंपनीचे राज्य
१९१४ प्रथम विश्व युध्द, ३-४ कोटि मनुष्य हानी
१९३९ - १९४५ द्वितिय विश्व युध्द, ६ - ७ कोटि मनुष्य हानी, ब्रिटिश साम्राज्याचा अंत
१९४७ भारताची फाळणि व स्वातंत्र्य

लाखो वर्षांच्या मानवी ईतिहासामध्ये अलीकडच्या २-३ हजार वर्षापासुन देव, देश व धर्म यांचे खुळ मुठभर चतुर लोकांनी बहुसंख्य अज्ञानी लोकांच्या गळी ऊतरवले आहे. बहुसंख्य अज्ञानी समाज हा देव व धर्म यांच्यावरील श्रध्दांमुळे धार्मिक गुरूंच्या मोहजालामध्ये अलगद सापडला जातो. राजकिय नेते हे धर्मगुरू व धर्माला राजाश्रय देतात व देवाधर्माच्या नावाखाली अनियंत्रीत राज्य करतात हा ढळढळीत ईतिहास आहे. अमेरिकन, फ्रेंच, रशियन सामाजिक क्रांतीने धर्माला राजकारणा पासून वेगळे केले होते. भारतामध्ये गांधी व नेहरूंनीही धर्मास बाजुस ठेऊन निधर्मी प्रजासत्ताक निर्माण केले होते. परंतु भारत व ईतरत्र धर्म व राजकारण परत एक होत आहेत, परत मानवी रक्त सांडण्यासाठि. जोपर्यंत बहुसंख्य समाजाला खरा शास्त्रीय ईतिहास माहित होणार नाही तोपर्यंत मुठभर धर्मगुरू व भ्रष्ट राज्यकर्ते खोटा ईतिहास अंधश्रध्दांच्या अपप्रचाराद्वारे पसरवुन त्यांचि पिळवणुक करत रहाणार.

https://youtu.be/MX8j7aPnAuI

Friday, July 20, 2018

विठ्ठला तु वेडा कुंभार


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार |
     विठ्ठला तु वेडा कुंभार ||

मुक्ततेसाठि पुर्ण स्वातंत्र्य व पुर्ण स्वावलंबन आवश्यक आहे. मुक्तता हि कोणत्याहि साधनेने, कोणत्याहि ज्ञानाने वा कोणाच्याहि मदति शिवाय मिळत असते. मुक्ततेसाठि आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर जगातील कोणताहि जिवंत अथवा मृत गुरू आपणास मदत करू शकणार नाहि. ऊलट त्याचि संगत, त्याचि शिकवण व त्यांच्या साधना आपल्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करून आपला प्रवास लांबवु शकतात. मुक्ततेचा मार्ग हा पुर्णपणे निर्मळतेच्या तत्वावर आधारीत आहे तिथे ऊष्टे, खरकटे, फुकटे, ऊसनवार वा कर्जदार ज्ञानी बिलकुल चालत नाहित.

आपण कधि लक्षपुर्वक विचार केला आहे काय कि आपणास नक्की काय हवे आहे व ति आपली स्वतःचि ईच्छा आहे कि दुसऱ्यांच्या ईच्छांना आपण आपली ईच्छा समजत आहोत? ज्यावेळी आपल्या हे लक्षात येते कि आपण ईतरांनी सांगितलेले प्राप्त करण्यासाठीच जिवनभर धडपडत आहोत, त्यावेळी मग आपली ती प्राप्तिचि धडपड कमी होत जाते व ते आपले मुक्ततेच्या मार्गावरील पहिले पाऊल असते.

सर्व ईच्छांचा त्याग करणे हे जरी आवश्यक असले तरी त्याग करणे हि सुध्दा एक ईच्छाच आहे. मुद्दामहून एखादि गोष्ट करणे वा न करणे हे काहितरी करण्यासारखेच असते व त्यामधुन आपली प्राप्तिचि ईच्छा झळकत असतेच. अतिशय साधे व सहज जिवन जगणे हे खुप अवघड असते. अंतिम अवस्थेमध्ये यामुळे साधक अतिशय गोंधळुन जातो. मुद्दामहून काहि विशेष न करता व कोणतीहि बाह्य मदत न घेता सहज जिवन जगता आले कि आपले विचार कमी होतात व आपले शोधकार्य समाप्त होते. जोपर्यंत काहि हवे आहे तोपर्यंत शोध चालूच रहातो. परंतु अशी एक अवस्था आपल्या जिवनामध्ये येते ज्यावेळी आपणास जगाकडुन कसलीच अपेक्षा रहात नाहि तीच मुक्तावस्था होय बाकी सुख, आनंद, शांती वगैरे सर्व मनाचे खेळ आहेत जे ईतरांनी आपल्या डोक्यामध्ये टाकलेले त्यांचे ऊष्टे ज्ञान असते. 

आपले शरीर व भोवतालचे विश्व हेच केवळ सत्य आहे. या विश्वापलीकडे दुसरा कोणताहि स्वर्ग वा अध्यात्मिक विश्व नाहिये. आपल्या कडील पुर्व ज्ञानाच्या आधारे आपण अवती भोवतीच्या गोष्टि ओळखतो वा त्या अनुभव करत असतो. जर हे पुर्व ज्ञान व विचार आपणाकडे नसतील तर आपण आपल्या शरिरा सकट आपल्या भोवतालच्या विश्वाचा अनुभव करू शकणार नाहि. दररोजच्या गाढ झोपेमध्ये आपण याचा नित्य प्रत्यय घेत असतो. मग समाधीच्या प्रगाढ शांत अवस्थेमध्ये कोणी कसा काय बरे निर्गुण, निराकार अवस्थेचा शोध लावु शकेल? अनुभव घेणे हि मनाची एक क्रिया आहे ती साधक व साधु या दोघांमध्ये सारखीच असते. साधकास अनुभव येऊ शकत नाही परंतु साधुस तो अनुभव येतो असे म्हणणे चुकीचे व तो एकप्रकारे फसवणुकिचा प्रकार आहे.

मानवी उत्क्रांतीच्या एका ठराविक टप्प्यावर चार पायांवर आडवे रेंगणारा आदिम मानव दोन पायांवर ऊभा राहू लागला. त्यावेळी त्याच्या मज्जासंस्था व मेंदुचा वेगाने विकास होऊ लागला, तो अधिक विचार करू लागला, त्याच्या भाषेचा ऊदय झाला, त्याचि संवाद प्रक्रिया सुधारली, तो शस्त्रे बनवु लागला, तो शेती करू लागला, तो कपडे घालु लागला व त्यामधुनच तो आपल्या अवती भोवतीच्या ईतर प्राण्यांहुन स्वतःस श्रेष्ठ व विशेष असा जिव समजु लागला. निसर्गापासुन तो स्वतःस वेगळे करू लागला व त्याचवेळी त्याने विचारांच्या कल्पनेमधुन आपल्या भोवती चैतन्य, ईश्वर, भुतप्रेत यांचे एक काल्पनीक विश्व निर्माण केले. आपल्या नैसर्गिक विश्वामध्ये नसलेल्या गोष्टींच्या कल्पना तो त्या काल्पनीक विश्वामध्ये रंगवु लागला. संपुर्ण मानवजातीचि हि एक शोकांतिका आहे कि जे विश्व अस्तित्वात नाहि त्याचा कधिहि न संपणारा अखंड शोध सुरू झाला. या शोधावर कोणी आक्षेप घेऊ नये यासाठी त्याला धर्माचे व श्रध्दांचे स्वरूप दिले गेले. यास मानवी संस्कार व संस्कृतीचा सुरेख मुलामा दिला गेला आहे व तो मुलामा ईतका घट्टपणे मिसळला गेला आहे कि आपण आता त्याविना जगु शकत नाहि, आपण त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. सतत प्राप्त होऊ शकणाऱ्या सुखाच्या व आनंदाच्या शोधाच्या प्रयत्नात मानवजातीने आपली नैसर्गिक अवस्था हरवली आहे व हेच आपल्या सर्वांच्या दुःखाचे मुळ कारण आहे. निसर्गाच्या या अद्भुत व अद्वितीय अशा वसुंधरेचा आपण जास्त सुखाच्या हव्यासाने ईतका विनाश केला आहे व तिला ईतके विद्रुप केले आहे कि तिच्यावरील सुखाने जगणारे ईतर अनेक जिवजंतु व पशुपक्षी नामशेष होत चालले आहेत.

आतापर्यंतच्या सर्व अध्यात्मिक गुरूंनी त्यांच्या या विश्वा पलीकडिल काल्पनीक ज्ञानाचि व ते प्राप्त करण्याच्या साधनांचि भर सतत मानवी संस्कृतीच्या जडण घडणिमध्ये टाकली आहे. या अतिमानवीय ज्ञानामुळे मनुष्याच्या दुःखद जिवनांचि व्याप्ती वाढवण्यास हातभार लागला गेला आहे. सर्व अध्यात्मिक गुरूंनी निस्वार्थी, निष्कलंक, निष्काम आदर्श मानवी जिवनाचि संकल्पना मांडली आहे. निसर्गास आदर्ष जिवाची आवश्यकता नसते तो कुंभाराप्रमाणे मातीमधुन वेगवेगळे आकार बनवण्यात मग्न असतो.

https://youtu.be/LCfz-VbM5eI

Thursday, July 05, 2018

धर्मसत्ताक ते प्रजासत्ताक



ई.स. पुर्व सुमारे ३००० वर्षापुर्वी पृथ्वीतलावर स्वर्ग साकारला होता. कारण त्या काळि कोणताहि देव, देश वा धर्म अस्तित्वात नव्हता. त्यावेळी आताच्या ईराण, ईजिप्त पासुन ते भारता मधिल महाराष्ट्रा पर्यंत पसरलेल्या सिंधु नदिच्या संस्कृतीमध्ये हस्तकला, धातुशास्त्र, अनेक मजली भाजक्या विटांचि घरे, कालवे, स्नानगृहे, सांडपाणि वाहुन नेण्याचि व्यवस्था, रूंद रस्त्यांचे आखीव रेखीव शेकडो शहरे अस्तित्वात होती. राजसत्ते शिवाय व्यापार ऊदिम जोरात चालत असे याचा अर्थ सर्वत्र शांततापुर्ण सहजिवन होते. 

नंतर धर्म व राजसत्ता ऊदयास आल्या व त्या दोघांच्या एकत्रीत शक्तिने अनेक शतके सामान्य जनतेवर जुलमी राज्य केले होते. १८व्या शतकामध्ये अनेक वैज्ञानीक शोधांमुळे औद्योगिक क्रांती सामान्यांच्या मदतीला आली. औद्योगिक क्रांतीमुळे नविन संघटित मजदुर वर्ग निर्माण झाला व त्यांनी ऊठाव करून प्रथम जुलमी राजसत्ता ऊलथवुन टाकल्या, लोकशाहि शासन आणले व नंतर धर्मसत्तेला राजकारणा पासुन वेगळे करून निधर्मी लोकशाहि शासन यंत्रणा निर्माण केल्या.

जगभरामधिल असंख्य क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांचे मोल देऊन लोकसत्ताक शासन आणल्या नंतर सुध्दा १९४७ साली पाकिस्तान हे जगामधिल पहिले मुस्लीम राष्ट्र निर्माण झाले.धर्माच्या अतिरेकि वापराने ते आज अतिरेकि राष्ट्र झाले आहे. हा अनुभव आपल्या शेजारी असताना सुध्दा भारतामधिल राजकारणी सत्तेसाठि परत धर्माचा वापर करत आहेत. जो धर्म कधि निर्माण झाला नाहि, ज्याचि कोणि स्थापना केली नाहि, ज्याचा कोणि संस्थापक नाहि, ज्याचा अधिकृत ग्रंथ नाहि, नियम नियमावली नाहित त्यावर आधारित पोकळ राष्ट्रवाद बनविला गेला आहे व त्याचा साम, दाम, दंड, भेद नितीने देश विदेशामध्ये प्रचार व प्रसार चालु आहे.

धर्म निर्मितीचा खालील ईतिहास पाहिल्या नंतर धर्म हि एक अफुचि गोळि आहे हे आपल्या लक्षात येते.

ई.स.पुर्व २००० वर्षापुर्वी ईजिप्त मध्ये कोणत्याहि धर्मा शिवाय पिरॅमिड व त्याबद्दलचा ग्रंथ अस्तित्वात होते. 

ई.स.पुर्व १५०० वर्षापुर्वी कोणताहि धर्म अस्तित्वात नसताना भारतामध्ये पहिला वेद म्हणजे ऋग्वेद जन्माला आला होता. 

धर्म व राजसत्तेशिवाय सिंधु संस्कृती सारख्या एका फार मोठ्या भुभागावर साहित्य, संस्कृती, कलाकृती, व्यापार वगैरे मानवास शांततापुर्वक जिवन जगण्यास आवश्यक असणारे सर्व काहि चरम अवस्थेमध्ये नैसर्गिकरित्या प्राप्त होत होते. 

कालांतराने अतिशय हुशार परंतु स्वार्थी मनुष्यांनी धर्म व राज्ये स्थापन केली. सामान्य जनतेला देवा धर्माच्या श्रध्दांचे व देशप्रेमाचे डोस पाजुन त्यांना स्वतःचे गुलाम बनविले. त्यामुळे लढण्यासाठि व मजुरीसाठि स्वस्तामध्ये प्रचंड प्रमाणात जन शक्ति ऊपलब्ध होत असे. 

मानवतावादि तत्वचिंतक धर्म प्रेषितांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांचे संप्रदाय निर्माण केले. नंतर संप्रदायांच्या वर्तणुकिसाठि धर्मग्रंथ लिहिले गेले. राज्यकर्त्यांनी संप्रदायांच्या सामुहिक लोकशक्तिचा फायदा राजकारणासाठि केला तर धर्मगुरूंनी राज्यसत्तेच्या शक्तिचा ऊपयोग धर्मप्रसारासाठि करून घेतला. 

नंतर अस्तित्वात आलेले सर्व धर्म हे ज्या तत्वज्ञानावर आधारित आहेत ती वैदिक ऊपनिषदे हि ई.स.पु्र्व १२०० वर्षापुर्वी निर्माण झाली होती. मध्य आशिया मधुन हे ज्ञान सर्वदुर पसरले होते. जगभरामधिल तत्ववेत्त्यांच्या विचारसरणिंचा ऊपनिषदिक ज्ञान हा पाया आहे.

ई.स.पु्र्व ८०० वर्षापुर्वीच्या छांदोग्य ऊपनिषदामध्ये श्रीकृष्णाचा देवकिपुत्र व घोर अंगिरसांचा शिष्य असा ऊल्लेख आहे. भगवद गिता या काळामध्ये लिहिली गेली. परंतु हिंदु वा ईतर धर्म नव्हते.

ई.स.पु्र्व ८०० वर्षापुर्वी पार्श्वनाथ हे जैन तिर्थंकर होऊन गेले. परंतु जैन धर्म महाविरा नंतर खऱ्या अर्थाने सुरूवात झाला.

ई.स.पु्र्व ६०० वर्षापुर्वी ईराण मध्ये पारशी धर्म अस्तित्वात आला. 

ई.स.पु्र्व ५०० वर्षापुर्वी महाविर जैन व गौतम बुध्द होऊन गेले. 

ई.स.पु्र्व २५० वर्षापुर्वी सम्राट अशोकाने बौध्द धर्म स्विकारला व त्याचा सर्वदुर प्रसार केला. 

ई.स.पु्र्व ३० वर्षापुर्वी येशु ख्रिस्ताचा जन्म. 

येशुच्या निधना नंतर ई.स.३५० साली बायबल लिहिले गेले व ई.स.३८० साली रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्मास राजमान्यता दिली.

ई.स.५७० - ६३२ पैगंबर मोहम्मद यांचा कालावधि. मोहम्मद यांच्या मृत्युनंतर ई.स. ६५० साली कुराण लिहिले गेले. 

ई.स. ७८८-८२० हा आदि शंकराचार्य यांचा कालखंड. त्यांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला. त्यांच्या विद्वत्तेमुळे बौध्द धर्माचा भारतामधिल प्रभाव खुप कमी झाला. या काळापासुन जैन व बौध्द व्यतिरिक्त भारतीयांचा हिंदु असा ऊल्लेख परदेशी करू लागले. हिंदु धर्म स्थापन झाला नाहि तर ती ईतर धर्माची एक प्रतिक्रिया आहे. 

ई.स.१६९९ साली गुरू गोविंदसिंग यांनी शिखांचा खालसा निर्माण केला. 

संदर्भ: 
https://en.m.wikipedia.org/wiki/Indus_Valley_Civilisation
https://en.m.wikipedia.org/wiki/Timeline_of_religion

Sunday, July 01, 2018

सुखांचे मृगजळ


मनुष्य हा सुखी जिवनासाठि अखंडपणे प्रयत्नशील असतो. आपल्या जिवनामध्ये सुख येण्यासाठि व ते टिकुन रहाण्यासाठि त्याचि सर्व मेहनत चाललेली असते. कष्ट, मेहनत व हुषारीचे प्रयत्न कमी पडायला नको म्हणुन तो नशिबाचे प्रयत्न हि अजमावत असतो.

ज्यांना कष्ट व मेहनत न करता एैषोआरामामध्ये सुखी जिवन जगायचे आहे अशा हुशार लोकांनी नशीब, देव, धर्म, अध्यात्माच्या मनगढंत मालीका ऊभ्या केल्या. सांसारीक जिवनापेक्षा धार्मिक जिवन चांगले आहे व या दोन्हिपेक्षा अध्यात्मिक जिवन सर्वश्रेष्ठ आहे हे समाजाच्या मनावर पुर्णपणे बिंबवले गेलेले आहे. खरेतर धार्मिक व अध्यात्मिक जिवन असे वेगवेगळे काहि नसतेच, सर्व काहि सांसारीक आहे. सांसारीक मनुष्य मेहनत करत असतो व त्याच्या मेहनतीच्या जिवावर देवांचि, धर्मांचि व अध्यात्माचि शिखरे ऊभी आहेत.

सांसारीक, धार्मिक व अध्यात्मिक अशा तिघांनाहि सुख हवे असते. सुखाचि, स्वर्गाचि ईच्छा व मुक्तिचि ईच्छा या सर्व ईच्छा या सांसारीक ईच्छा आहेत. त्यांना कनिष्ठ व श्रेष्ठ बनविणारे आपले मन असते. प्रत्येकजण आपापल्या बुध्दिमत्ते प्रमाणे सुखाच्या शोधात असतात. सुख हे नेहमी आपल्या कक्षा रूंदावित असते. सांसारीक व धार्मिक सुख अल्पकाळ लाभते म्हणुन मग मनुष्य चिरकाल टिकणाऱ्या अध्यात्मिक सुखांकडे आकर्षित होतो.

आपले मन आपणास फसवित असते. प्रथम ते सुखाचे मृगजळ तयार करते व त्यासाठी आपणास त्याचा पाठलाग करावयास भाग पाडते. मनाचे सामर्थ्य अचाट आहे, ते आपणास पाहिजे तो अनुभव देऊ शकते. सुखाचा, आनंदाचा, शांतीचा, ऊन्मादाचा अनुभव आपणास आपले मन देण्यास सक्षम असते.

जोपर्यंत आपण सुखाच्या शोधात असतो तोपर्यंत मन आपल्या कक्षा रूंदावित राहते व तोपर्यंत आपण दुःखी राहतो.

सुखाचा शोध थांबायला हवा, सुखांचा शोध संपताच स्वर्गाचे व मुक्तिचे मृगजळ आपोआप समाप्त होते.

Thursday, June 28, 2018

अध्यात्मिक गुलामी


आपले सर्वांचे अध्यात्मिक ज्ञान हे अध्यात्मिक ग्रंथामधुन आलेले असते. या ज्ञानामध्ये आपले स्वतःचे असे काहिहि नसते. आपण ज्यांना गुरू समजत असतो त्यांनी सुध्दा गिता - ज्ञानेश्वरी तोंडपाठ केलेली असते. ज्ञानेश्वरी हि संस्कृत गितेचे प्राकृत रूपांतरण आहे. गिता हे ऊपनिषदांचे सार आहे. ऊपनिषदे हि प्राचिन ऋषि मुनींचे विचार आहेत. कोणताहि विचार मग तो अध्यात्मिक असो वा सांसारीक असो तो मनाचा आविष्कार असतो. मन व विचार हे अध्यात्मिक असु शकत नाहित. निर्गुण, निराकार, निर्विकार, निर्विचार अवस्थेमध्ये विचार व भावनांचा पुर्णपणे अभाव असतो. त्या अवस्थेचे आकलन होत नसते, त्या अवस्थेचे वर्णन करता येत नाहि व ति अवस्था नेमकि कशाने प्राप्त होते याचे नेमके ऊत्तर कोणाकडेहि नाहि. असे असताना अनेक संप्रदाय व अमेक गुरू परंपरा ऊभ्या राहिल्या आहेत. हे सर्वजण कोणत्या तरी महात्म्याचा वा ग्रंथांच्या आधारावर चाललेल्या असतात. ज्यांना अध्यात्माचे काहिच कळत नसते अशांना हे आपले शिष्य बनवतात. संप्रदायाचा जास्तीत जास्त प्रसार करणे हाच एकमेव सर्वांचा ऊद्देश असतो. अध्यात्मिक साधने एैवजी आश्रमाचा संसार सांभाळण्यासाठि शिष्यांना दिवस रात्र राबविले जाते.

आपण गुरू वा मंत्र अशा कोणावर तरी श्रध्दा ठेवलेली असते व त्या श्रध्देमधुन बाहेर पडण्यासाठि फार मोठ्या धैर्याचि आवश्यकता लागते. अध्यात्मामध्ये जोपर्यंत आपण कोणाचा तरी आधार घेत असतो तोपर्यंत आपण स्वतंत्र नसतो. जोपर्यंत आपण स्वतः स्वतंत्र नसतो व दुसऱ्यांच्या विचारांवर मनन, चिंतन व ध्यान करत असतो तोपर्यंत आपण त्या विचारांमध्ये अडकलेलो असतो. संप्रदायांचे गुलाम असो वा गुरूंचे गुलाम असो वा विचारांचे गुलाम असो, गुलामांना स्वातंत्र्याचि पहाट लाभत नाहि. सर्वप्रकारचि गुलामी झुगारून दिल्याशिवाय स्वातंत्र्याचा सुर्य ऊगवत नाहि.

जोपर्यंत आपणास धर्म, संप्रदाय, गुरू, ग्रंथ यांच्या मध्ये सत्याचा भास होत असतो तोपर्यंत आपण त्यांचे गुलाम बनुन रहात असतो. जर आपणास खरोखर सत्याचा ध्यास असेल तर आपणास या सर्व अधिकारी सत्ता स्थानांवरील ठेवलेला विश्वास व श्रध्दा काढावी लागेल. हे सर्व स्वतः चुकलेले आहेत व आपली दिशाभुल करत आहेत याबद्दल आपली खात्री व्हायला हवी. ज्यावेळी आपण या सर्वांच्या गुलामी मधुन मुक्त होऊ, स्वतंत्र होऊ त्यावेळी आपल्या सर्व चुकिच्या संकल्पना, चुकिचा शोध, चुकिचि ऊद्दिष्टे कोसळुन पडतील, आपले विचार व आपले मन आपले गुलाम होईल. असे जेव्हा होईल तेव्हा आपण त्या सत्याचे केवळ दार्शनिक नव्हे तर सत्यच होऊन राहु.  - यु जी कृष्णमुर्ती

Saturday, June 23, 2018

ब्रम्ह जिज्ञासेचे मृगजळ


निर्गुण, निराकार, अव्यक्त, कालातीत असे ज्या ईश्वरीय शक्तीचे वर्णन केले आहे त्यास अध्यात्मिक जगतामध्ये ब्रम्ह असे संबोधले जाते. आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ति सगुण, साकार, व्यक्त व समयबध्द अशी अवस्था आहे. समयबध्द अवस्थेमध्ये जगत असताना कालातीत अवस्था म्हणजे जिथे काळ नावाचि व्यवस्था नाहि अशा अवस्थे बद्दल आपण कसलीहि कल्पना करू शकत नाहि. कालातीत अवस्थेचा कसलाहि अनुभव करता येऊ शकत नाहि. त्या अवस्थेचे आकलन होणे शक्य नाहि. त्या अवस्थेस आपण पकडु शकत नाहि. मग त्या अवस्थेचे वर्णन करणे, तिच्याबद्दल लिहिणे वा तिच्याबद्दल बोलणे कोणासहि शक्य होत नाहि.

कालातीत अवस्थेचे ज्यांनी ब्रम्ह, परमात्मा, परमशांत, सच्चिदानंदमय असे वर्णन केले आहे तो एक फसवा मार्ग आहे. ज्यांनी त्या कालातीत अवस्थेचे वर्णन केले आहे ते स्वतः त्या फसव्या मार्गामध्ये स्वतः अगोदर फसलेले आहेत व त्यांचे अंधानुकरण करणारे परत परत फसत आहेत. या फसव्या भुलभुलैय्या मार्गामधुन बाहेर येण्याचि कोणतिहि पळवाट नसते. मृगजळाचा पाठलाग करणाऱ्यांचे क्षितीज कधि संपतच नसते. क्षितिजा पलीकडे जाण्याचा जेवढा प्रयत्न करू तेवढे ते विस्तारीत होत जाते. आपण सर्वजण या मृगजळाचे शिकार आहोत.

ब्रम्ह, साक्षात्कार वगैरे सर्व काहि केवळ मृगजळ आहे याचि खात्री होताच आपली धावपळ थांबते, शोध संपुष्टात येतो, महान ऊद्दिष्टे गळुन पडतात, असामान्य कल्पनांचे विश्व कोसळुन पडतात, जिवन अतिशय सामान्य व नैसर्गिक होऊ लागते. ज्या साक्षात्कारासाठि जंग जंग पछाडले होते त्याचा मागमुसहि रहात नाहि. - यु जी कृष्णमुर्ती

Tuesday, June 19, 2018

मुक्तावस्था



सर्व अध्यात्मिक गुरूंनी आपणास सांगीतले आहे कि परमेश्वर हा अव्यक्त, निर्गुण, निराकार असे ब्रम्ह आहे. ति एक अवस्था आहे व तिचा साकार विश्वाशी, साकार विश्वामधिल साकार जिवजंतु, प्राणि, वनस्पती यांच्याशी सुतराम संबंध नाहि. अव्यक्त, निर्गुण, निराकार ब्रम्हाचा कोणासहि, कोणत्याहि काळि कदापिहि अनुभव येऊ शकणार नाहि. म्हणजे ते आहे असेहि सांगता येऊ शकणार नाहि व ते नाहि असेहि सांगता येऊ शकणार नाहि. जर ते असेल असे मानले तरी ते साकार मुर्तीमध्ये तर नक्किच असु शकणार नाहि. व ते जर निर्गुण निराकार व अव्यक्त स्वरूपामध्ये राहु ईच्छित असेल तर ते आपल्या दैनंदिन जिवनामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या काहि प्रभाव पाडणार नाहि कारण जे निराकार आहे त्याच्या ध्यानीमनीहि (त्याला मन नसणार) साकार विश्व व त्यामधिल साकार सजीव व निर्जिव नसणार. त्यामुळे त्याचि भिती बाळगण्याचि आवश्यकता नाहि व त्याचि आराधना करण्याचिहि आवश्यकता नाहि.

निर्गुण निराकार अव्यक्त ब्रम्हाविषयी कसलीहि माहिती ऊपलब्ध होऊ शकत नाहि. ज्याचि आपणास कसलीहि माहिती नसते त्याचे ज्ञान होऊ शकत नाहि, त्याचे आपण वर्णन करू शकत नाहि. असे असताना ब्रम्ह हे सच्चिदानंदमय आहे, ते परमशांत, परमानंदमय, परमप्रेममय, परम चैतन्यमय आहे असे त्याचे वर्णन करणे रास्त नव्हे, चुकिचे आहे. हा केवळ बुध्दिमानांनी आपल्या बुध्दिचे वैभन दाखविण्यासाठि केलेला कल्पनाविष्कार आहे.

निर्गुण, निराकार ब्रम्हाचा कोणताहि अनुभव येऊ शकणार नाहि त्यामुळे त्याचि धारणा होऊ शकणार नाहि, त्याचे ध्यान करता येणार नाहि. ईतर सर्व साधना या सगुण, साकार विश्वामधिल लबाड मनुष्यांनी ऊदरभरणार्थ सुरू केल्या आहेत. निर्गुण निराकारास प्राप्त करण्याच्या कोणत्याहि साधना नाहित. आपण जे काहि करू ते सर्व भौतिक शरीर व मनाच्या माध्यमातुन करणार. शरीर व मन हे आपणास निराकाराच्या विश्वामध्ये घेऊन जाऊ शकत नाहित. जर साध्य निराकार असेल तर साकार साधना ऊपयोगाच्या नाहित.

मुळात निर्गुण निराकार अव्यक्त ब्रम्ह वगैरे काहिहि नाहिये. साध्यच नाहिसे झाले कि साधना आपोआप नाहिशा होतात. जोपर्यंत आपण काहितरी आहे असे गृहित धरतो तोपर्यंत आपण त्यासाठि काहिंना काहि करत रहातो. प्राप्त करण्यासारखे ब्रम्ह, ईश्वर, परमात्मा, आत्मा, आत्मसाक्षात्कार वगैरे काहिहि नाहिये हे लक्षात येताच आपली फार मोठ्या शोधापासुन मुक्तता होते, आपण शांत होतो, आपली भिती नाहिशी होते. आपण आपल्या नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. हव्यास, अपेक्षा, सततचा शोध यांच्या दुष्टचक्रामधुन आपली जेव्हा सुटका होते तोच मुक्तीचा क्षण असतो व त्यानंतरचि अवस्था हिच मुक्तावस्था असते.

यु जी कृष्णमुर्ती

Sunday, June 17, 2018

Ultimate Reality

We all are interested in experiencing unknown, ultimate reality. How can unknown ever become known? Not a chance. We can not experience unknown. Ultimate reality is not negation like 'Neti Neti’, negative approach of Vedas. When they failed in positive approach then they invented 'Neti Neti’ the negative approach. But 'Neti Neti’ is still a positive approach because they are interested in reaching their goal and all goals are positive goals.

There is no such thing as Beyond or Unknown or Ultimate reality. Unless we understand this, we will keep doing something to experience unknown. The search will not end as long as goal is there. There is no way to know unknown by anyone and no one can express it. When this dawns on us then all goals, all hopes goes off. There is nothing to search, nothing to understand. When this search is not there or any movement to know unknown is not there then what will happen no one can imagine. Bliss, Love are all poetic concepts only. 

Meditation will not help us to realise unknown. Meditation is like drugs which can damage our sensory system. Teachers ask us to control our thoughts and be aware of thoughts, but it's just not possible to be aware of thoughts and we can't control thoughts. We can't separate ourselves from thoughts and say these are my thoughts because we are actually thoughts. If thoughts are not there, we won't be there, no one will be there to observe the thoughts. Everything around us is created by thoughts including illusion of our own existence. If thoughts are not used just for their original basic purposes then it becomes our enemy, it creates illusions after illusion and we lost ourselves in those illusions.

If someone experiences space between two thoughts as thoughtless state, he feels extraordinary about it but its again thought induced space between two thoughts. Thoughts are very much there, space is just pause between two thoughts. To control thoughts we are asked to control breathing, this may choke and damage our body. We can't achieve that state by any efforts, all our actions should fall to their natural state.

- U G Krishnamurti

चिरंतन सुखाचे रहस्य


सजीवांना स्वतःचे संरक्षण, संगोपन व प्रजोत्पादन करण्यासाठी विचारांचि गरज असते. मनुष्य सोडुन ईतर सर्व सजीव केवळ त्याच कामासाठि विचारांचि मदत घेतात व स्वतःस अधिक विचारां पासुन अलीप्त ठेवतात. मनुष्य प्राण्याला अधिकाधिक व चिरंतन सुख हवे असते, दुःख कदापिहि नको असते यासाठी तो अधिकाधिक विचार करत बसतो. विचारांनाहि स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असते त्यासाठि विचारांनाहि सातत्य हवे असते. अधिकाधिक सुखांच्या लालसेने मनुष्याने प्रथम देवाचि निर्मिती केली नंतर धर्मांचि निर्मिती केली व त्यानंतर विज्ञानाचि निर्मिती केली. धर्म मार्तंडांनी, अध्यात्मिक गुरूंनी व वैज्ञानीकांनी चिरंतन सुख शक्य आहे असे सांगितले व सर्वजण त्याच्या शोधासाठि अहोरात्र झटत आहेत. मनुष्याला धार्मिक कर्मकांडामध्ये सुख सापडले नाहि म्हणुन काहिंनी अध्यात्माचा मार्ग पकडला तर काहिंनी विज्ञानाचा मार्ग पकडला. दोघांचाहि सतत शोध चालु आहे. अध्यात्मिक गुरूंनी ध्यानसाधना करून काल्पनीक आत्मा व काल्पनीक परमात्म्याचा शोध लावुन स्वत:चि व आपल्या भक्तांचि घोर फसवणुक केली आहे व भविष्यामध्ये हि ते चालुच राहणार आहे. वैज्ञानीकांनी भितीवर मात करण्यासाठी भयंकर अस्त्रे, शस्त्रे व रोबोट बनवुन मानवाच्या विनाशाचि पायाभरणि केली आहे. या दोघांनिहि मनुष्याला कष्ट, मेहनत न करता व नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करत एैषोआरामामध्ये कसे जगायचे यावर आपल्या मोठमोठ्या संस्था ऊभारल्या आहेत. एैषोआरामामध्ये राहणे म्हणजेच सुख अशी त्यांचि जाहिरात करणारे पटवुन देण्यात यशस्वी झालेले आहेत.

मनुष्याला देव, धर्म, धर्म मार्तंड, गुरू व विज्ञान चिरंतन सुख कदापिहि देऊ शकणार नाहित कारण या सर्वांचा पाया स्वार्थी विचार हे आहेत. विचार हे स्वार्थासाठीच निर्माण होतात त्यामुळे त्यामधुन निष्काम कर्म योग साधणे अशक्य आहे. भौतीक सुखाचि अपेक्षा असो वा अध्यात्मिक मुक्तिचि अपेक्षा असो दोन्हि सारखेच आहेत कारण दोन्हिमध्ये अपेक्षा आहेत व अपेक्षा हि स्वार्थीच असते.

निसर्ग हा सतत बदलत असतो, त्याला नित्य नुतन वैविध्य हवे असते. निसर्गामध्ये चिरंतन काहिहि नसतेे. आपल्या सभोवतालचे विश्व आहे तसे म्हणजे त्यामधिल सुखदुःखांसहित स्विकार करायला शिकलो कि स्वार्थी विचार आपणास मुर्ख बनवित नाहित. अधिकाधिक व चिरंतन सुखांचि लालसा दाखविणारे सर्व विचार हे मनुष्य जातीचे शत्रु आहेत याचि खात्री आल्यानंतर चिरंतन सुखांचि आवश्यकता संपुन जाते. सुखांचि अपेक्षा संपल्यानंतर दुःख वाट्यास येत नाहि.

ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ति असो द्यावे समाधान ।।

Sunday, June 10, 2018

अंतीम सत्याचा सावळा गोंधळ

स्वर्ग, ईश्वर, आत्मा आदि संकल्पनांमुळे अंतीम सत्याचा फार मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ते अंतीम सत्य काय आहे हे कोणिहि अनुभवु शकत नाहि यामुळे ते आहे अथवा नाहि याचा कोणि पडताळा घेऊ शकत नाहि. तरीहि ब्रम्ह सत्य आहे असे समजायचे व नित्य अनुभवास येणारे जगत मात्र मिथ्या समजायचे. हे शब्दांचे खेळ बुध्दिमंत विचारवंतांनी अनेक शतके चालविलेले आहेत. खरेतर आपल्याभोवती असलेले जग हेच सत्य आहे. बुद्धिमान विचारवंतांनी बनविलेल्या काल्पनीक अंतिम सत्याचा व या वास्तविक सत्याचा परस्पर संबंध नाही. जोपर्यंत आपण अंतीम सत्यास आपल्या कल्पनाविश्वामध्ये शोधत राहु तोपर्यंत वास्तवामध्ये असलेले सत्य आपणास दिसणार नाहि.

काल्पनीक परमशांती प्राप्त करण्यासाठी आपण वास्तविक सत्यापासुन पळ काढत असतो व त्यासाठि जे काहि करतो त्यामुळे या जिवामध्ये विद्यमान असणारी सहज शांतअवस्था लक्षात येण्यास अडथळे निर्माण होतात. भोवतालच्या जगताशी आपला सुसंवाद साधणे हि खरी शांती होय. आपणास या जगामध्ये सुखा समाधानाने जगायचे असेल तर या जगाच्या म्हणजे समाजाच्या नितीनियमां प्रमाणे वागणे फार महत्वाचे असते. संस्कृतीने व समाजाने लादलेल्या वास्तवतेचा स्विकार करत असताना हे सुध्दा ध्यानात घ्यायला हवे कि काल्पनीक स्वर्ग वा मुक्तावस्था प्राप्त करण्यासाठी आपण काहीहि करू शकत नाही.

जेव्हा स्वतःस फार मोठा पुण्यात्मा बनविण्याचि ईच्छा संपुष्टात येते आणि आत्मसाक्षात्कारा सारखी आदर्श ऊद्दिष्टे पुर्ण करण्याचि मागणि नसते तेव्हा आपण आपल्या वास्तविक नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. या अवस्थेमध्ये आपला आपणाशी संघर्ष नसतो, आपला समाजाशी संघर्ष नसतो. जेव्हा आपण आपल्या स्वतःशी शांततापूर्ण असतो तेव्हाच आपण समाजातील इतरांशी शांततापुर्ण सौहार्दाने नांदु शकतो.

जेव्हा आपणास जगापासुन काहीही नको असते,  जेव्हा आपण कशाचाही शोध घेत नसतो, जेव्हा देव, गुरु, ग्रंथ, त्यांची शिकवण आणि त्यांचि साधना यांसारख्या बाहेरील हालचाली जेव्हा नसतात, तेव्हा आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या जीवनऊर्जा प्रवाहास ऊर्ध्वगती प्राप्त होते, या ऊर्ध्वगतीचा अनुभव करता येत नाहि. प्राणशक्तीच्या ऊर्घ्वगतीस बाह्यशक्तिंचि आवश्यकता नसते, तिला पुर्णपणे स्वातंत्र्य हवे असते, स्वतःचा वेगळा प्रवाह हवा असतो व सर्वार्थाने एकांताचि शुन्यावस्था हवी असते.

मी ध्यानसाधने विरूद्ध नाही. परंतु, आपण आपल्यासमोर ठेवलेले तथाकथीत निस्वार्थी बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे ते साधन नाही. आत्मसाक्षात्काराचे लक्ष्य आणि ते प्राप्त करण्यासाठी लागणारे ध्यानाचे तंत्र हे दोन्हि आत्मकेंद्रित आहेत. आणि आपण यादोघांद्वारे जे काही मिळवू इच्छितो तोही स्वार्थी क्रियाकलाप आहे. काहितरी केल्याने सहज अवस्था प्राप्त होत नाहि व काहि न केल्याने सुध्दा सहज अवस्था प्राप्त होत नाहि. 

- यु जी कृष्णमुर्ती

Thursday, May 31, 2018

सामान्य बनणे अवघड आहे


आपली आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी मी आपणास काही मंत्र देण्यासाठि येथे आलो नाही. गुरु, ग्रंथ, आध्यात्मिक साधना इत्यादी सारख्या बाहेरच्या सहाय्यकाचि याकामी मदत होत नसते. जेव्हा बाहेरील सहाय्यकावर आपली मदार असते तेव्हा तिथे तो काहितरी करेल अशी आशा असते आणि ही आशा आपणामध्ये असहायता निर्माण करीत नाही. आपण स्वतः काहि न करता सर्व काहि त्याच्यावर सोपवुन निर्धास्त होतो. बाह्य मदत आपणास सत्य समजण्यास अडथळा निर्माण करते. मला याबद्दल निश्चित खात्री आहे परंतु ही निश्चितता मी इतरा मध्ये प्रसारित करू शकत नाही, अर्थात ईतर कोणिही तसे करू शकत नाहि. जे तसे सांगतात ते निश्चिपणे फसवेगिरी करत आहेत.

आत्मसाक्षात्कारा सारखी आध्यात्मिक ध्येये हि आपल्या अध्यात्मिक सत्याच्या शोधासाठी जबाबदार आहेत. जोपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाहि तोपर्यंत आपला सत्याचा शोध चालुच रहातो. खरेतर तथाकथित आध्यात्मिक ध्येये हि सुध्दा आपली स्वतःची नसतात. संस्कृती, संस्कार यांनी तीं आपणावर बिंबवलेली असतात. संस्कृती व संस्कारा मधुन आलेले ज्ञान आपली अध्यात्मिक ध्येय निश्चित करत असतात. आपण त्यांना अध्यात्मिक म्हणत असतो परंतु त्यांचे खरे स्वरूप हे सांसारीकच असते. अध्यात्मिक साधने द्वारे आपली सांसारीक दुःखे कमी होतील हा त्या मागचा उद्देश असतो. आपण आपले सांसारीक जिवन, धार्मिक वा अध्यात्मिक जिवन असे तुकडे करतो ते चुकिचे आहे कारण सर्व काहि संसारासाठिच, सुखासाठि चाललेले असते.

आपल्या शरिरास आत्मसाक्षात्कार, परमानंद, परमशांतीचि आवश्यकता नसते. मन जे विचार व माहितींचे माहेरघर असते त्याने या काल्पनीक अवस्था बनविल्या आहेत व त्यांचे ध्येयामध्ये रूपांतरण झाले आहे. ध्येयप्राप्तीसाठि सत्याचा शोध व सत्याच्या शोधासाठी गुरू, त्यांचे ग्रंथ, धर्म, रिती रिवाज आदि बाह्य संस्कृतीचा व संस्कारांचा डोलारा ऊभा राहिला आहे. आता या पोकळ डोलाऱ्याचा ईतका विस्तीर्ण विस्तार झाला आहे कि त्यामध्ये अध्यात्मिक ध्येये व सत्याचा शोध सुध्दा हरवले गेले आहेत.

हे लक्षात येणे अतिशय महत्वाचे आहे कि काहिहि समजण्याचे नाहि. काल्पनीक असणाऱ्या अध्यात्मिक ध्येये व सत्याच्या शोधाचा अंत व्हायला हवा. अधिकाधिक धार्मिक ज्ञान प्राप्त करण्याचे थांबले गेले पाहिजे. आपणा जवळ जे धार्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाने आपल्या मानवी समस्या सोडविल्या नाहित. संस्कृतीप्रधान पुर्वेकडिल देश पश्चिमेकडिल भौतीक दृष्ट्या प्रगत देशाकडे याचना करत फिरत असताना दिसते. संस्कृतीने जे प्रश्न सोडविले नाहित ते प्रगत तंत्रज्ञानाने सोडविले आहेत हे मान्य करावे लागेल. धार्मिक ज्ञान आपल्या समस्या सोडवेल या आशेने आपण ते गोळा करत असतो परंतु ते अधिक समस्या निर्माण करत असते. धार्मिक ज्ञानाचे भांडार ऊपलब्ध असताना म्हणजे त्यामध्ये मानवीय समस्यांचि तथाकथित ऊत्तरे असताना सुध्दा तरीहि समस्या शिल्लक आहेत कारण हे तकलादु धार्मिक ज्ञान व त्याचि ऊत्तरे समस्या सोडविण्यासाठि असमर्थ आहेत. धार्मिक ज्ञान पुर्णपणे नाकारल्या नंतर या ज्ञानाने निर्माण केलेला आशेचा ब्रम्हराक्षस कोसळुन पडेल व मनुष्य आपल्या नैसर्गिक अवस्थेमध्ये परत येईल त्याच्या सर्व समस्या आपोआप नाहिशा होतील.

सामान्य मनुष्याचे जिवन जगणे हे तसे अगदि सोपे असते, काहि विशेष करायचे नसते परंतु ते अतिशय अवघड झाले आहे. प्रत्येकास जो तो आहे त्या एैवजी काहितरी वेगळे बनायचे असते.यासाठि भरपुर खटाटोप करावा लागतो, आपल्या अस्वस्थ जिवनाचे हेच कारण आहे. काहितरी असामान्य, विशेष, अर्थपुर्ण कर्तुत्व करण्याच्या हव्यासापोटी आपण आपले स्वास्थ्य, मनः शांती हरवून बसतो. जेवढा जास्त वेळ आपण प्राप्तीच्या मागे लागु तेवढा जास्त वेळ आपणास सामान्य मनुष्य बनण्यास लागेल.

- U G Krishnamurti

Monday, May 28, 2018

मन के विभिन्न रूप

Our all desires or different forms of wants are originated from single source that is the mind. So basically all desires must be the same. Desires of having good food, good clothes, good shelter, beautiful companion, good entertainment should be of the same kind. To avoid boredom mind had created different forms of desires and separated them from each other.

So one can abstain from one form of desire say like sex but he may enjoy himself by fulfilling his other forms of desires like having good foods or listening to music or wandering world over etc. The real experiencer is not the body but the mind. Mind enjoys himself with the help of different organs of the body like skin, nose, ear, eyes, taste etc.

If desire of more and more fun is not there then one can be satisfied with just seeing his or her companion then there should not be any further need to actions like touching, kissing etc.


हमारी सभी इच्छाओं या इच्छाओं के विभिन्न रूपों का जन्म एकल स्रोत से हुआ है, जो दिमाग है। तो मूल रूप से सभी इच्छाएं एक जैसी होनी चाहिए। अच्छे भोजन, अच्छे कपड़े, अच्छा घर, सुंदर साथी, अच्छे मनोरंजन की सारी इच्छाये एक ही तरह की होनी चाहिए। बोरियत दिमाग से बचने के लिए इच्छाओं के विभिन्न रूप पैदा हुए थे और उन्हें एक-दूसरे से अलग कर दिया था।

तो कोई भी आदमी इच्छा के एक प्रकार से दूर रह सकता है, जैसा कि सेक्स लेकिन वह अपने अन्य प्रकार की इच्छाओं को पूरा करके आनंद ले सकता है जैसे अच्छे भोजन या संगीत सुनना या दुनिया भर में घूमना आदि। असल मे अनुभव करनेवाला, आनंद लेनेवाला शरीर नहीं बल्कि दिमाग है। मन त्वचा, नाक, कान, आंखों, स्वाद इत्यादि जैसे शरीर के विभिन्न अंगों की मदद से खुद को आनंदमय रखता है।

यदि अधिक से अधिक मज़े चखने की इच्छा नहीं होती तो कोई भी अपने साथी को देखकरहि संतुष्ट हो सकता था। ऊसे स्पर्श करने, चुंबन लेना आदि जैसी अधिक की कोई और आवश्यकता नहीं होनी चाहिए थी।

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ।। 

|| Gita 15.9 ||