Friday, August 24, 2018

‘मी’ च्या चैतन्याचि जाणिव हा मेंदु निर्मित भ्रम आहे


अध्यात्मिक ध्यान साधने मधुन जे काहि अतींद्रिय अनुभव साधकास येतात वा साधकाच्या जीवनशैली मध्ये जो आमुलाग्र बदल होतो तसेच बदल व तसेच अतिंद्रिय अनुभव हे Psilocybin या औषध सेवनाने सुध्दा येतात असे मानस शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. अपघातामध्ये वा भुल दिल्याने वा मादक पदार्थ सेवनाने मनुष्याचा मेंदु तात्पुरता नादुरूस्त होतो तरीहि मेंदुविना मनुष्य अनुभव घेऊ शकतो, विचार करू शकतो व ते अनुभव नंतर तो आठवु शकतो हे सिध्द झाले आहे. अशा मेंदुविरहित अवस्थेमध्ये मनुष्य प्रामाणिक व स्वच्छ विचार करतो व या अनुभवामुळे नंतरच्या आयुष्यामध्ये तो सात्वीक विचारसरणीचा अध्यात्मिक मनुष्य बनतो.

आपण ज्यास जिवन असे म्हणतो ते आपले शरीराच्या सांगाड्या मधिल वास्तव्य हे खरे जिवन नसुन तेच खरे जिवन आहे असे भासवुन मेंदु आपणास भ्रमित करत असतो. आपण अखंड, अनंत वाहणाऱ्या जिवनप्रवाहाचा एक भाग आहोत. मेंदु आपणामध्ये असे विचार निर्माण करतो कि ज्यामुळे आपण स्वतःस या जिवन प्रवाहापासून वेगळे समजु लागतो. या वेगळे पणाच्या भावनेमुळे मनुष्य दुःख भोगतो व वैयक्तिक संसारास बांधला जातो. मेंदु हाच चैतन्य शक्तिचा भ्रम तयार करत असतो. आपल्या मेंदु मधिल अगणित न्युरॉन्स हे आपणास चेतन अनुभव देण्यासाठी सतत कार्यरत असतात, ते आपल्या देहा सहित सभोवतालच्या विश्वाचा देखावा निर्माण करत असतात. शरिर व मेंदुविरहित बेशुध्दावस्थेमध्ये जिवंत असल्याचा अनुभव म्हणजे व्यावहारीक दृष्ट्या जिवंत नसताना जिवंतपणाचा अनुभव अनेकांस आलेला आहे.

स्वतंत्र व वेगळ्या अस्तित्वाच्या ओळखिचि जाणिव हि अहंकारामधुन येते. अहंकारामुळे वेगळ्या अस्तीत्वाच्या निरनिराळ्या सीमा आखल्या जातात, त्या सीमांचे प्राणपणाने रक्षण केले जाते. अहंकार वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळे रूप घेत असतो. लहानपणापासून ते प्रौढावस्थे पर्यंत त्याने अनेक रूपे बदललेली असतात, वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये तो वेगवेगळा दिसत असतो. अध्यात्मिक साधने द्वारा वा औषधि वनस्पती सेवनाने अहंकार हा कमी करता येतो.

आपल्या स्वतःच्या व ईतरांच्या सुरक्षेच्या दृष्टिने समाजा मध्ये वावरताना आपणास काहि बंधने घालावी लागतात. आपला मुळ स्वभाव हा अतिशय दयाळु, कमालीचा प्रामाणिक असा आहे परंतु काहिजण याचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा समाज विघातक शक्तिं पासुन आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आपणास अहंकाराचि आवश्यकता असते. आपण आपले हितसंबंध सुरक्षित केल्यानंतर आपला अहंकार कमी केल्याने बरेचसे फायदे होतात. मेंदुमधिल जुनी स्वार्थी केंद्रे बंद होऊन नवीन पारमार्थिक संवेदना प्रवाहित होऊ लागतात. षडरिपुंचे षडगुणांमध्ये रूपांतरण होते. मेंदु निर्मित वैयक्तिक ओळख कमी होऊन मुळच्या वैश्वीक जिवन प्रवाहाशी आपण एकरूप होऊन जातो.

https://qz.com/1196408/scientists-studying-psilocybin-accidentally-proved-the-self-is-an-illusion/

No comments: