Saturday, October 17, 2020

गुरु आणि संप्रदाय

आपणा बहुतेकांचा अध्यात्मिक प्रवास हा कोणत्या तरी अध्यात्मिक संप्रदायाशी संबंध आल्याने सुरू होतो अथवा आपण त्या संप्रदायाशी संबंध जोडतो. याचे कारण असे असते की त्यांनी आपणास आपल्या दुःखातून मुक्तीचे आश्वासन दिलेले असते. आणि आपण सर्वजण जीवनामध्ये सुरक्षा अपेक्षित असतो तसेच मानसिक आणि भावनिक सुखाची लालसा ठेवून असतो. आपली हीच लालसा त्यांच्या कडून आपले शोषण करण्यास कारणीभूत ठरते. अशा कोणत्याही संप्रदायाच्या जवळ अथवा गुरु जवळ काहीही अध्यात्मिक शक्ती नसते. बाह्य संप्रदाय आणि गुरु आपणास आपल्या दुःखातून, अज्ञानातून मुक्ती देवू शकत नाहीत याची खात्री बाळगा आणि तीच शक्ती स्वतःचा शोध घेण्यात खर्च करा. काय सत्य आहे आणि काय सत्य नाही असे काहीही गृहीत न धरता फक्त अनुभव म्हणजे काय आहे आणि त्यामध्ये मी कसा निर्माण होतो याचा शोध घ्यावा.

Most of us follow so-called spiritual organizations because they promise rewards. and as most of us are seeking spiritual security, emotional or mental comfort, we succumb to these promises and become instruments of exploitation. these organizations exist because of our craving for our own spiritual well-being and comfort. They have nothing spiritual about them, nor can they free man from sorrow, confusion and ignorance.

J Krishnamurti.

Ojai

17 May 1936


No comments: