Tuesday, December 08, 2020

अज्ञानातून मुक्ती

 प्रश्न: आम्हाला ज्ञान - अज्ञानातुन सुद्धा बाहेर पडावे लागेल. सर्व त्या परमात्म्यावर सोपवावे लागेल. तरच आमचा अहंकार हळूहळू नष्ट होत जाईल. 

उत्तर: द्रष्टा आणि दृश्य एकच असतो, त्या अर्थाने आम्ही, मी, आपण या ज्या काही संकल्पना आहेत त्या सुद्धा तेच ज्ञान - अज्ञान आहे. त्याच माहिती मधून आम्हास आत्मा - परमात्मा यांच्या संकल्पना माहीत होतात. ही माहिती जेव्हढी प्राचीन तेव्हढ्या श्रद्धा जास्त भक्कम झालेल्या असतात. त्यांच्या विषयी मनात शंका येणे हे सुद्धा जिथे पाप ठरते तिथे त्यांच्या विरुद्ध प्रश्न निर्माण होणेच अशक्य होते. परंतु जे मन ते धाडस दाखवित त्या मनास बाहेर जाण्याचा (to go beyond) passport प्राप्त होतो.

जे मन असे म्हणते की मी माझ्या अज्ञानातून बाहेर येईन. ते मन हे त्याचं अज्ञानाचा भाग असते. असे संमोहित झालेले मन अज्ञानातून बाहेर येणे हे त्यामुळे अतिशय अवघड असते. 

आपण त्या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी त्या अज्ञानातील माहिती असलेल्या जुन्याच अज्ञानी पद्धती वापरतो. एक अज्ञानी पद्धत बदलण्यासाठी दुसरी अज्ञानी पद्धत वापरतो. संसारा पेक्षा धार्मिक कार्ये जास्त श्रेष्ठ वाटतात, त्याही पेक्षा अध्यात्मिक मुक्ती देणाऱ्या साधना अधिक उच्च वाटतात. 

पाण्यामध्ये पोहोत असताना आपण पाण्याचे निरीक्षण करू शकत नाही त्यासाठी आपणास नदीच्या तीरावर बसून वाहत्या पाण्याचे निरीक्षण करता येऊ शकते. म्हणजेच अज्ञानामध्ये राहून आपण अज्ञानाचे निरीक्षण करू शकणार नाही. 

अज्ञानाचे निरीक्षण करण्यासाठी आपण अज्ञानाचा त्वरित त्याग करायला हवाच. कारण आपले अज्ञानी मन त्याला जे हवे तेच आपणास दाखवित राहते.

मी म्हणजे आपले पूर्वीचे सर्व ज्ञान भांडार होय त्याला मध्ये न आणता आपणास नवीन अनुभव घेता यायला हवा. 

पूर्वग्रहदूषित माहितीचा संपूर्ण त्याग केल्यानंतर आपले सर्व अनुभव हे नवीन ताजे असतात आणि तेच खरे जीवन जगणे होय. Flowering in goodness each and every day. 

परंपरांनी अपप्रचारा द्वारा निर्माण केलेल्या सर्व साधना पद्धती या त्या अज्ञानाचा भाग आहेत सबब परंपरांच्या कोणत्याही साधना पद्धती आपणास परंपरा मधून बाहेर पडण्यास मदत करू शकणार नाहीत. 

आपल्याअज्ञानाची समज येणे हाच अज्ञानातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अज्ञानातून बाहेर येताच आपण ज्ञानामध्ये सहज प्रवेश करतो. आपले तेच विचार, तोच मेंदू आता विवेकाने बहरलेला असतो, जीवनाचा मोगरा फुलून नकळत सुगंध देवू लागलेला असतो.

https://youtu.be/z46n67DiiLg

Monday, November 30, 2020

दृष्टा और दृश्य एक है, कैसे?

द्रष्टा का मतलब है देखने वाला, अनुभव करने वाला और जो भी चीज हम अनुभव करते है वह दृश्य है। 

दृष्टा को ही हम मै, माय सेल्फ, मी ऐसे कहते हैं। Myself, Me, मै का मतलब है हमारा पूर्व ज्ञान, हमारा भूतकाल, हमारी सारी पूर्व स्मृतिया। यह सब हमारे दिमाग में विचारों के माध्यम से संग्रहित किया जाता है। यानी कि मै जो दृष्टा हूं वह असल में सिर्फ विचार मात्र है।

ज्ञानिंद्रियोंसे हमारा शरीर जो भी अनुभव करता है उसे हम दृश्य कहते है। पूर्व अनुभव हो या वर्तमान के अनुभव हो वह सब हमारे दिमाग कि स्मृतियों में संग्रहित किया जाता है। संग्रहित होने के बाद उस अनुभव कि जो प्रतिक्रिया उठती है उससे हमने अनुभव क्या किया यह समझ में आता है। अनुभव कि जो प्रतिक्रिया होती है वह भी विचार मात्र ही हैl

इसी तरह दृष्टा भी विचार है और दृश्य भी विचार है, दोनों एक है।

जब हमें लगता था कि दृष्टा और दृश्य अलग-अलग है, इस को हम division कहते हैं और जहां division होती है वहां conflict जरूर होता है। यह division हमारे मन में होती है, वहीं division हमारे परिवार और समाज में भी होती है। यही division सभी संबंधों मै दरारें पैदा कर देती है। इसी division से धर्म और nationalisms के नाम पर wars होते रहते है। हमारे relationships में जो हमारे एक दूसरे के बारे में पूर्व अनुभव है वह divisive knowledge हमारे relationships में दरार पैदा कर देती है। 

मुक्ति का मतलब है पूर्ण स्वतंत्रता, मुक्ति का मतलब है हमारे स्मृतियां में संग्रह किए हुए पुराने विचारों से छुटकारा, पुराने knowledge से मुक्ति, मुक्ति का मतलब है freedom from all that we know, freedom from the known।

मुक्ति का अर्थ है साक्षी का न होना। स्वतंत्रता का अर्थ है साक्षी की सम्पूर्ण उपेक्षा करना। साक्षी विभाजन का केंद्रबिंदु है। साक्षी मै और दूसरा ऐसे विभाजन को बनाता है। इसी विभाजन हेतु रिश्तों के बीच टकराव पैदा होती है। इसलिए सभी रिश्ते हिंसक हैं।  साक्षी का यह विभाजन दुनिया भर में सभी प्रकार के संबंधों में हिंसा और गड़बड़ी पैदा करता है। जब कोई यह सत्य देखता है तो वह विभाजन बनाना बंद कर देता है।

जब हमें इसी तरह मैं का पता लगता है, दृष्टा और दृश्य का पता लगता है तो उससे जो प्रतिभा, जो विवेक जागृत होता है और उससे जो action निकलती है वह सही तरह से नई creation होगी। यह जो नई action और नई activity होगी, हमारा नया बर्ताव होगा वह real meditation है। हजारों सालों से चली आती रही जो परंपरा और उसके साधना मार्ग है वह सब पुराने है, वह सभी हमारे मन को समोहित करके हमें believer बनाते हैं। 

Truth is not to believe, not to search but to live with it.

https://youtu.be/xvVL3tT5hZM


Friday, November 27, 2020

क्या परंपराएं सत्य का विश्वासघात करती हैं?

इंसानों ने भौतिक दुनिया को पूर्व और पश्चिम के रूप में विभाजित किया है।  हमने ईसाई धर्म और हिंदू, मुस्लिम और बौद्ध धर्मों में इंसानियत को विभाजित किया है। हमने दुनिया को राष्ट्रीयताओं में विभाजित किया है।  हमारे पास पूंजीवादी और समाजवादी, कम्युनिस्ट और अन्य लोग हैं, और इसी तरह हमने दुनिया को बांटा है;  हमने खुद को हिन्दू और गैर-हिन्दू के रूप में विभाजित किया है। हमने एक-दूसरे का विरोध करते हुए खुद को टुकड़ों में बांट लिया है। और जहां विभाजन है वहां संघर्ष है। हमने अपनी सुरक्षा हेतु विभाजन किया था लेकिन विभाजन से ही हम असुरक्षित हो रहे हैं। जिसको यह बात समझ में आएगी वह विभाजन को नकार देगा। जो ज्ञान मानव संस्कृति को अच्छा बनाने के लिए बनाया गया था वह काम नहीं कर पाया है। 

हम सभी इस विभाजन और संघर्ष के लिए जिम्मेदार है। यही विभाजन और संघर्ष हमारे घर के अंदर भी है और हमारे मन के अंदर भी है। समुंदर का विशाल जल और एक बूंद का छोटा जल एक ही है, उसी तरह सम्पूर्ण मानव जाती एक है और उनके सुख और दुख की कल्पनाएं भी एक जैसी ही है। 

हर एक इंसान अपने दुख दर्द से छुटकारा पाने के लिए और सुख पाने के लिए हमेशा बाहर की तरफ देखता है। उसे लगता है कि उसका परिवार, उसका समाज, उसका मार्गदर्शक गुरु या स्वर्ग के देवी देवता उसे दुख मिटाने के लिए और सुख पाने के लिए मदद करेगी। हम सब की यही धारणा है। यही धारणा हमें यह मानने को या स्वीकार करने को राजी नहीं करती कि हमारे दुख दर्द मिटाने के लिए हमें खुद प्रयत्न करना चाहिए, हम खुद अपने दुख दर्द मिटा सकते हैं और सुख पा सकते हैं। और जब इसी तरह हर एक इंसान खुद बदल जाता है, पूर्ण स्वतंत्र हो जाता है तो समाज बदल जाता है। इंसान से समाज बनता है तो इंसान ही समाज को बदल सकता है ना कि समाज इंसान को बदल सकता है।


मानवता के अंदर दुख दर्द है और उसे मिटाने की हर एक कि जिम्मेदारी है न केवल सरकार या नेतागण कि यह जिम्मेदारी है। धीरे धीरे किया हुआ विकास से नहीं और खूनी हिंसक क्रांति से भी नहीं बल्कि मनुष्यों के मनोविज्ञान में क्रांति लाकर हम मनुष्य और पूरी मानव जाति को बदल सकते है । मूलभूत बदल अंदर से ही होंगे और जो अंदर होगा वहीं बाहर भी होगा। लेकिन क्या हजारों सालों से विभाजन और संघर्ष से सम्मोहित किया गया मानवी मन बदलने को तैयार होगा?

मानवता के इस मूलभूत बदलाव के लिए कौनसा ज्ञान बहुत महत्वपूर्ण साबित होगा?

ज्ञान का मतलब है पूर्व अनुभव। ज्ञान हमेशा भूतकाल का ही होगा वर्तमान का नहीं हो सकता है। हम हमारे भूतकाल के अनुभव से वर्तमान को अनुभव करते रहते है, इसलिए हम वर्तमान को भी भूतकाल में बदल देते है और इसलिए हम पहले जैसे थे वैसे ही रहते है। परम्परायें हमेशा भूतकाल की होती हैं और वे वर्तमान का विश्वासघात करती रहती हैं। हमारा मानव जाती का समूचा ज्ञान जो भूतकाल है वह हमेशा वर्तमान का यानी के सत्य का विश्वासघात करता रहता है। हमारा दिमाग पुराने अनुभव के साथ भावनाए भी संग्रहित करता है जिससे हम वर्तमान को ठीक से समज नहीं पाते हैं।

क्या हम भूतकाल के अनुभव और भूतकाल के ज्ञान और भूतकाल की परम्पराओं से छुटकारा पा सकते है? जिस इंसान को सत्य को पाना है उसे हमारे सभी संप्रदाय, सभी परंपराएं, सभी धर्म को त्यागना अनिवार्य होता है। यह सभी परंपराएं अन्धकार के निदर्शक है और सत्य को ढूंढने वाला स्वयं प्रकाशी होगा, प्रकाश उसका खुद का होगा।

- J Krishnmurti in conversation with Dr Anderson


https://youtu.be/ux-1aRB8Res

Wednesday, November 04, 2020

परम अवस्थेचे दिशा दिग्दर्शन

हजारो वर्षापासून परंपरा आणि श्रद्धा यामध्ये बद्ध झालेला जीव त्यातून मुक्त होऊ शकतो काय?

परंपरा आणि श्रद्धा हे आपल्या मेंदूमध्ये घट्ट पणे पाय रोवून बसलेल्या आहेत. त्यांना कॉन्शसनेस म्हणजे चैतन्य यांनी बांधून ठेवलेले आहे त्यामुळे प्रथम आपण या चैतन्याचा विचार करू या.

चैतन्य म्हणजे नेमके काय आहे?

चैतन्य हे मेंदूमधील स्मृतींचे बनलेले असते. स्मृती मधील आपल्या ज्या आठवणी असतात त्या आठवणींचे सतत उजळणी करत राहणे हे चैतन्याचे काम असते. भूतकाळातील आठवणी मध्ये सतत रममाण होण्यामुळे आपला मेंदू हा जुनाच राहतो त्याच्या मध्ये नाविन्य निर्माण होत नाही. मेंदूमधील जुन्या विचारांनी आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असते, माणसा माणसांमध्ये दरी निर्माण होत असते.

आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या जुनाट विचारांचा त्याग केला तर साहजिक त्या विचारावर आधारित माणसा माणसा मधील दरी कमी होईल, आपले दुःख कमी होईल. व्यावहारिक विचार कायम ठेवून मानसिक विचारांचा त्याग करता येऊ शकतो.

आपल्या श्रद्धा आणि परंपरा या हजारो वर्षापासून बनले गेले आहेत आणि या हजारो वर्षांच्या श्रद्धा वरून आपले विचार बनले गेले आहेत या विचारांचा अंत करायचा म्हणजे परत तेवढेच वर्षे जाऊन द्यावे लागतील. भूतकाळ मध्ये गेलेला वेळ आणि आणि भविष्य काळामध्ये त्यांना घालवण्यासाठी लागणारा वेळ हे सर्व वेळकाढू पणा आहे आणि ते अशक्य सुद्धा आहे मग यावर इतर कोणता मार्ग आहे का?

जुन्या विचारांचा आधार काढून घेऊन त्याठिकाणी नवीन विचारांचा शिरकाव होऊन देण्यामध्ये खूप मोठा धोका असते कारण आपला मेंदू सुरक्षित जीवन जगण्याच्या कल्पनांमधून जे त्याला सुरक्षा देत असते ते सोडायला तयार होत नाही आणि जे नवीन आहे ते मला सुरक्षा देईल काय? या शंकेने नवीन स्वीकारायला तयार होत नाही. ज्या मेंदूस सुरक्षित आणि सुखी जीवन जगायचे आहे आहे तो असा धोका घेऊ शकत नाही. केवळ असे जिज्ञासू ज्यांना जीवन हे मानसिकरीत्या सुरक्षित आणि सुखी नसते ते निसर्ग नियमांनी संरक्षित आहे हे कळलेले असते असे मेंदूच नवीन धोका घ्यायला तयार होतात. ज्यांनी जीवनामध्ये अपार संकटांचा सामना केला आहे, अपार दुःख भोगले आहे असे मेंदू त्यांच्या अनुभवातून धोका घेण्यास प्रवृत्त झालेले असतात.

आपल्या सर्व प्रकारच्या मानसिक विचारसरणीचा अंत हा आपल्या खऱ्या खुऱ्या अस्तित्वाशी एकरूप होणे होय. अशा अवस्थेमध्ये प्रस्थापित होणे होय जी अवस्था सर्व इतर अवस्थांचे मूळ स्थान असेल.

अशा परम अवस्थेमध्ये येण्यासाठी काय करावे लागेल? कोणतीही मानसिक क्रिया आपणास त्या अवस्थेत येऊ देणार नाही. फक्त अशी जाणीव खूप महत्वाची आहे की आपण परंपरागत, श्रद्धाळू जीवन जगत आहोत, त्यांच्या बंधनातील जीवन जगत आहोत, त्या श्रद्धा आपणास सत्याकडे फिरकू देत नाहीत अशा प्रकारे आपल्या कृत्रिम, बनावट परंपरागत, श्रद्धाळू जीवनशैलीचे निरीक्षण करीत त्यातील कृत्रिमपण कमी करावे लागेल, संपवावे लागेल. बहुसंख्य लोक परंपरा आणि श्रद्धा यांच्या मगरमिठीत पूर्णपणे अडकले आहेत, त्यांचे सर्व प्रयत्न त्यांना त्या दलदली मध्ये अधिकाधिक अडकवित आहेत. आपण त्या श्रद्धा, परंपरा रुपी मगरीचे शिर कलम करण्यासाठी कोणीतरी गरुडावर बसून येईल असे श्रद्धा सांगतात त्यावर विश्वास ठेवून स्वतः काही न करता वाट पहात असतो आणि मगरीचे शिकार होत राहतो. आपले जीवन हे मानसिक श्रद्धा रुपी मगरींचे जाळे आहे हे लक्षात येणे हे अतिशय महत्वाचे आहे. 

- J Krishnamurti आणि पुपुल जयकर यांच्या मधील गहन चिंतन

https://youtu.be/LjNsrVHbctU



Saturday, October 31, 2020

अंतर्दृष्टी

ज्ञान प्राप्तीसाठी आपल्या मेंदूमध्ये काय बदल आवश्यक आहे?

आपल्या मेंदूमध्ये ईश्वरा बद्दल, विश्वाबद्दल आणि स्वतःबद्दल ज्या अफाट कल्पना आहेत त्या प्रथम सोडून द्यायची तयारी हवी. 

कल्पना कोण तयार करते त्याच्या मुळाशी आपण जायला हवे. कल्पना म्हणजे आपल्या मेंदूमधील विचारांचा अविष्कार होय. विचार हे विचार असतात ते ज्ञानीयांचे आणि अज्ञानीयांचे वेगळे असतात असे नाही. जिज्ञासा निर्माण होणे हे खूप चांगले लक्षण आहे परंतु जिज्ञासा ही ब्रह्मजिज्ञासा आहे की भीतीपोटी निर्माण झालेली जिज्ञासा आहे हा मूलभूत फरक आहे. 

ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घेणे होय. मीच ब्रह्म आहे किंवा मी ईश्वराचा अंश आहे अशा आपल्या अहंकारी मनाची ठाम समजून झालेली असेल तर ब्रम्ह आपल्या अहंकारामुळे समजणारच नाही.

संसारात निर्माण झालेले दुःख हे मेंदूतील विचारांच्या अज्ञाना मुळे आपणास भोगावे लागत असतात. अशा दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी मेंदूतील विचारांना त्यांच्या अज्ञानातून मुक्त करावे लागते. 

परमात्मा, आत्मा, पुनर्जन्म हे सर्व या परंपरा आणि श्रद्धांनी संमोहित केलेल्या मेंदूतील विचारांच्याच उत्पत्ती आहेत, कल्पना आहेत. हे लक्षात येणे म्हणजे insight आहे आणि ही insight पुढील action साठी कारणीभूत ठरते. 

बाहेर पाण्याच्या टाकी मध्ये भरपूर पाणी आहे, टाकीमधून आपल्या घरामध्ये नळ आलेला आहे, आपणास पाणी हवे आहे परंतु तो नळ आपोआप का चालू होत नाही किंवा चालू केला आणि तो परत बंद करावा लागेल परत चालू करावा लागेल, टाकीतील पाणी संपले तर काय अशा अनेकविध भीतीने आपण नळ चालूच करत नाही. 

परंपरा आणि श्रद्धा आपणास त्यांच्या विरुद्ध प्रश्न निर्माण होऊ देत नाही. 

हि मुळामध्ये निर्माण झालेली विकृती हीच महान संस्कृती आहे असे जनमानसावर हजारो वर्षांपासून ठसवले गेले आहे. त्यामुळे जनमानसांच्या हे अज्ञान सामान्यतः लक्षात येत नाही. आपल्या संकुचित विचारांच्या पलीकडे जाणे हेच त्यामुळे खूप अशक्य झाले आहे. 

जिज्ञासू मनाला प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर ते संस्कृतीने निर्माण केलेल्या संकुचित माहिती मधूनच शोधावी लागतात त्यामुळे जिज्ञासू मन पाप आणि पुण्य या विचारांच्या बाहेर पडू शकत नाही. पाप आणि पुण्यावर आधारित कर्मसंकल्पणा या आपल्या संमोहित मेंदुंच्या उत्पत्ती आहेत. त्यांच्या शिवाय इतर मार्ग शोधण्यास धाडस आवश्यक असते.

Insight अतर्दृष्टी

संसारात निर्माण झालेले दुःख हे मेंदूतील विचारांच्या अज्ञाना मुळे आपणास भोगावे लागत असतात. अशा दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी मेंदूतील विचारांना त्यांच्या अज्ञानातून मुक्त करावे लागते. आत्मा, परमात्मा या परंपरा आणि श्रद्धांनी संमोहित केलेल्या मेंदूतील विचारांच्याच उत्पत्ती आहेत, कल्पना आहेत. हे लक्षात येणे म्हणजे insight आहे आणि ही insight पुढील action साठी कारणीभूत ठरते. 

समजा एखादी व्यक्ती अतिशय दुःखामध्ये आहे, दुःख ओसरल्यावर जे काही नुकसान झाले आहे ते नुकसान भरून येणारे नाही, ते कटू सत्य आहे, आता आपणास ते विसरायला हवे, आपल्या सारखे इतर अनेकजण असेच दुःख भोगत असतात हे आकलन होणे, कळणे म्हणजेच अंतर्दृष्टी होय. हे दिसते तितके सहज नसते परंतु ते तेव्हढेच सहज ठेवणे आपल्या हिताचे असते. जीवनातील हे असे कसोटीचे क्षण आपणास सत्याच्या निकट घेऊन जात असतात. 

Insight म्हणजे अतर्दृष्टी कशी काम करते?

आपण हे असे प्रसंग सहज का घेत नाही? कुटुंब, समाज आणि त्यांचे नीतीनियम यांनी बनलेले आपले विचार आपणास त्यातून काहीतरी भलतेच करावयास भाग पाडतात आणि आगीतून निसटलेला जीव फुफाट्यात अडकत राहतो. संसारात राहून संसारातील दुःखातून मुक्त होण्याचे संसारात कोणतेही साधन उपलब्ध नाही. संसार हा ज्या विचारांनी बनलेला आहे, त्याच विचारांचे दुःख बनलेले आहे.  

Insight अंतरदृष्टि हि अचानक असते, विचारपूर्वक केलेली कृती नसते, तिचा आपल्या पूर्वज्ञानाशी संबंध नसतो, तिचा उगम आपल्या स्मृतीमधून झालेला नसतो, तिचा आपल्या भूत काळाशी संबंध नसतो, तिचा काळाशी संबंध नसतो. अंतरदृष्टी म्हणजे संपूर्ण विचार प्रक्रियेचा अभाव असतो. तिथे सत्याचे प्रत्यक्ष दर्शन असते. आणि ही अंतर्दृष्टि आपल्या मेंदूमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असते जी आपणास सत्य अवस्थेत प्रस्थापित करत असते.

सत्य अवस्था ही नित्य आहे परंतु आपले विचार तिला गाठू शकत नाहीत. त्या अवस्थेचे नामकरण आणि विवरण म्हणजे ती अवस्था नव्हे.

Saturday, October 24, 2020

Question Authority

 Question Authority – Krishnamurti

साधना म्हणजे आपण जे मान्य केले आहे अशा सर्व श्रद्धा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय. सर्व मानव निर्मित श्रद्धांचा चींतना द्वारे निरास करणे म्हणजे साधना होय. आपण गृहीत धरलेल्या ज्या सर्व श्रद्धा आहेत त्यांच्यामुळे जर आपणास सत्य समजत नसेल तर त्यांचा चींतना द्वारे निरास होणे खूप आवश्यक असते. सत्य आकलन करण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे.

अनुभव आणि माहितीद्वारे आपणास श्रद्धा माहीत झालेल्या असतात. श्रद्धा या सर्व बाहेरून आलेल्या असतात. बाहेरून आलेल्या माहितीने आपला आतील अहंकार आणि मी जास्तीत जास्त बळकट होत राहतात. श्रद्धा आणि मी चा अहंकार यातून आपली प्रत्येकाची ठराविक जीवनशैली बनत जाते. बाहेरून आलेली माहिती आणि त्यावर बनलेला आपला मी याबाबत आपण कधीच प्रश्नचिन्ह निर्माण करीत नाही. श्रद्धा बाबत आपणास माहिती असते. त्या कशा निर्माण झाल्या, कुठून आल्या यांची उत्तरे माहित असतात कारण त्यांची भरमसाठ उत्तरे अपप्रचारा द्वारे आपणापर्यंत आलेली असतात, आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. त्यामुळे त्यांच्या विषयी प्रश्न निर्माण आपण करतच नाही. अशाप्रकारे हजारो वर्षापासून मानवी मन संमोहित झाले आहे, फसत गेले आहे, मानवी समाज अजूनही दुखांच्या खाईत आहे. मानवी मनाने निर्माण केलेल्या श्रद्धांनी मानवी समस्या अधिकच भीषण बनल्या आहेत, म्हणून मला सर्व प्रकारच्या मानवी श्रद्धांचा पुनर्विचार करणे क्रमप्राप्त आहे हे लक्षात येणे यालाच कृष्णमूर्ती इंटेलिजन्स असे संबोधतात, परंपरा त्याला विवेक बुद्धी असे समजते, हीच ज्ञानप्राप्ती ची गुरुकिल्ली आहे. 


Tuesday, October 20, 2020

समाधि

In meditation, life is a total movement, not fragmented, not broken up as the ‘me’ and the ‘you’. In meditation, there is no 'me' to experience. – J Krishnamurti

आपली अशी अवस्था जेव्हा होईल कि ज्या अवस्थेमध्ये मी आणि तू असा भेदभाव असणार नाही, आपले संपूर्ण जीवन हे एकच असेल, जीवनामध्ये अहंकार नसेल, मी नसेल, अशा अवस्थेस समाधिस्थ अवस्था म्हणता येईल.

जाणिवेचे दोन प्रकार म्हणता येतील एक वैयक्तिक आणि दुसरी वैश्विक. वैयक्तिक जाणीव मध्ये आपल्या मेंदूतील विचार येत असतात आणि वैश्विक जाणिवेस आपण वैश्विक मन असे म्हणू शकतो. वैश्विक जाणीव मध्ये अपार ज्ञान, अपार करुणा, अपार प्रेम समाविष्ट असते याउलट मेंदूतील विचारांमध्ये स्वार्थी विचार, द्वेष, मत्सर, अज्ञान आदी समाविष्ट असतात. आपल्या मेंदूतील वैयक्तिक स्वार्थी विचारांमुळे आपणास सुख दुःख भोगावे लागतात. आपणास आपल्या दुःखापासून मुक्ती हवी असेल, अज्ञानापासून मुक्ती हवी असेल तर आपणास आपले स्वार्थी विचार थांबवावे लागतील. स्वार्थी विचार थांबविल्या नंतर वैश्विक ज्ञान, वैश्विक करुणा आपल्या अंतरंगात प्रवेश करते आणि आपणास मानसिक सुख दुःखापासून मुक्ती प्राप्त होते. 

जो स्वतः शांत झाला नाही आणि जो स्वतः सुखदुःखा पलीकडे गेला नाही तो इतरांना सुखी करू शकत नाही, इतरांना मार्गदर्शन करू शकत नाही. जी अज्ञानी मंडळी राजकीय नेते असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, धार्मिक गुरु असोत जे इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात, इतरांचे जीवन बदलण्याचे मार्गदर्शन करतात ते सर्व स्वार्थी विचारातून निर्माण होत असतात. स्वार्थी विचारातून निर्माण झालेले कोणतेही तत्त्वज्ञान मनुष्य समाजाला सुख दुःखा पासून मुक्ती देऊ शकणार नाही.

मानसिक सुख दुःखापासून मुक्ती प्राप्त होण्यासाठी आपणास मेंदूतील स्वार्थी विचारापासून अलिप्त राहून वैश्‍विक मनाच्या दालनात प्रवेश करावाच लागेल. आणि हे प्रत्येकाने स्वतः करावयाचे आहे, इतर कोणीही मदत करू शकत नाही. जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. 

हजारो वर्षांपासून आपणावर हेच संस्कार झाले आहेत की कोणीतरी स्वर्गातून येवुन मदत करील, कोणी साधू संत मदत करतील, सरकार मदत करेल, सामाजिक संस्था मदत करतील, शेजारी मदत करतील, घरातील वडीलधारी मदत करतील आपण वाट पहात राहायचे. अहंकार प्रत्येकास मी किती महान ज्ञानी आहे हेच सतत सांगत असतो त्यामुळे आपण ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच करत नाही, ज्ञान प्राप्ती साठी केलेला प्रयत्नातून आपण अज्ञानी आहोत हे लपविण्यासाठी.

Sunday, October 18, 2020

विचार आणि मन

एका साधक मित्रा बरोबर चर्चा करताना त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की, ब्रम्ह तत्व हे स्वतःस जाणीत नाही, त्याच्या ठायी जाणीव नेणीव नाही. पृथ्वी तलावरील जीवांना काय हवे व काय नको हे त्या तत्वाच्या गावीही नसेल. मग बऱ्याचदा आपणास अज्ञात शक्ती कडून मदत आणि मार्गदर्शन केले जाते असा अनेकांचा अनुभव असतो. हे नेमके कोण करते? की तो योगायोग असतात?

या विषया वर तत्वचींतक श्री विजय पांढरे सरांचे चिंतन ( https://vijaypandhare.blogspot.com/2020/10/blog-post_17.html?m=1 ) वाचण्यात आले आणि J Krishnamurti आणि Dr Bohm यांची चर्चा याच विषयावर ऐकायला मिळाली. ( https://youtu.be/VVTiAw7K-bw ) हा सुद्धा योगायोग नसावा.

श्री पांढरे सरांनी consciousness चे वेगवेगळे स्तर सांगून ते एकमेकांशी कसे संबंधित आहे हे सांगितले.

कृष्णमूर्ती आणि Dr Bohm यांच्या संवादातून अनेक नवीन गोष्टी समजल्या. पूर्वसुरिंचे न ऐकता या दोघांचे का ऐकावे? असा प्रश्न उपस्थित केला जावू शकतो. Dr Bohm हे Einstein बरोबर काम केलेले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या analytical mind ने कृष्णमूर्ती सारख्या दार्शनिका कडून जास्तीत जास्त तत्वांचे निरसन करून घेतले आहेत. दोघांनी एकेक पायरी चढत, एकेक संकल्पना विशद करत सत्याप्रत साधकास ते त्यांच्या सुसंवाद द्वारे घेवून जातात, कोणत्याही धार्मिक श्रद्धांचा आधार न घेता.

या दोघांच्या चर्चेमध्ये असे समजते की, आपला प्रत्येकाचा वैयक्तिक मेंदू हा जन्मतः आपल्या वांशिक जडण घडणी नुसार आणि नंतरच्या बालपना पासूनच्या संस्कारांनी संमोहित झालेला असतो. त्या समोहनानुसर आपला मेंदू विचार करीत असतो, जे विचार आपल्या वरील संस्कार नुसार संकुचित असतात.

या उलट मन हे वैश्विक असते, सर्वत्र असते ज्यामध्ये intelligence, compassion, silence यांचा भरणा असतो. आपला मेंदू आणि आपले संकुचित विचार जोपर्यंत वैयक्तिक, स्वार्थी, संकुचित विचार करणे थांबत नाहीत तोपर्यंत वैश्विक मन आपल्या अंतरंगात प्रवेश करत नाही. 

Silence is the key. अपेक्षा रहित जीवन जगताना वैश्विक मन आपल्या मध्ये अवतरीत होते, त्यामध्ये आपला मी विरघळत जातो आणि आपले स्वार्थी आचार आणि विचार सुद्धा वैश्विक होतात. 

विचार आणि मन यामध्ये फरक करायला हवा. आपल्या मेंदूतील विचार ज्यांना खरेतर अविचार म्हणायला हवेत थांबले की वैश्विक बुद्धिमत्ता, वैश्विक शांती आणि वैश्विक करुणा यांचे संयुक्तिक मन आपल्या अस्तित्वात उतरते आणि आपले जीवन वैश्विक होते. अशा अद्वैत अवस्थेमध्ये दुही नाही, द्वेष नाही, अपेक्षा नाही, चिंता नाही, काळजी नाही, देवाक काळजी अशी नैसर्गिक अवस्था निर्माण होते.

Saturday, October 17, 2020

गुरु आणि संप्रदाय

आपणा बहुतेकांचा अध्यात्मिक प्रवास हा कोणत्या तरी अध्यात्मिक संप्रदायाशी संबंध आल्याने सुरू होतो अथवा आपण त्या संप्रदायाशी संबंध जोडतो. याचे कारण असे असते की त्यांनी आपणास आपल्या दुःखातून मुक्तीचे आश्वासन दिलेले असते. आणि आपण सर्वजण जीवनामध्ये सुरक्षा अपेक्षित असतो तसेच मानसिक आणि भावनिक सुखाची लालसा ठेवून असतो. आपली हीच लालसा त्यांच्या कडून आपले शोषण करण्यास कारणीभूत ठरते. अशा कोणत्याही संप्रदायाच्या जवळ अथवा गुरु जवळ काहीही अध्यात्मिक शक्ती नसते. बाह्य संप्रदाय आणि गुरु आपणास आपल्या दुःखातून, अज्ञानातून मुक्ती देवू शकत नाहीत याची खात्री बाळगा आणि तीच शक्ती स्वतःचा शोध घेण्यात खर्च करा. काय सत्य आहे आणि काय सत्य नाही असे काहीही गृहीत न धरता फक्त अनुभव म्हणजे काय आहे आणि त्यामध्ये मी कसा निर्माण होतो याचा शोध घ्यावा.

Most of us follow so-called spiritual organizations because they promise rewards. and as most of us are seeking spiritual security, emotional or mental comfort, we succumb to these promises and become instruments of exploitation. these organizations exist because of our craving for our own spiritual well-being and comfort. They have nothing spiritual about them, nor can they free man from sorrow, confusion and ignorance.

J Krishnamurti.

Ojai

17 May 1936


Tuesday, October 13, 2020

मन आणि श्रद्धा



आपण जिथे रहात आहोत तिथे इतरही असंख्य जीव रहात आहेत. लाखो वर्षांच्या संघर्षातून प्रत्येक जीव आपले जीवन निसर्ग नियमांशी सुसंगत ठेवीत जीवन कंठीत असतात. मनुष्य प्राण्याच्या मेंदूमध्ये अतिरिक्त विचार जन्म घेवू लागले, त्यातून त्याची बुद्धिमत्ता इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित झाली आणि त्याने आपले जीवन जास्तीत जास्त सुरक्षित आणि सुखी केले. त्याच बुध्दीचा वापर करून तो जास्तीत जास्त स्वार्थी सुद्धा बनला. सुखी जीवन हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असे तो मानू लागला. आपण सर्वजण निसर्गाचे भाग आहोत, सर्वांनी सलोख्याने राहायला हवे हे तो विसरला. निसर्गातील इतर जीवांची हत्या करत तो स्वतःच्या मनुष्य बांधवांची सुद्धा हत्या करू लागला. इतर जिवांपेक्षा सुसंस्कृत होवून सुद्धा तो अजून आपली आदिवासी हिंसक वृत्ती सोडायला तयार नाही. सत्ता आणि संपत्ती मिळविण्यासाठी तो अजुनही असंख्य जीवांची हत्या करीत आहे. बलिष्टांच्या हव्यासामुळे इतर जीवांची कुचंबणा होते, त्यांच्या जगण्याच्या हक्कावर अतिक्रमण केले जाते. त्यातून गरिबी, अज्ञान यामुळे सामान्य जन दुःखात पिचत आपले जीवन कंठत राहतात. आशेचा किरण दिसत नसताना अज्ञात, दैवी शक्तीचा मानवी मनाने आभास तयार केला. आपणच आपल्या अधोगतीला जबाबदार आहोत, आपण निसर्गाशी घेतलेल्या फारकती मुळे आपण दुःख भोगत आहोत हे समजून घेण्या ऐवजी दैवी शक्तीच्या प्रसादाने आपण दुःख मुक्त होवू अशी घट्ट मानसिकता तयार केली गेली. दैवी शक्तींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मग त्यांची आराधना, उपासना यांचे स्तोम निर्माण झाले. आपल्या दुःखाचे मूळ कारण विसरून जावून त्या ऐवजी दुःख निवारणार्थ श्रद्धांचे डोंगर उभे केले गेले. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्र्वरी मुळे मनुष्य जातीचे दुःख निवारण तर झालेच नाही उलट श्रद्धांचे भूत मानगुटीवर बसले. 

आपले मन हे जसे एक आभास असून त्याने आपल्या अस्तित्वाचा पूर्ण ताबा घेतला आहे तद्वत श्रद्धा स्थानानी संपूर्ण मानव समाजाच्या बुध्दीचा ताबा घेतला आहे. 

God is an abstraction made by thought which cannot understand the world in which it lives - its suffering, agony and misery. Thought therefore creates an outside agency which it worships. - J Krishnamurti

Public Talk 1 in New Delhi, 24 November 1973

Saturday, September 19, 2020

अंधानुकरण

 


आपल्या सभोवतालचे जग हे सत्य आहे की मिथ्या आहे याचा निर्णय करण्यात बहुतेक साधकांचा वेळ जात असतो. स्वप्नातल्या विश्वा प्रमाणे जागृती मधील विश्व सुद्धा मिथ्या आहे असे बहुतेक अध्यात्मिक छातीठोकपणे सांगत असतात. आणि आपल्या सभोवतालचे जग कसे मिथ्या आहेत त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. 

सर्व काही शिवशक्तिचा खेळ आहे असे सांगितले जाते. यामधील शिव म्हणजे ईश्वर आणि शक्ती म्हणजे विश्व होय. शक्तीचा विनाश होऊन ती अविनाशी ब्रह्ममध्ये विलीन होते या अर्थाने ते उदाहरण आहे. ब्रह्म हे अविनाशी तत्व आहे त्याचा विनाश होत नाही परंतु शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ती सत्य आहे, जे आहे ते स्वप्नवत मिथ्या नाही. 

आपल्या सभोवतालच्या परिसराला दृश्य असे संबोधले जाते आणि ते दृश्य अनुभवनारा मी दृष्टा असे संबोधले जाते. अनुभवाचे विश्लेषण केले असता त्यामधील मी हा केवळ भास आहे हे लक्षात येते याचा अर्थ ज्याला आपण दृष्टा समजत असतो तो केवळ भास आहे, तो मिथ्या आहे. भौतिक दृष्ट्या दृश्य सत्य आहे आणि द्रष्टा हा भास आहे. द्रष्टा हा भास आहे, तो मिथ्या आहे हे समजल्यानंतर दृष्टा नाहीसा होतो आणि द्रष्टा नाहीसा झाल्यामुळे दृश्य पाहणारा कोणीच नसल्यामुळे दृश्य असून ते अदृश्य होते. आपण घरामध्ये टीव्ही चालू केला आहे त्यावर प्रोग्राम चालू आहेत परंतु घरातील मंडळी इतर खोल्यांमध्ये आहेत टीव्हीसमोर कोणीही नाही याचा अर्थ टीव्ही हे दृश्य असत्य आहे असे होत नसून टीव्ही चे दृश्य सत्य आहे परंतु पाहणारे दृष्टे गायब आहेत. 

ज्यावेळी द्रष्टा म्हणजे मी शिल्लक असतो त्यावेळी तो समोरील दृश्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण मेंदूच्या स्मृतीमध्ये साठवितो आणि ते भूतकाळातील चित्रीकरण आपणास तो दाखवित असतो. हे मेंदूच्या स्मृती मधील भूतकाळातील चित्रीकरण म्हणजे दृश्य आहे असा भास निर्माण केला जातो. तो दृश्याचा भास असत्य आहे. एखादे दृश्य प्रत्यक्ष पाहणे आणि त्याच दृश्याचे व्हिडिओ शूटिंग पाहणे असा या दोन दृश्या मधील फरक आहे. म्हणजे दृश्य सत्य आहे पण त्याच्या व्हिडिओ शूटिंग मधील दृश्य मीथ्या आहे. 

आपण पूर्वीचे ग्रंथ आणि गुरु यांना जर श्रध्देने अनुकरण करत असू तर त्यांची अशी ब्रह्मवाक्ये आपला नक्कीच गोंधळ उडवितात आणि आपणास सत्य समजत नाही. जगातील कोणताही ग्रंथ अथवा गुरु अथवा प्रेषित यांच्याकडे श्रद्धेने न पाहता त्यांच्या वाक्यातून आपल्याला सत्य समजते का याची शहानिशा करावी. त्यांच्या विचारातून आपल्या प्रश्नांची उकल होत नसेल तर आपणास मार्गदर्शन करण्यात ते व त्यांचे विचार निरर्थक ठरले आहेत आणि होय, अनुकरण केल्याने सत्य समजत नाही.

अंधानुकरण करण्या पासून पूर्णपणे स्वतंत्र झाल्याशिवाय आपणास सत्य दर्शन असंभव आहे.

Freedom from authority is absolutely necessary to find out if there is, or if there is not ultimate truth. - J Krishnamurti

Thursday, September 17, 2020

पवित्र जीवन

 


आपणास सत्य का समजत नाही? याचे प्राथमिक कारण हे आहे की आपण आपले सर्व संबंध योग्य व्यक्तींशी जोडत नाही. कुटुंब, समाज, नोकरी-व्यवसाय इत्यादी सर्वत्र चुकीचे संबंध जोडले गेल्यामुळे ते चुकीचे संबंध सांभाळण्यासाठी आपणास सर्व शक्ती आणि सर्व वेळ द्यावा लागतो.

आपण आपली प्रत्येकाची एक प्रतिमा बनवलेली असते या प्रतिमा आपणास एकमेकांशी सुखसंवाद करून देत नाहीत आणि त्यामुळे आपले एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध टिकून राहत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या जाणिवेत आपणा सर्वांच्या प्रतिमा इतक्या खच्चून भरलेल्या असतात की प्रतिमा शिवाय जाणीव शक्य नसते. जोपर्यंत आपल्या जाणीवे मध्ये चांगल्या किंवा वाईट प्रतिमा असतात तोपर्यंत आपले एकमेकांशी संबंध सौहार्द पूर्ण असू शकणार नाही आणि संबंध योग्य नसतील तर जीवन निरर्थक ठरते. चांगले नातेसंबंध कसे निर्माण करावेत यासाठी कोणतीही प्रक्रिया असू शकत नाही कारण नवीन प्रक्रिया म्हणजे परत नवीन प्रतिमा आणि अशा प्रकारे प्रतिमांचा खेळ अखंड चालू राहतो. 

सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण जशी सुखाची एक प्रतिमा असते तसेच दुःखाची सुद्धा एक प्रतिमा असते, दोन्ही मूलतः प्रतिमाच असतात. भूतकाळातील सुख-दुःख आणि भविष्यकाळातील सुख-दुःख हे सारखेच आहेत कारण ते सारख्याच प्रतिमांचे बनलेले आहेत.

ज्यावेळेस आपणास द्रष्टा आणि दृश्य हे एकच आहेत हे पूर्णपणे समजते त्यावेळी जाणीव नेणीवेचे सर्व स्तर नाहीसे होतात. मी चे अधिष्ठान ढळले जाते, प्रतिमा बनविणारा मी क्षीण होताच प्रतिमा बनणे बंद होतात आणि आपल्या मानसिक अस्तित्वाचा मृत्यू होतो. मी चा मृत्यू हाच स्वरूप साक्षात्कार होय. स्वरूप साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीचे दुःखातून म्हणजे मानसिक दुःखातून पूर्णपणे मुक्तता होते, त्याचे हृदय अपार करूणेने भरून येते. आतापर्यंत जीवनामध्ये भोगलेले सर्व दुःखाचे रूपांतरण करूणे मध्ये होते याचाच अर्थ आत्मसाक्षात्कार प्राप्त व्यक्तीला पूर्व जीवना मध्ये दुःखाला सामोरे जावे लागतेच. 

वैयक्तिक मी चा अंत होताच, वैयक्तिक मीचे दुःख संपुष्टात येतात, त्याच्या दुःखाचे करुणेत रूपांतर होते आणि त्याचवेळी त्याच्या वैश्विक मी चा जन्म होतो!!! विश्वातील इतर जिवांचे दुःख त्याचे दुःख बनले जाते म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक दुःखाचे, स्वतःच्या मि चा अंत करीत नाही तोपर्यंत ती व्यक्ती समाजाचे नेतृत्व करण्यास अपात्र असते. वैयक्तिक मानसिक दुःखाचे रूपांतरण करुणे मध्ये होताच ती व्यक्ती पवित्र जाणीव मध्ये प्रवेश करते. या अतिपवित्र जाणिवे मध्ये पूर्वग्रह दूषित मन प्रवेश करू शकत नाही. अशा अति पवित्र जाणिवे मध्ये प्रवेश करणे हेच जीवन आहे आणि खरे जीवन म्हणजे पवित्र जीवन होय. आणि यामुळेच म्हणावेसे वाटते की जे जीवन अतिशय अल्प आहे ते जीवन व्यर्थ न दवडता, त्याचा गैरवापर न करता आपण शक्य तितक्या लवकर पवित्र जीवनात प्रवेश करायला हवा. आणि हे सर्व आपल्या  जीवनामध्ये प्रत्यक्षात अंमलात यायला हवे. ते केवळ ऐकून आणि समजून सोडून देणे योग्य नाही.

ज्या व्यक्तीस जगाने लादलेल्या जीवन ध्येयाची तमा नाही आणि ज्याला जीवनाचे खरे वास्तविक ध्येय जाणून घ्यायचे आहे ती व्यक्ती अशा realised व्यक्तीशी संवाद साधून त्याला आपल्या समस्या सांगून अर्थात अध्यात्मिक अडचणी, अध्यात्मिक प्रश्नउत्तरे करून, अध्यात्मिक चर्चा करून ती अवस्था प्राप्त करू शकते. म्हणजे ज्याला अध्यात्मिक अवस्थेची अत्यंत तळमळ आहे अशा व्यक्तीला ती अवस्था प्राप्त होऊ शकते.

- J Krishnamurti, 

https://youtu.be/V9hCYaCOGpk


Tuesday, September 15, 2020

सत्याचा साक्षात्कार


मी म्हणजे नेमके काय आहे हे समजणे म्हणजे अध्यात्मिक अनुभुती येणे होय, मी समजण्यासाठी साधना आणि अभ्यास करावा लागतो असाही समज आहे.

अगदी काल परवा पर्यंत माझाही तसाच समज होता. परंतु एक आठवड्या पूर्वी माझा ओळखीच्या दोन तरुणांशी संवाद झाला, अध्यात्मिक चर्चा सुद्धा झाली. ते दोघेही २५ ते ३० वर्षाचे आहेत. शिक्षण पूर्ण करून नोकरी करीत आहेत. धार्मिक वा अध्यात्मिक साधना आणि अभ्यास काहीच नाही. व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान वगैरे काही करीत नाहीत. अजूनही त्यांचा या गोष्टींकडे कल नाही. ते त्यांच्या परीने त्यांचे जीवन जगत आहेत. 


मी सहज चर्चा करताना मुद्दामहून अध्यात्मिक विषय काढला आणि जे मला मी बद्दल माहीत होते ते त्यांना व्यवस्थित समजून सांगितले आणि त्यांना ते समजले की नाही यावर परत चर्चा केली, प्रश्नोत्तरे झाली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की दोघानाही 

  • अनुभव म्हणजे काय आणि त्यामध्ये 

  • मी चा भास कसा निर्माण होतो, 

  • दृष्टा आणि दृश्य हे कसे एक आहेत observer is observed हे व्यवस्थित समजले !!!


कसलीही तळमळ नाही, अट्टाहास नाही, प्रयत्न नाही, साधना नाही, अभ्यास नाही तरीही अर्ध्या तासाच्या चर्चेत त्यांना ते समजले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.


माझी चर्चा त्यावेळी रेकॉर्ड केलेली नव्हती परंतु जे आठवत आहे ते मी लिहून काढले आहे.


इतर विषया वर चर्चा चालू असताना मी मुद्दामून अध्यात्मिक विषय काढला आणि त्यांना त्याची पूर्वकल्पना दिली की मी तुम्हाला आता जे काही सांगत आहे ते फक्त मला तुम्हाला कळतय काय त्याची खातरजमा करावयाचे आहे. मी जे काही सांगत आहे ते त्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे व नंतर त्यांना जे काही समजले ते त्यांनी मला सांगावे असे आमचे ठरले.


त्यांना मी प्रथम अनुभव म्हणजे काय याची उकल करून सांगितली. अनुभव म्हणजे एखादी घटना घडत असताना त्याची जाणीव प्रथम शरीरास म्हणजे शरीर इंद्रियास होत असते. डोळे, कान, नाक, त्वचा इत्यादींना अनुभव पहिला स्पर्श करत असतो. शरीर इंद्रियांना अनुभव प्राप्त झाल्यानंतर तो अनुभव मेंदूकडे पाठविला जातो, मेंदूमध्ये त्या अनुभवाची नोंद केली जाते, पूर्व अनुभवाशी त्याची पडताळणी केली जाते, त्यावरून नवीन अनुभव काय आहे याचा प्रतिसाद मेंदूमध्ये निर्माण केला जातो. ही सर्व प्रक्रिया म्हणजे अनुभव होय. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास काही काळ जात असतो. या कालावधीचा सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये जो काळ जातो त्याला आपण अंतर म्हणतो. आपला मेंदू अतिशय जलद गतीने अनुभवाच्या सर्व क्रिया पार पाडत असतो त्यामुळे आपणास काळ, अंतर आणि मी च्या भासाचा पत्ता लागत नाही. अनुभवाची जेव्हा सुरुवात होते त्यावेळी तो अनुभव शरीर इंद्रिये या पासून सुरु होतो नंतर तो मेंदूमध्ये पाठवला जातो. मेंदूमधील स्मृती मधून तो अनुभव काय आहे हे सांगितले जाते नंतर त्या अनुभवाचे ज्ञान प्राप्त होते. तोपर्यंत तो अनुभव अज्ञात असतो. 


उदाहरणार्थ आपण प्रत्यक्षात जेव्हा एखादे झाड पाहत असतो त्यावेळी डोळ्यांना ते झाड दिसते, डोळे ती माहिती मेंदूकडे पाठवतात, मेंदूमध्ये ती माहिती साठविली जाते, मेंदूमध्ये पूर्व अनुभवावरून ते झाड आहे याची जाणीव निर्माण होते.


मेंदूमध्ये अनुभवाची प्रतिक्रिया, प्रतिसाद निर्माण होताच तिथे मी चा भास निर्माण होतो, जो मी ते झाड पाहिले असा कर्त्याचा भास निर्माण करतो. 


दृष्टा आणि दृश्य हे एक कसे?


कोणत्याही अनुभवांमध्ये द्वैत उघडपणे दिसत असते. द्वैत अनुभवा मध्ये दोघे असतात एक दृश्य आणि ते दृश्य पाहणारा द्रष्टा. आपणा सर्वांच्या या नेहमीच्या सराईत अनुभवामुळे आपणास दृश्य आणि द्रष्टा हे एकच आहेत हे समजू शकत नाही. 


अनुभवाची प्रक्रिया जर नीट समजली असेल तर दृश्य आणि द्रष्टा हे एकच आहेत हे समजू शकते. प्रथम आपण दृश्य म्हणजे नेमके काय याचा सखोल अभ्यास करू या.


जेव्हा आपण एखादी घटना पाहत असतो तेव्हा त्याचे दृश्य मेंदूमध्ये स्मृतीमध्ये साठवले गेल्यानंतर आपणास ते दिसू लागते. म्हणजे आपणास जे दिसते ते मेंदूमधील स्मृती मधील आपण त्या दृष्याची साठवलेली प्रतिमा पाहात असतो, प्रत्यक्ष दृश्य नव्हे. याचा अर्थ आपण ज्याला प्रत्यक्ष दृश्य म्हणतो ते आपल्या मेंदूमधील स्मृती असते जी काही क्षणापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेली घटना असते. 


दृश्य म्हणजे मेंदूमधील स्मृति हे समजले असेल तर आता आपण द्रष्टा म्हणजे काय ते पाहू या. अनुभव म्हणजे काय हे पाहताना आपण पाहिले होते की मेंदूमधील स्मृतींचा प्रतिसाद निर्माण होताना मी चा भास निर्माण होतो ज्याला आपण कर्ता असे समजत असतो तोच द्रष्टा आहे. म्हणजे द्रष्टा सुद्धा मेंदूमधील स्मृतींचा प्रतिसाद आहे. 


मेंदूमधील स्मृतींचा जो प्रतिसाद असतो त्यालाच आपण विचार समजतो आणि या विचारांची न संपणारी जी साखळी असते त्याला आपण मन असे समजतो. 


दृश्य म्हणजे मेंदूच्या स्मृतींचा प्रतिसाद होय तसेच द्रष्टा म्हणजे सुद्धा मेंदूच्या स्मृतींचा प्रतिसाद होय आणि दोन्ही सुद्धा विचार आहेत. म्हणजेच द्रष्टा आणि दृश्य म्हणजे वेगवेगळे नसून एक विचार मात्र आहेत. दोन्ही भूतकाळ आहेत. 


आपण आत्तापर्यंत अनुभव म्हणजे काय, त्यातून मी चा भास कसा निर्माण होतो आणि दृश्य आणि दृष्टा हे कसे एक आहेत हे पाहिले. हे इतके सोपे आहे आणि ते जर आपणास समजले तर आपणास ते खरेच वाटणार नाही. नसेल समजले तर परत परत वाचा. थोडेसे जरी लक्षात आले तरी त्या आधारे कृष्णमूर्ती समजू लागतील, पांढरे साहेब समजू लागतील, संत समजू लागतील. 




प्रतिमा भंजन



आपण प्रत्येकजण स्वतःची एक इमेज / प्रतिमा बनवीत असतो. ज्यामध्ये आपली ओळख, स्वभाव, मालकी आदि समाविष्ट असतात. या प्रतिमांना कोणी विचलित केले की आपणास दुःख होते. आपणावर कोणी टीका केली की आपणास ते आवडत नाही याचे कारण आपण आपली चांगली प्रतिमा गृहीत धरलेली असते व तिला नावे ठेवलेले आपणास आवडत नाही. आपली स्तुति केली की बरे वाटते कारण आपण आपली तशीच प्रतिमा गृहीत धरलेली असते. 

आपण सर्वजण एकमेकांशी संबंध ठेवणे, देवाणघेवाण करतो ते या चांगल्या वा वाईट प्रतिमांच्या आधारे. म्हणजे आपल्या एकमेकांच्या प्रतिमा एकमेकांशी व्यवहार ठेवत असतात. आपले संबंध प्रेम राग द्वेष हे सर्वजण प्रतिमा निगडित असते. या सर्व प्रतिमा बनविणारे आपले मन असते. मनाने जर चांगल्या वाईट प्रतिमा बनवल्या नाहीत तर आपले सर्वांचे व्यवहार हे नैसर्गिक रित्या सहज होऊ शकतात. आपले देव देश धर्म जात संप्रदाय ग्रंथ गुरु या सर्व अशाच मनाने बनवलेल्या प्रतिमा आहेत. या प्रत्येक प्रतिमा मधील प्रतिस्पर्धी नेते ते धार्मिक असोत राजकारणी असोत सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा कुटुंबातील नातलग असोत आपल्या प्रतिमा मध्ये कलह निर्माण करतात आणि आपले नैसर्गिक जीवन या प्रतिमांच्या कल हांनी  व्यापले जाते. 

आपण प्रत्येकजण एक स्वतंत्र मनुष्य शरीर आहोत हे आपण सोईस्कर रित्या विसरतो आणि इतरांचे प्रतिमांच्या आधारे आपण शोषण करीत राहतो. मी कर्ता आहे, मालक आहे इतर बायका मुले, नोकर चाकर, गोर गरीब, इतर वर्णीय व इतर धर्मीय यांचे मी शोषण करू शकतो ही भावना बळावली जाते. हाच आदर्श पुढील पिढ्या उचलतात आणि तीच मानवी परंपरा बनली जाते. हे असेच आहे असे मालक धरून जसे चालतो तसेच हेच आपले प्राक्तन आहे असे शोषले जाणारे धरून चालतात. मानवी प्रतिमांचे हे शोषण मग मानवी जाणिवेत इतके खोलवर झिरपले जाते की त्याविषयी नंतर विचार करणेच बंद केले जाते. सत्य खोलवर गाडले जाते, त्यावर असत्याची प्रार्थना स्थळे बांधली जातात आणि तेच प्रार्थना करतात सत्य प्राप्तीचे, परमशांती प्राप्तीची. मानवी प्रतिमा बनवून शांत न झालेले मन पुढे अज्ञात, निराकार ईश्वराच्या प्रतिमा बनवू लागते, आणि त्याच प्रतिमांच्या भजनी लागते.

Tuesday, August 18, 2020

जाणीव आणि नेणीव भगवंती नाही

प्रश्न: एखाद्या गोष्टीची जाणीव होते याचा अर्थ द्वंद्व अजून अस्तीत्वात आहे असा अर्थ निघतो का? म्हणजेच ज्याला सत्य कळते त्याला खरंतर त्याची जाणीव होत नाही असा अर्थ निघतो का? म्हणजेच ती व्यक्ति जाणीवांच्या पलीकडे गेली आहे असं समजायचं का ? 

जाणीव आणि नेणीव भगवंती नाही याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे.

जाणीव आणि नेणीव या मनाच्या अवस्था आहेत. जागृत अवस्थेत विचारा मुळे अनुभव येतात आणि झोपे मध्ये विचारा अभावी अनुभव येत नाही. सर्व मानवाचे अनुभव असेच असतात. ज्ञानी माणसाचे सुद्धा असेच असते. या जाणीव आणि नेणीव अवस्थां पलीकडील अवस्था जर असेल तर ती अनुभवात येणे शक्य नाही, त्याबद्दल काही सांगता येणे शक्य नाही, अशा अवस्थेला भगवंती नाव दिले गेले.

द्वंद्व याचा अर्थ समजू या. दोन गोष्टी असणे म्हणजे द्वंद्व. कोणत्याही जाणिवेत म्हणजेच अनुभवा मध्ये दोन गोष्टी कल्पिल्या जातात. एक अनुभव आणि दुसरी अनुभव करणारा.

अनुभव आणि अनुभव करणारा हे दोघे वेगवेगळे नसून एकच आहे, तो जो एक आहे तो केवळ विचार आहे हे समजणे म्हणजे अद्वैत आहे.

हे ज्याला कळते त्याला सुद्धा अनुभव येतच असतात, जाणीव होतच असते. जाणिवांच्या पलीकडे जाणे म्हणजे त्या जाणिवांना, अनुभवांना यथार्थ जाणणे की ते फक्त विचार आहेत.

म्हणजे घटना घडत असते ती सत्य असते परंतु त्या घटनेची मीमांसा न करता स्वीकारणे. घटनेची मीमांसा म्हणजे विचार येणे होय, तेच जाणीव आणि अनुभव निर्माण करीत असतात.

Friday, August 14, 2020

प्रेम आणि करुणा


प्रश्न : पालक आपल्या मुलाची काळजी घेतात. त्यांना चांगले  शिक्षण मिळावे म्हणून सुविधा  उपलब्ध  करून देतात. जे जे आवश्यक आहे त्याप्रमाणे मुलांची काळजी घेतात. पणअसे करताना ते आपल्या मुलांनी पुढे काय व्हावे, काय करावे, काय करू नये असे सांगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपले मत विचार आकांशा त्याच्यावर  लादतात. म्हणजे ते मुलावर खरे प्रेम करतात का? की मुलावर  अधिकार गाजवितात? मुलांवर अधिकार गाजवीत प्रेम करतो ते खरे प्रेम आहे काय? 

प्रत्येक सजीव हा एक स्वतंत्र जीव आहे आणि प्रत्येकाला आपले स्वातंत्र्य प्यारे असते. जर मला स्वातंत्र्य हवे आहे तर तसे स्वातंत्र्य माझ्या कुटुंबातील इतर सर्वांना हवे असते. मी जर कुटुंब प्रमुख म्हणून अधिकार गाजवीत असेन तर ते चुकीचे आहे. जर आपण आपल्या अधिकारातील इतरांना स्वातंत्र्य देत नसू तर त्याचा अर्थ आपण स्वतः अजून स्वतंत्र झालेलो नाही असा होवू शकतो. कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम असो वा नसो परंतु दुसऱ्या मानवी शरीरावर मालकी हक्क गाजविणे सर्वथैव अयोग्य आहे. मार्गदर्शन करणे वेगळे आणि मालकी हक्क गाजविणे वेगळे आहे. समाजाने आखून दिलेल्या कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची समज देणे हे कर्तव्य असते.

आपल्या मुलांना जे काही द्यायचे आहे ते जन्मतः आपण दिलेले असते. पूर्वीच्या पिढ्यांकडून जे आपणास प्राप्त झाले आहे ते आपण पुढच्या पिढीला देत असतो. आणि आपल्या वागण्याचा आदर्श पुढील पिढी उचलत असते जे अधिकार गाजवून शक्य होत नाही.


पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.... 

एखाद्या साम्राज्याचा सम्राट सुद्धा मनाचा गुलाम असतो हे जगज्जेत्या सिकंदर राजास भारतीय विचारवंतांनी पटवून दिले आणि तो माघारी परतला. संपूर्ण मानव जात ही मनाची गुलाम बनलेली आहे म्हणून ती इतरांना गुलाम करण्याच्या फंदात नेहमी असते. आपण मनाची गुलामी जेव्हा झुगारून देतो तेव्हा आपण खरे स्वतंत्र होतो बाकी सर्व बाह्य स्वातंत्र्य हे दिखावा मात्र आहे.

जबाबदारी, कर्तव्य आणि वासना यांचा ताळमेळ साधत मानवी मन प्रेम करण्याचा प्रयत्न करते परंतु ते प्रेम हे वैश्विक करुणेशी आपण तुलना करू शकत नाही. वैश्विक करुणेमध्ये विचार नसतात ते निव्वळ निखळ निर्वाज्य प्रेम असते.

Sunday, August 09, 2020

Krishnamurti Meditation


The first step is to perceive, perceive what you are thinking, perceive it, without any condemnation, justification, without wishing it to be different, perceive without center. 

And when you have perceived, you leave it, forget it. If you do not drop what you have learnt, what you have perceived, then there is a continuity of the movement of thought; and the movement and continuity of thought is time. And when the mind is caught in the movement of time, it is in bondage.

Can hought ever come to an end? 

That is the part of Krishnmurti meditation. It is part of a total mutation of the brain cells themselves, because if there is a continuity of the movement of thought, it is the repetition of the old, because thought is memory, thought is the response of memory, thought is experience, thought is knowledge.

The traditional approach to this question is control it, hold it, or learn to concentrate. 

Is not the controller part of the thought, part of the knowledge which says you must control?

So there is a way of observing thought without any control, without giving it a continuity, but observing so that it ends. 

And it is only when the mind is completely quiet, that there is the possibility of perception. To give one's attention completely, that attention itself is silence.

Silence is completely necessary, not only at the superficial level, but at the most deep level, at the very root of our being there must be complete silence.

Therefore the mind must observe, must be aware choicelessly of every perception and there must be the ending of that perception instantly, seeing and ending.

You know all this demands tremendous perception, tremendous vitality, energy. Now let us find how this energy comes into being.

The question is, can the ordinary everyday energy be heightened, can this energy be completely held without any form of distortion? 

Now let us find out, by investigating what is distraction.

Our energy is dissipated in conflict, conflict between two nations, conflict between two opinions, conflict between the husband and the wife and the children, conflict between trying to see God and suppressing all your instincts. That is also conflict, that is distortion. How does one have this complete energy without distortion? So that is a distortion of energy, every form of conflict dissipates energy.

So when you see the truth, when you perceive the truth that every form of conflict is a distortion, that very perception is the ending of conflict at that moment. Do not say "I have seen it once and I am going to hold on. And therefore there is no radical change in the structure of the memory, in the structure of the brain cells.

जिदु कृष्णमूर्ती यांची ध्यान साधना




कृष्णमूर्ती यांच्या ध्यान प्रक्रियेमध्ये पहिली पायरी आहे विचारांचे आकलन करणे ही होय. हे आकलन आपल्या दिवसभरच्या कार्याचे करावयाचे आहे. त्यांचे ध्यान केवळ अर्ध्या तासाचे नाही. आपल्या विचारांचे अवलोकन करताना त्यांचे विश्लेषण करू नका, त्यांची चिरफाड करू नका, त्यांना तिखटमीठ लावू नका, त्यांचे समर्थन करू नका, त्यांचा विरोध करू नका, ते अजून काहीतरी वेगळे असायला हवे होते अशी अपेक्षा करू नका, आपल्या मी ला केंद्रस्थानी आणू नका. केवळ त्रयस्थपणे संपूर्ण दिनक्रम उरकावा. अर्थात हे दिसते तेवढे सोपे नाही परंतु निकाल अभूतपूर्व आहे याची खात्री बाळगा. 

जेव्हा आपण विचारांना त्रयस्थपणे पाहण्यास शिकतो तेव्हा प्रत्येक विचार आकलनात आल्यानंतर त्या विचारांना तिथेच संपवून टाकायचे, संपूर्ण विसरून जायचे, ते विचार स्मृतीत राहिलेच पाहिजे असा प्रयत्न करूच नये. हातातून कपबशी पडली की ती फुटते आणि निकामी होते, परत वापरात येत नाही. थोडक्यात प्रिय आणि अप्रिय घटना विसरून जाणे. जर प्रिय आणि अप्रिय घटनांचे विचार तिथेच संपविले नाहीत तर त्यांना लगेच इतर विचारांचे फांदोरे फुटू लागतात, विचार सुरूच राहतात. भूतकाळातील विचार भविष्यकालीन योजना आखित काळाच्या कोठडीत बंधनात अडकले जातात. 

विचारांना थांबविणे हे महत्त्वाचे आहे हे जर आपल्या लक्षात आले तर आपण आपले सर्व व्यर्थ व्याप कमी करायला हवेत. वृथा भार वाहने थांबले पाहिजे.


विचारांचा कधी अंत शक्य आहे काय?

कृष्णमूर्ती यांच्या ध्यानाचा तो महत्वाचा भाग आहे. मेंदूमधून विचारांचे समूळ उच्चाटन करणे हेच त्यांच्या ध्यानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कारण जर विचारांची शृंखला चालू राहिली तर ती जुन्या विचारांची पुनरावृत्ती आहे, तो भूतकाळ आहे, कारण विचार म्हणजे स्मृती आहे, विचार म्हणजे स्मृतीचा प्रतिसाद आहे, विचार म्हणजे अनुभव आहे, विचार म्हणजेच माहितीचा संग्रह आहे. 

प्रश्न: कृष्णमूर्ती ध्यान म्हणजे दिवसभरच्या कार्याकडे सतत जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे होय. पण ते कसे करायचे आणि शक्य आहे काय?

केवळ त्या त्या वेळी आपण काय करीत आहोत यावर संपूर्ण जाणीव पूर्वक लक्ष देणे, यामुळे विचारांच्या साखळ्या तोडल्या जातात.  आपण मनाचा सहज स्वभाव जाणीवपूर्वक मोडला पाहिजे.  मनाचा धर्म आहे सतत बडबड करणे हा होय.

आपण कदाचित सतत लक्ष देणे विसरू शकतो, परंतु लक्षात येताच परत परत प्रयत्न करावयास हवे. आम्ही नेहमीच लक्ष देवू शकत नाही परंतु आम्ही मनामध्ये जे काही छेद निर्माण करतो ते मनाची विशाल भिंत मोडीत काढण्यासाठी तेवढे छोटे छेद पुरेसे असतात.  सत्याचा अविरत वर्षाव उर्वरित काम पूर्ण करेल.

ध्यानाकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन म्हणजे मनाला नियंत्रित करणे, धरून ठेवणे किंवा एकाग्र होणे शिकणे. हे जे पूर्वीचे ज्ञान आहे, हेच मन आहे आणि तेच नियंत्रक आहे, नियंत्रक स्वतः मन आहे त्यामुळे ते मनाला नियंत्रण करू शकत नाही.  म्हणून मनाला नियंत्रण न करता त्याचे केवळ निरीक्षण केले की मनाची निरंतरता संपली जाते. आणि जेव्हा मन पूर्णपणे शांत राहून निरीक्षण करते तेव्हाच मी ला समजण्याची शक्यता असते. जेव्हा आपण लक्षपूर्वक न्याहाळत असतो तेव्हा मनाची बडबड शांत झालेली असते तीच मनाची शांतता होय. 

शांतता पूर्णपणे आवश्यक आहे, केवळ वरवरच्या पातळीवरच नव्हे तर अत्यंत खोल स्तरावर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी संपूर्ण शांतता असणे आवश्यक आहे. आपले वास्तविक अस्तित्व पूर्ण शांत स्वरूपाचे आहे. मनाच्या बडबडीने आपल्याला त्याची जाणीव नसते, मनाची बडबड थांबली की आपण आपल्या मूळच्या अस्तित्वाच्या परमशांत अवस्थेशि एकरूप होतो. 

देहाच्या नैमित्तिक कर्मा एव्हढेच विचार येतील, कर्म संपले की विचार बंद होतील परत परम शांत अवास्थेशी एकरूपता साधली जाईल.

सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये असे setting करता येते की तो फक्त हालचाल आपल्या स्मृत्तीमध्ये साठवू शकतो आणि उर्वरित वेळेत काहीही साठवले जाणार नाही. 

म्हणून मनाने फक्त अवलोकन केले पाहिजे, प्रत्येक अनुभव करताना विना निवड जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्वरित त्या जाणिवेची आणि अनुभवाची समाप्ती होणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. 

पाहणे, पाहिलेले विसरून जाणे आणि तेच सतत करत राहणे हेच कृष्णमूर्ती यांचे ध्यान आहे आणि तीच केवळ साधना आहे, सर्व साधनांचे हेच मूळ आहे, विचारांची निरंतरता संपवून टाकणे.


ध्यानासाठी लागणारी ऊर्जा

आपणास कदाचित हे कळले असेल की सत्य आकलनात येण्यासाठी प्रचंड चैतन्य आणि ऊर्जेची आवश्यकता असते.  आता ही ऊर्जा कशी येते हे शोधूया.

प्रश्न असा आहे की आपली सामान्य उर्जा अधिक वाढवता येऊ शकते काय? कोणत्याही प्रकारच्या विचलन शिवाय ही उर्जा पूर्णपणे वापर केली जाऊ शकते काय? आपणास कोणत्या गोष्टी विचलित करतात याचा आता आपण शोध घेऊया. वेगवेगळी मतं मतांतरे, वादविवाद, संघर्ष यामुळे आपली शक्ती व्यर्थ वाया जात असते. हा संघर्ष वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक ते आंतरराष्ट्रीय युद्धे असा वाढत जात असतो. संघर्ष आणि मतांतरे यामुळे आपली ऊर्जा वाया जात असते. चुकीच्या संस्कारांनी अंधश्रद्धा वाढीस लागतात, मनाला नियंत्रित करण्यासाठीचे विविध उपायांनी आपण भरकटले जातो. ज्याक्षणी आपल्या हे लक्षात येते की संघर्षाचा प्रत्येक प्रकार आपणास विचलित करीत आहे, आपणास भरकटत ठेवण्याचे कार्य करीत आहे   त्या क्षणीचे ते आकलन आपल्यातील विकृती नष्ट करते. जर त्या वेळी आपण ती विकृती नष्ट करण्याची कृती नाही केली व नंतर पाहु असे म्हणून टाळली तर हातातोंडाशी आलेली संधी आपण दडवित असतो. आणि म्हणून मेंदूच्या पेशींच्या संरचनेत, मेमरीच्या रचनेत कोणतेही मूलगामी बदल होत नाहीत.

Sunday, August 02, 2020

उत्कर्ष



आपला उत्कर्ष व आपल्या समाजाचा उत्कर्ष वेगळा नाही आणि तो बाहेरून नव्हे तर आतून होत असतो.

आपले जीवन खरेच नैसर्गिक आहे काय? आपण सर्व परिस्थिती मध्ये आपली नैसर्गिक जीवन शैली कायम ठेवत आहोत काय? फक्त अंगावर विशिष्ट कपडे घालून प्रदर्शन करणे म्हणजे नैसर्गिक आदर्श जीवनशैली नव्हे. जर आपली जीवनशैली खरेच नैसर्गिक, सहज झाली असेल तर त्यामुळे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर अखिल मानवजातीच्या जाणिवेत बदल घडत असतो. याचे कारण असे आहे की आपली जीवनाविषयी ची जी जाणीव आहे ती आपली एकट्याची नसते तर आपल्या आसपासच्या समाजाचे ते प्रतिबिंब असते. आपला सर्व मानव समाज हा सारख्याच समस्यांशी झगडत आहे. समाजातील बहुतांश जण दुखी आहे, नैराष्येने ग्रासलेला आहे. सगळेजण त्रस्त, चिंताग्रस्त, अनिश्चित, एकाकी, असुरक्षित जीवन जगत आहोत. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हे असेच घडत आहे आणि आपण सर्वजण त्याचाच एक भाग आहोत. 

ज्यावेळी या मानव समाजातील एखादी जरी व्यक्ती आपल्या जीवनशैली मध्ये आमूलाग्र बदल करून सहज आणि नैसर्गिक शैलीने जगण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी त्याच्या जीवनशैलीचा फायदा मानव समाजाचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागत असतो. आपणा प्रत्येकामध्ये ती शक्ती विराजमान आहे परंतु आपण तिच्या कलाने जगत नाही. जर आपण आपल्या अंतःप्रवाहास अडथळा निर्माण न करता रिकामी वाट करून दिली तर ती शक्ती योग्य कार्य करत आपला व मानव समाजाचा उत्कर्ष साध्य करेल.

Is your life sacred, holy? Are you acting rightly under all circumstances? It does not mean putting on robes and all that circus. If your life is sacred, you affect the consciousness of mankind, because you are the representative of all humanity. Your consciousness is the consciousness of all humanity, because all human beings suffer, despair, hope, live in anxiety, in uncertainty, are lonely, with no security. This is happening right through the world, and you are part of that. Therefore if your life is changed radically, if your life is sacred, you affect the consciousness of man. That means the flame of discontent, the energy which is so tremendous if you do not run away from it, that energy will find the right action always.

- J Krishnamurti,
Public Discussion 3 in Madras (Chennai), 3 January 1978

Thursday, July 23, 2020

Observer is observed


Observer is observed हे कृष्णमूर्ती यांचे क्रांतिकारक उद्गार आहेत. त्यांच्या या उद्गाराचा खरोखर अर्थ समजला तर अध्यात्म समजणे खूप सहज होऊन जाते. याचा प्राथमिक अर्थ द्रष्टा हाच दृश्य आहे असा होतो. परंतु नेमका दृष्टा-दृष्य हे समजत नाही. आणि इथेच बहुतेकांचा गोंधळ उडत असतो. 

दृष्टा म्हणजे अनुभव करणारा कर्ता होय आणि दृश्य म्हणजे आपण जे अनुभव करतो ते कर्म होय. अनुभव करणारा मी व अनुभवात येणारे कर्म, कार्य वगैरे. अनुभवा मध्ये अनुभव व अनुभव करणारा असे द्वैताचा भास होत असतो. 

अनुभव हा शारीरिक नसून तो मानसिक विचार प्रक्रियेचा भाग आहे. मानसिक स्वभावाच्या अनुभवा मध्ये आपले विचार हे दुभागले जातात. विचारच मानसिक कर्ता व विचारच मानसिक कर्म या पद्धतीने वेगवेगळे भासविले जातात. यातील कर्ता हा मी म्हणजे आपण आहे असा भास निर्माण होतो आणि कर्म म्हणजे अनुभव हे दृश्य आहे असा भास निर्माण होत असतो. कर्ता मी हा विचार, विचारच असलेल्या कर्मापासून स्वतःस वेगळा समजू लागतो आणि द्वैत निर्माण होते. 

शरीरास भूक लागणे हे नैसर्गिक व एक शारीरिक गरज आहे.  परंतु मला चांगले व पोटभर खायला हवे ही आपली मानसिक ईच्छा असते. 
या उदाहरणात शरीर हे दृष्टा नसून भुकेचा विचार करणारे मन हे दृष्टा आहे. मिळेल ते अन्न शरीर खाते हे नैसर्गिक आहे. 
मला जेवण भेटले, ते चांगले होते किंवा वाईट होते, कमी होते किंवा अधिक होते, माझी भूक भागली अथवा मी अजूनही उपाशी आहे हे सर्व विचार म्हणजे अनुभव होत आणि त्यालाच दृश्य असे समजण्यात येते.
भूक लागणे, अन्न मिळवणे, अन्न खाणे, अन्न पचविणे या सर्व नैसर्गिक शारीरिक क्रिया आहेत, त्यांचा द्रष्टा किंवा दृश्य या विधानाशी संबंध नाही.

प्रथम आपल्या दिवसभरातील नैसर्गिक, शारीरिक क्रिया कोणत्या आहेत व मानसिक क्रिया कोणत्या आहेत याचे पृथक्करण करता यायला हवे त्यालाच कृष्णमूर्ती Choiceless awareness ध्यान असे म्हणतात. असे ध्यान ही ठराविक वेळेची साधना न होता आपला नित्य दिनक्रम बनला जातो. नैसर्गिक व मानसिक क्रियांच्या पृथक्करण करण्याच्या समजेतून सत्य काय आहे व असत्य काय आहे याची स्वतःस उकल होवू शकते. स्वतःच्या अनुभवातून ही उकल शक्य असते तिथे बाह्य मार्गदर्शन, मदत उपयोगी पडू शकत नाही. सत्य इतके साधे, विना सायास आणि सोपे आहे परंतु अती काल्पनिक भोंदूगिरी मुळे आपला विश्वास बसू शकत नाही. 

दृष्टा व दृश्य एकच आहेत हे लक्षात आल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात सहजता येते. मला एखादी गोष्ट अयोग्य आहे हे पटल्या नंतर मी ती कदापिही करणार नाही. कदाचित आपणास दृष्टा व दृश्य एकच आहेत हे तत्त्वज्ञान माहीत नसेल, आपणास ती अध्यात्मिक संकल्पना माहिती नसेल परंतु आपले आचरण तसे असेल तरीही तो जीव मुक्त आहे. एखाद्याला अभ्यासाने सत्य काय आहे हे समजले असेल किंवा एखाद्याचा अभ्यास नसेल परंतु त्याचे आचरण सत्यवादी चे असेल तरी दोघेही सत्यवादी आहेत. अभ्यासाने ज्याला समजले व इतरांना जो समजावून देवू शकत असेल त्याला आपण ज्ञानी म्हणू शकतो आणि ज्यांना समजले नाही परंतु आचरणात आले आहे त्यांना आपण सात्विक भक्त म्हणत असतो.

Wednesday, July 22, 2020

गुरूंचे सहाय्य कितपत असते?


Truth is pathless land असे JK म्हणतात याचा सरळ सरळ अर्थ असा वाटतो की सत्य प्राप्तीचा कोणताही मार्ग नाही. 

परंतु त्याचा इतर अर्थ असा असू शकतो की पूर्वी कोणीही न चोखाळलेला रस्ता, आपला स्वतःचा मार्ग असाही अर्थ असू शकतो. यासाठी total independence आवश्यक असावे. 

एखादे ज्ञानी आपले मित्र आहेत, त्यांच्या बरोबर राहिलो, त्यांच्या पुस्तकांची पारायणे करीत राहिलो की काम संपले असे वाटण्याची शक्यता असते. यामध्ये आपण आपले स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो. स्वतः काही वेगळा प्रयत्न न करता त्यांच्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याच्या खाजगी मालकीच्या मार्गाने आपण जावू शकतो परंतु आपण त्याचे मालक नाही बनू शकत, असे कदाचित intelligence चे नियम असू शकतात. 

एखाद्या realised master च्या सानिध्यात राहण्याचे भाग्य लाभू शकते, त्याचे संस्कार मिळू शकतील, ते मार्ग सुद्धा दाखवतील  परंतु तरीही सत्य समजणार नाही कदाचित तो मार्ग उघडण्या आधी आपणास काही वेगळ्या अनुभवा मधून जावयाचे बाकी असेल, काही अग्नी परीक्षा द्यायच्या बाकी असतील आणि आपली ती तयारी नसेल. May be, just speculations.

Monday, July 20, 2020

अज्ञान म्हणजे काय?


आपले विचार व आपली माहिती हि अज्ञानी व असत्य का आहे? 

आपल्या अज्ञानामुळे आपणास ज्ञान प्राप्त होत नाही. अज्ञान म्हणजे आपल्या मेंदूच्या स्मृतिमध्ये साठवली गेलेली अज्ञानमुलक माहिती होय. सूर्य नित्य, सदोदित आहे परंतु त्याचे कधी कधी दर्शन होत नाही याचा दोष सूर्याचा नाही तर त्याच्या व आपल्या मध्ये येणाऱ्या रात्र, ढग आदि अडथळ्यांचा आहे. आपल्या कडील माहितीचा संग्रह हेच ज्ञान प्राप्तीस अडथळा करत असते. आपल्या माहिती मध्ये आपली वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहिती बरोबर इतर ग्रंथ, संप्रदाय, संत, तत्वज्ञानी, राजकारण, समाजकारण या सर्वांचे विचार असतात. हे सर्व विचार म्हणजे ज्ञान नसून ते अज्ञान आहे आणि या अज्ञानी विचारांमुळे आपणास ज्ञान प्राप्त होत नाही. हे केवळ ऐकून समजणे वेगळे आणि तेच सत्य आहे याची खात्री पटणे वेगळे आहे. 

विचार व माहिती हे दोन्हीही भूतकाळातील आहेत, भविष्य काळामध्ये त्यावर आधारित कृती अपेक्षित असते म्हणून ते अर्धवट आहेत. या अर्धवट माहिती व विचारांमुळे आपल्या स्वतःमध्ये व समाजामध्ये सर्वत्र दुही, वितुष्ट, दुफळी, युद्धे होत असतात. आपली मने कलुशीत होण्यास ही अर्धवट माहिती कारणीभूत आहे. मनामधील कलुशित माहितीमुळे मेंदू सुद्धा दूषित होतो. दूषित मेंदूमधील प्रदूषित विचारांचे पूर्वग्रह दूषित अज्ञानाचे नमुने (pattern) तयार होवू लागले की संपूर्ण मानवी समाज सतत एकमेकांशी विरोध करीत राहतो. 

मानवी स्वभावातील या विरोधिभासाचे कारणे बाहेर शोधली जातात. अनेक विद्वान त्यावर विद्वत्तापूर्ण लिखाण करतात, भाषणे देतात, पक्ष काढतात, सत्ता हस्तगत करतात परंतु मानवी समस्यांचे निराकरण होत नाहीच, समाजाचे एकत्रीकरण होत नाही, उलट ते सर्व fascisam कडे वाटचाल करत राहतात.

मानवी समस्यांचे मूळ आपले विचार आहेत. विचार आपल्या अस्तित्वाचे विभाजन करतात. एक विचार कर्ता बनून दुसऱ्या विचारांचे कर्मात रूपांतरण करून कर्ता व कर्म वेगळे आहेत असे भासविले जाते. कर्ता नेहमी आता मी काय कर्म करत आहे व भविष्यात काय कर्म करायचे आहे यांची नेहमी तुलना करत असतो. आपल्या अस्तित्व मधील हे प्राथमिक विभाजन हेच नंतर आपल्या कुटुंबातील, समाजातील दुहीचे कारण बनते, हे समजणे म्हणजे realisation आहे जे विचारांवर आधारीत नसून part of intelligence आहे. हि विवेक बुद्धी अज्ञानाचा नाश करते व आपणास ज्ञानाशी एकरूप करते.

Saturday, July 18, 2020

मी चे आकलन

जसे स्मार्टफोन सारख्या हार्डवेअर ला अँड्रॉइड सारखी ऑपरेटिंग सिस्टीम लागते तशी मानवी शरीराला विचारांची गरज असते शरीर संगोपन करण्यासाठी.

अँड्रॉइड सिस्टम वर वेगवेगळी ऍप इंस्टॉल करून आपण ऑडियो, व्हिडिओ, चॅटिंग करू शकतो तसेच विचार हे शरीर संगोपनार्थं कुटुंब, समाज, संप्रदाय आदि संकल्पना तयार करून त्याद्वारे स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो.

शरीराच्या ज्ञान इंद्रियांना झालेल्या संवेदना मेंदूकडे पाठविल्या जातात, मेंदूत त्यांचे पृथक्करण होवून त्या साठविल्या जातात. याला आपण *अनुभव* म्हणतो. मेंदूच्या *स्मृतिमध्ये* जे काय *ज्ञान* साठविले जाते त्यांचे विचार निर्माण होवून ते स्फुरण पाऊ लागतात. ते विचार *मी* चे एक वेगळे भासमान अस्तित्व तयार करतात, तो अहं, कर्ता म्हणून शरीराचा ताबा घेतो. हा आगंतुक मी पाहुणा असून मालक बनतो आणि शरीरास काय हवे व काय नको या ऐवजी त्याला काय हवे व नको याची जास्त काळजी घेतो. 

विचार थांबले की मी नाहीसा होतो म्हणून मी चतुरपणे मेंदूला सतत विचारात गाडून टाकतो. 

आपला प्रत्यक्ष काहीही संबंध नसताना अनेक विषय आपले मन चघळत राहते आणि मी चे अस्तित्व शाबूत राहते.





या सर्व वेगवेगळ्या प्रतिमा आहेत. प्रतिमा चित्रित केल्या नंतर त्या भूतकाळात जमा होतात, मृत होतात. परंतु जेव्हा भूतकालीन मृत प्रतिमा एका मागून एक जलद गतीने दाखविल्या गेल्या तर त्यातून जिवंत भासणारे चलत चित्र तयार होते. (काही कारणाने वरील प्रतिमांची तयार केलेली अनिमेशन फाईल upload होवू शकली नाही).

शरीरास होणाऱ्या संवेदना या एक एक इमेज असतात परंतु मेंदू, मन, विचार, मी हे सर्व मिळून त्या वेगवेगळ्या इमेज ची एक घटना बनवतात. अशा अनेक घटना जागृत अवस्थेत आपल्या स्मृतीत साठवील्या जातात आणि ते आपले ज्ञानभांडार बनते. आपण आपली, आपल्या नातलगांच्या अशा इमेज बनवून स्मृतीत ठेवल्या आहेत. या साठविलेल्या images खरेतर भूतकाळ आहे, dead आहेत. परंतु मन त्यांना सतत play करत जिवंत ठेवते. 

आपण आपल्या मित्रांशी मैत्री करतो म्हणजे आपली इमेज व आपल्या मित्राची इमेज यांची मैत्री असते. दोन्ही इमेज आहेत, दोन्ही भूतकालीन आहेत त्यामुळे मैत्री, प्रेम जे जिवंत आहे ते भूतकालीन इमेज पासून शक्य नाही. परंतु मन स्वार्थासाठी तशी भावना तयार करते. त्यामुळे स्वार्थापोटी तयार झालेले, मानवी विचारांवर तयार झालेले प्रेम तकलादू असते.



ब्रम्ह जिज्ञासा

1) सर्वं खल्विदं ब्रह्म...... हे वेद वाक्य आहे. सर्वच ब्रह्म आहे. तर  मग  जगत  दिसूच नये.  नेह नानास्ति किंचन. आम्हाला नाना आकार दिसतात. हे कसे?  
2) तत्वमसि. ते तूं आहेस. असे वेद सांगतो. आम्हाला तसे न वाटता मी देह आहे असे वाटते.  
3) ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या...... आम्हाला जगत सत्य वाटते. ब्रह्म माहीतच नाही. मग जीवो ब्रह्मैव ना पर: हे कसे कळावे?

उत्तर: चार वेदांचे सार म्हणून प्रत्येक वेदांची प्रत्येकी एक अशी चार महावाक्ये आहेत. त्यावेळच्या साक्षात्कारी ऋषींचा तो साक्षात्कार असणार. साक्षात्कारी म्हणजे ज्यांचा वैयक्तिक *मी* हा वैश्विक *ब्रम्ह* झाला आहे असे योगी. असे conversion झाल्याशिवाय त्या अवस्थेची अनुभुती येणे शक्य नाही. ब्रम्ह अवस्थेला पोहोचलेला योगी सर्वत्र केवळ ब्रम्ह अनुभवतो. याचा अर्थ त्याला आसपासच्या व्यक्ती, चराचर दिसत नाही असे नाही परंतु ते सर्व ब्रम्ह आहे असे त्याला दिसते. पूर्वीच्या व नंतरच्या अनुभवात फक्त अनुभवणारा बदलतो. अनुभव तेच असतात फक्त अनुभवणारा *मी* ऐवजी *ब्रम्ह* झालेला असतो. 

आपल्या स्मृतीमध्ये साठलेल्या अनुभव, माहिती आदींचे गाठोडे म्हणजे *मी* आहे. गाठोड्या मधील चष्म्याची साथ घेवून गाठोड्या बाहेरील बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत म्हणून सत्य दिसत नाही.

Tuesday, July 14, 2020

Real Meditation


Meditation हा विषय आपण स्वतःच संशोधन करण्याचा विषय आहे. प्रत्येकाने स्वता: तो शोध घेतला पाहीजे, मार्गदर्शन J.Krishnmurti यानी व भगवान बुद्धाने करुन ठेवलेच आहे पण त्यांच्या शिकवणुकीचा सार काही कुणाच्या लक्षात येत नाही व मग फक्त बुद्धीच्या स्तरावर शब्दश: अर्थ काढले जातात. प्रत्यक्षात practically काही ध्यान घडतच नाही. 

प्रथम meditation चा उद्देश आपल्या मनात स्पष्ट झालेला असायला हवा. 

मी चा शोध घेणे म्हणजे meditation आहे. 

या मीचा शोध घ्यायचा असेल तर मनाचा शोध घ्यावा लागतो कारण मी ची भावना हि मनाशी संबंधीत आहे. मन म्हणजे काय याच्यावर चिंतन केले तर मन हे नाम - रुप स्वरुपाचे आहे असे लक्षात येते. मी शोधायचा असेल तर मन समजुन घ्यावे लागते, मन म्हणजेच consciousness होय. Consciousness हा नेहमी दोन घटकांचा बनलेला असतो व ते दोन घटक असतात अनुभवणारा आणि अनुभव. Consciousness म्हणजे experience - experiencer.

अनुभव व अनुभवणारा यांचे स्वरुप समजुन घेणे, त्यांची कार्यपद्धती समजुन घेणे, त्यांचे स्वाभावीक गुणधर्म समजुन घेणे, त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध समजुन घेणे म्हणजे Real meditation होय. 

या अनुभवणारा - अनुभव यासाठी अध्यात्मात नाम - रुप असा शब्द आहे. नाम म्हणजे अनुभवणारा व रुप म्हणजे पंचभुतांचा अनुभव. यालाच इतर अनेक विशेषणे आहेत: 

  • experiencer - experience
  • द्रष्टा - दृश्य 
  • subject - object
  • अहम - इदम 
  • अस्मद - युष्मद 

म्हणजेच Real meditation चा अर्थ आहे 
या experiencer - experience विषयी सतत अखंड प्रतिक्षण वर्तमान क्षणात सजग रहाणे. प्रतिक्षण जिवन जगत असताना या दोघा विषयी आपल्याला सजग रहायचे आहे ही एक कला आहे ही कला आत्मसात करणे म्हणजे Real meditation होय. 

आता आपल्याला जिवन जगताना निरनिराळ्या गोष्टीचे अनुभव येत असतात, जे खालील गोष्टींचे असु शकतात,

(१) कायेचे अनुभव 

(२) इंद्रियांचे अनुभव 

(३) चित्ताचे अनुभव 

(४) अनुभवणाऱ्याचा अनुभव 

अनुभवणाऱ्या शिवाय अनुभव कधीच अस्तित्वात नसतो व अनुभवाशिवाय अनुभवणारा कधीच अस्तित्वात नसतो. हे प्रथम आपल्याला पक्के माहीत पाहीजे. कारण नाम - रुप म्हणजे experiencer - experience ही joint psycho- physical
Phenomenon आहे. ही joint psycho - physical phenomenon विषयी आपल्याला काहीच फारसे माहीत नसते व या मनो कायीक प्रक्रियेविषयी नीट माहीती नसण्यालाच अविद्या / अज्ञान म्हटले गेले आहे. 

प्रत्यक्ष वर्तमानातील क्षणात या experiencer - experience ला जाणणे म्हणजेच Real meditation होय, आता real
meditation अजुन सोपे करुन टाकु 
experiencer -experience या दोन गोष्टीसाठी आपण एकच शब्द वापरु experience मग experience म्हणजे काय याचा शोध घेणे म्हणजे real meditation अशी सोपी व सुटसुटीत व्याख्या आपण real meditation ची करु. 

ईतक सोप आहे real meditaion, वर्तमानात जो काही अनुभव येत आहे त्या अनुभवाचे वर्तमानात निरीक्षण करत त्या अनुभवाचे संपुर्ण स्वरुप जाणणे म्हणजे real meditation होय. 

मला वाटते real meditation चा खरा अर्थ आता सर्वांच्या लक्षात नक्की आला असेल, बस real meditation असे असते. Real meditation काही रहस्यमय बाब नव्हे ती आपल्या जिवनाशी direct संबंधीत असलेली बाब आहे. 

असा वर्तमानातील आपल्या जिवनात अनुभवास येणाऱ्या प्रत्येक experience चा समजुन उमजुन निरीक्षण करत आपण शोध घेतला तर आपल्याला experience चा स्वभाव, experience चे प्रकटने व experience चा लय होणे ही प्रक्रिया सतत घडत असल्याचे आपल्याला उमजु लागते. 

बाहेर प्रसंग घडतो व अंतरंगात काही तरी अनुभव येतो, जर मनासारखी घटना घडली तर सुखाचा, समाधानाचा, तृप्तीचा अनुभव येतो व मनाविरुद्ध घटना घडली तर दुखाचा, असमाधानाचा, निराशेचा, अतृप्तीचा अनुभव येतो किंवा ती घटना आपल्याशी संबंधीत नसेल तर मग कोणताही सुखाचा वा दुखाचा अनुभव आपल्या अंतरगात उठत नाही, ज्या गोष्टीशी आपले तादात्म्य असते त्याच गोष्टीचे अनुभव सुखदायक वा दुखदायक बनुन अंतरंगात प्रकटतात. जसे जर भारत पाकीस्तानची one day cricket match झाली व भारत हरला तर भारताशी तादात्म्य असल्याने सर्व भारतीयाना दुखाचा व निराशेचा अनुभव येतो व पाकीस्तानी लोकाना सुखाचा व समाधानाचा अनुभव येतो, जितके तादात्म्य अधिक, जितके conditioning अधीक तेव्हढा जास्त तीव्रतेचा अनुभव येत असतो, एखाद्याला जर भारताविषयी खुप जास्त तादात्म्य असेल तर त्याला भारताच्या पराभवाने प्रचंड दुख होत असते व जर एखाद्याचे भारताशी फार तादात्म्य नसेल तर भारताच्या पराभवाने त्याला फार दुख वा निराशा अनुभवाला येत नसते, ही गोष्ट आपण अगदी clearly समजुन घेणे गरजेचे आहे, आता पहा घटना तर एकच घडली की cricket match चा निकाल लागला पण त्या एकाच घटनेने भारतीय मन दुखी झाले तर पाकीस्तानी मन सुखी झाले, आता आपण ही match ची घटना जर एका जपानी माणसाला कळली तर त्याला सुखही होत नाही व दुखही होत नाही कारण त्याला भारताशीही तादात्म्य नाही व पाकीस्तानशी ही तादात्म्य नाही व cricket शी ही तादात्म्य नाही त्यामुळे त्याला कोणताही सुखाचा वा दुखाचा अनुभव येत नाही, सुख वा दुखाचा अनुभव येण्यासाठी आधीचे तादात्म्य वा conditioning वा संस्कार असावे लागतात तरच त्या conditioning नुसार अनुभव येतात हे नीट उमजले तर मग सर्व अनुभवांचे गणीत स्पष्ट होत असते. तसेच हे अनुभव कसे निरास पावतात हेही आपण नीट समजुन घ्यायचे आहे कारण सर्व अनुभवांच्या निरासात सत्य प्रकटन होत असते.

J. Krishnmurti नेहमी म्हणतात if you can end all experiences of conscious, subconscious, unconscious and universal consciosness then in ending of totality of all experiences there is realization of truth. म्हणुन या अनुभवांच्या निरासाचेही गणीत आपण नीट समजुन घ्यायचे आहे या अनुभवां विषयी जर आपण आसक्ती द्वेषाची प्रतिक्रिया केली तर हे अनुभव अधीक बळकट होत असतात व जर या अनुभवाविषयी आपण सजग निर्विकल्प राहीलो तर या अनुभवांची ताकद संपुन जात असते व शेवटी हे अनुभव पुर्णपणे निरास पावत असतात.

J. Krishnmurti म्हणतात, Choiceless awareness is a process of meditation. हा अनुभवांचा निरास आपण एका दृष्टांतानुसार समजुन घेवु.

आपल्या कार ची battery चे उदाहरण आपण घेवु जर कार पुढे चालवली तरी battery charge होते व कार मागे, reverse चालवली तरी battery charge च होते. तुम्ही positive reaction करा की negative reaction करा, battery charge च होते पण जर तुम्ही कार जागेवरच दोन- चार महीने उभी ठेवली तर battery आपोआप discharge होते तसे मन रुपी अनुभव वा अनुभवरुपी संस्कार निरास करण्यासाठी साक्षीभावात स्थीर असलेल्या सजग निर्विकल्प निरीक्षणाची गरज असते असे choiceless observation घडले तर अनुभव निरास पावत असतात जशी battery आपोआप dishcharge होते तसे. ही गोष्ट तुम्हाला नीट समजली तर तुमच्या meditation ला सुरवात झाली म्हणुन समजा. असे आपले नेहमीचे जिवन जगत असताना ज्या घटना आपल्या जिवनात वर्तमानात अनुभवायला येतात त्या सर्व अनुभवां सोबत निर्विकल्प निरीक्षणात स्थीर असणे म्हणजे real meditation.

अशा पद्धतीने समजेतुन साक्षीभावात स्थीर झाल्यास सुख, दुख, चिंता काळजी, भय, क्रोध, greed, desire ईत्यादी सर्व अनुभवांचे गणीत सुटत असते. 

अशा पद्धतीने प्रत्येक अनुभवासोबत खालील प्रमाणे contemplation हे सुरु ठवायचे आहे हे contemplation म्हणजे अनुभव समजुन घेणे होय. 

आता Real meditation ची theory आपल्याला समजली मग ही समजेची पट्टी आता आपण आपल्या जिवनात येणाऱ्या सुख व दुखाच्या अनुभवाना खाली दिल्याप्रमाणे लावायची आहे, प्रत्येक अनुभव आला की आपण contemplation सुरु ठेवायचे, 
  • experience is past, संस्कार नेहमी भुतकाळातील संस्कार असतो. 
  • experience is conditioning, अनुभव नेहमी पुर्व मान्यता असतो. 
  • experience च्या मुळाशी cause - effect असतो, कार्यकारणभाव असतो.
  • experience म्हणजे Recycling असते
  • experience म्हणजे Remoulding असते,
  • experience एक यांत्रीक घटना आहे.
  • experience is illusion, अनुभव हा भ्रम असतो.
  • experience is transient असतो, अनुभव नेहमी अनित्य असतो, नेहमी बदलणारा असतो 
  • experience is joint psycho - physical phenomenon, अनुभव ही मनातील मनोकायीक द्वैत प्रक्रिया आहे.
  • experience is time process and becoming process, अनुभव हा भुतकाळातील असतो व तो वर्तमानात प्रकटतो व आपण आवड निवडची प्रतिक्रिया केली तर भविष्यकाळाची निर्मिती होते व काळाचे चक्र अखंड कार्यान्वीत रहाते.
  • आणी सर्वात महत्वाचे व कदाचीत आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे experience is experiencer ही अद्वैत बुद्धीची समज.

ही समज जर आली तर द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होत असते व अद्वैत बुद्धीत खरा choiceless awareness प्रकटत असतो जो समजेतुन प्रकटलेला असतो, हा साक्षीभाव बळजबरीचा काही हेतु धरुन बळजबरीचा साक्षीभाव नसतो या खऱ्या choiceless awareness च्या दिव्य अशा अद्वैत दृष्टीच्या समजेत अनुभवाचा निरास आपोआप घडत असतो. ही experience is experiencer ही समज खरी समज आहे, meditation शिकवणारे सर्व अज्ञानी गुरु शिकवतात की experiencer हा experience पेक्षा भिन्न असतो पण J.Krishnmurti सारखा खरा मार्गदर्शक आपल्या experience is experiencer अशी जगावेगळी समज देवुन आपल्या द्वैत बुद्धीचे परीवर्तन अद्वैत बुद्धीत कसे करतो हे अनुभव घेण्यासारखे आहे. experience असेल तर सोबत experiencer असलाच पाहीजे, experiencer असेल तर सोबत experience असलाच पाहीजे, जेव्हा असतात तेव्हा दोन्ही असतात व जेव्हा नसतात तेव्हा दोन्ही नसतात असे जेव्हा असते तेव्हा ते भिन्न नसतात ते एकच असतात, आता पहा रात्री दोन वाजता जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असतात तेव्हा तुमचे पाचही इंद्रिय झोपलेली असतात, विचार बंद असतात, स्वप्नही नसते, कोणताच experience नसतो तेव्हा experiencer असतो का ? तेव्हा experiencer नसतोच आपण झोपेत कोठे आहोत याचा पत्ताही नसतो, पलंगावर आहोत की गटारीत पडलो आहोत की जंगलात आहोत की मच्छरदाणीत आहोत, जिवंत आहोत की मेलेलो आहोत याचेही भान नसते म्हणुन J.Krishnmurti सांगतात 

  • observer is observed
  • experience is experiencer
  • द्रष्टाच दृश्य आहे 
  • अनुभवच अनुभवणारा आहे 
  • कर्ताच क्रिया आहे व क्रियाच कर्ता आहे.
  • ज्ञाताच ज्ञेय आहे.
  • seer is seen 

या नाम रुपात्मक joint psycho - physical phenomenon ची समज येणे हीच गीतेतील दिव्यदृष्टी आहे, ही दिव्यदृष्टी प्रकटली, ही समज आली तर पुढील आत्मज्ञान घटना आपोआप घडते. ही समज ध्यानाची गुरुकिल्ली आहे हे ज्याला ज्याला समजेल व ज्याचे चित्त शुद्ध असेल त्याला ज्ञान झाल्याशिवाय रहाणार नाही याची ग्वाही खरे मार्गदर्शक दोन्ही बाहु उभारुन देत असतात जसे व्यासानी बाहु उभारुन सांगीतले तसे. 

सर्व अज्ञानी गुरु मात्र या समजेच्या विरुद्ध शिकवण देवुन अज्ञानी जीवाला कायमचे भवचक्रात अडकवुन ठेवत असतात ही 100% fact आहे. 

हे ज्याला उमजेल तो भाग्यवान.

  • conscious
  • subconscious
  • unconscious
  • universal consciousness

या सर्व स्तरावरील असे हे सर्व संपुर्ण नामरुपात्मक भ्रमाचे अनुभव निरास पावतात तेव्हा नामरुपाचा खेळ ज्या निर्गुण निराकार तत्वाच्या अधीष्ठानावर सुरु असतो त्या निर्गुण निराकार तत्वाची ओळख त्या निर्गुण निराकार तत्वाला होते याला आत्मज्ञान म्हणतात. 

यापेक्षा अध्यात्म दुसरे काहीच नाही. 


  • श्री विजय पांढरे, 9822992578, vbpandhare@gmail.com