Sunday, August 05, 2018

देव, देश व धर्म कोणांसाठि?


हजारो वर्षापुर्वी ज्यावेळी पृथ्वीतलावर सर्वत्र जंगल होते त्यावेळी आदिमानव अन्न व स्वतःच्या संरक्षणार्थ पृथ्वीवर सतत दाहि दिशा फिरत असे. त्यामुळे कोणताहि मानवी समाज हा एका ठराविक भौगोलिक प्रदेशाचा मुळचा रहिवासी वा मालक नाहि. आज जगामधिल सर्व मानव हे एकाच गुणसुत्रांचे आहेत कि जे सर्वात अगोदर सापडलेल्या होमी सेपियन या आफ्रिकेच्या जंगलातील आदिमानवाशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे कोणिहि खरा भुमीपुत्र नाहि, कोणि ऊच्च वर्णिय नाहित तर कोणि निच जातीचा नाहि.

मानवी समाज भटकत असताना व ऊत्क्रांत होत असताना भाषा, अग्नी, शेती, वस्त्र, धातु आदिंचे शोध लागत गेले व कालांतराने तो स्थीराऊ लागला. वस्ती, गावे, नगरे निर्माण होऊ लागली, जमीन जायदादिच्या वाटपातुन संघर्ष निर्माण होऊ लागले, बळी तो कान पिळीतुन राजसत्ता निर्माण झाली. नैसर्गिक आपत्तींना घाबरणारा मनुष्य सहाय्या साठि आकाशाकडे बघु लागला व समाजातील काहि धुर्त लोकांनी आकाशा मधिल बापाचि म्हणजे दैवी शक्तिचि संकल्पना निर्माण केली. दैवी शक्तींशी संपर्क साधणारा नवीन पुजारी वर्ग व त्यांच्या गुरू शिष्य परंपरा सुरू झाल्या. यामधुनच नंतर धर्म तयार झाले. राजसत्ते बरोबर धर्मसत्ता सुध्दा प्रबळ झाल्या व दोघांना अधिकाधिक सत्ता व अधिकाधिक सुखांच्या लालसा निर्माण होऊ लागल्या. या लालसेमधुन अधिकाधिक सुखांच्या नवनविन वस्तुंचि निर्मिती व त्यांचा व्यापार सुरू झाला व तिसरा धनिकांचा व्यापारी वर्ग निर्माण झाला. राजसत्ता, धर्मसत्ता व धनीकसत्ता यामधिल अल्पसंख्य सत्ताधाऱ्यांनी ऊर्वरीत बहुसंख्य समाजास आपले गुलाम बनविले. सामान्य जनतेच्या अभ्युदयासाठी काल्पनीक देव, देश व धर्म यांचे संरक्षण करणे हेच सर्व समाजाचे कर्तव्य आहे हे अपप्रचाराने पटवुन देण्यात सत्ताधारी कमालीचे यशस्वी झाले. बहुसंख्य समाज एकत्र येऊन त्यांचि मोठि ताकद निर्माण होऊ नये यासाठि त्यांच्यामध्ये अनेक जाती जमाती व कुळे निर्माण करून त्यांच्यामध्ये सतत संघर्ष होत राहिल यासाठि सत्ताधारी नेहमी राजकारण करत राहिले.  सत्ताधाऱ्यांच्या देव, देश व धर्मांच्या रक्षणासाठि बळि मात्र सामान्य, अशिक्षित, अज्ञानी गुलामांचे जात राहिले.

औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावरील गुलाम मजदुर समाज एकवटु लागला, सुशिक्षित होऊ लागला. पश्चिमे कडिल गुलामांना देव, देश व धर्मापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे श्रेष्ठ वाटु लागले व त्यामधुन अमेरिकन, फ्रेंच, रशियन राज्य क्रांती झाल्या व तेथील सर्वसामान्य जनतेने प्राणांचे बलिदान देऊन राजसत्ता व धर्मसत्ता ऊलथवुन टाकल्या व जनतेचे जनतेने चालविलेले लोकशाहि राज्ये निर्माण केली. याचे लोन सर्व जगभर पसरले व सर्वत्र लोकशाहि जनसत्ता निर्माण होऊ लागल्या.

लोकशाहि जनसत्तेने राजसत्ता पुर्णपणे नामशेष केल्या परंतु धर्मसत्ता अजुनही आपला प्रभाव राखुन आहेत. भ्रष्ट कारभाराने राजसत्ता लोकांच्या मर्जीतुन ऊतरल्या परंतु देव, धर्म, गुरू व त्यांचे धर्मग्रंथ यांच्यावरील अंधश्रध्दांमुळे धर्मसत्ता जिवंत राहिली व जगभर ति परत अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर न करता धर्मगुरू व त्यांच्या धार्मिक ग्रंथांवर डोळे झाकुन विश्वास ठेवतात व त्यांचि गुलामी आनंदाने स्वीकारतात. श्रध्दांचि नशा ईतकि भिषण असते कि विज्ञान युगामधिल सुशिक्षित भक्तगण सुध्दा त्या श्रध्दांसाठि आपले सर्वस्व पणाला लावण्यास तयार होतात.

भारताचा ईतिहास पाहिला असता साधारण ३००० वर्षापुर्वी राजसत्ता व धर्मसत्ता स्थिरावण्यापुर्वी भारत खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम् शस्य शामलाम होता. परंतु नंतर राजसत्ता, त्यांचा सत्तासंघर्ष, कलींगचा भिषण नरसंहार, बुध्द, महावीर, वेदांती, ब्राम्हण यांचे संन्यासी धर्म, संप्रदाय यांनी भारतातील स्वयंपुर्णता व स्वसंरक्षण सिध्दता पार कोलमोडुन पाडली व अनेक शतके भारत परक्यांची दस्युभुमी बनला गेला.

ब्रिटिशांच्या नंतर कंगाल भारत निधर्मी, लोकशाहि देश बनला. पहिला आघात धर्मानेच केला व भारताचि फाळणि झाली. स्वातंत्र्याच्या सुखाचि स्वप्ने पहाणाऱ्यांचा पहाटेच स्वप्नभंग झाला. नंतर कॉंग्रेस राज्यकर्ते व सरकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनविला. ३० वर्षापुर्वी सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नसणाऱ्या भाजपाने अयोध्येमध्ये रामजन्मभुमीचा शोध लावला व धार्मिक दंगेधोपे करत सत्ता हस्तगत केली. ना परकीयांनी, ना कॉंग्रेसने व ना भाजपाने जनतेचे प्रश्न सोडविले. कारण राज्यकर्ता हा ना परकिय असतो ना स्वकिय असतो. तो फक्त सत्ता संपादन व सत्ता टिकविणे यामध्येच व्यस्त असतो. तो जनतेला परत परत देव, देश व धर्म यांचि गाजरे दाखवुन खेळवत असतो.

जनता हि धर्म, भाषा, प्रांत, जात, संप्रदाय, वर्ग यामध्ये विभागलेली असते. समाजामध्ये जितकी जास्त विभागणि असते तितके जास्त त्याचे राजकारण करता येते व तितके जास्त राजकारणी निर्माण होत असतात. फोडा व राज्य करा हि निती अनेक प्रकारच्या विभाजनांमुळे प्रचंड यशस्वी होत असते. त्यामुळे समाज तिथेच राहतो व राज्यकर्ते मात्र त्यांच्या जिवावर सर्वसत्ताधिश होत असतात.

संपुर्ण समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी समाजामधिल सर्व प्रकारच्या विभाजनाच्या दऱ्या भरल्या गेल्या पाहिजेत. देव, धर्म, धर्मगुरू, धर्मग्रंथ हे चतुर मानवांनी आपल्या स्वार्थासाठी बनवलेली श्रध्दास्थाने आहेत त्यांचा सत्याशी सुतराम संबंध नाहि हे आपल्या आजपर्यंतच्या अनुभवांनी व वैज्ञानीक संशोधनाने सप्रमाण सिध्द केले आहे. जोपर्यंत या श्रध्दास्थानां वरील लोकांचि विश्वासार्हता कमी होणार नाहि तोपर्यंत समाजा मधिल धर्म, जातींची विभागलेली दरी आपण भरू शकणार नाहि व सत्ताधारी या विभाजनांचा राजकारणासाठी वापर करतच राहणार. या विभाजनांमुळेच युध्दे व दंगली होत असतात व गोरगरीब समाज त्यामध्ये नाहक होरपळला जात असतो. धर्म व जाती व्यवस्था राज्यकर्ते व धार्मिक संस्था कधिहि नष्ट करणार नाहित ऊलट त्यांचे ते आरक्षणच करत राहतील कारण तेच त्या सर्वांचे मोठे चराऊ कुरण आहे.

समाजामधुन दुहिचि पाळेमुळे नष्ट करावयाची असतील तर समाजासच पुढाकार घ्यावा लागेल, त्यासाठि ...
देव, देश व धर्मासाठि वाया जाणारी आपली सर्व शक्ति व बुध्दि हि आपल्या स्वतःच्या विकासासाठी वापरावी.
जात व धर्म हे काल्पनीक आहेत म्हणुन आंतर धर्मिय व आंतर जातीय विवाहांना प्राधान्य द्यावे. समाजाने अशा विवाहितांनाच नोकरीमध्ये आरक्षण वा व्यवसायासाठी व संसारोपयोगी बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना संरक्षीत व प्रोत्साहित करावे.
आपल्या गुलामीचि प्रतीके असणारे सर्व खर्चिक धार्मिक समारंभ व केंद्रे बंद करून फक्त राष्ट्रिय स्मारके व राष्ट्रिय समारंभ साजरे करण्यास प्राधान्य द्यावे.
जनगणने मध्ये आपली जात व आपल्या धर्माचा ऊल्लेख टाळावा.
जातीय व धार्मिक प्रचार करणाऱ्या राजकिय पक्षांना मत देणे टाळावे.

मानवाचि मुक्तता हि देव, देश व धर्म कदापिहि करू शकणार नाहित कारण त्या त्याच्या बेड्या आहेत. स्वातंत्र्य, समता व बंधुता याच मानवाच्या मुक्ततेच्या खऱ्या खुऱ्या पायऱ्या आहेत.

No comments: