मुक्तावस्था हि मनाचि अवस्था आहे. मनामध्ये ईच्छा निर्माण झाली कि ईच्छा तृप्ततेसाठि कर्म करावे लागते आणि कर्माचे फळ भोगण्यासाठी परत परत जन्म घ्यावा लागतो असे वेदांत सांगते.
आई वडिलांकडून जन्मजात मिळालेल्या जनुकांपासुन आपली जीवनयात्रा सुरू होते. आईवडिलांच्या पुर्वजांचा वारसा त्यांचि प्रतिमा, गुण, आशा, ईच्छा, संकल्पना वगैरे शारिरीक व मानसिक जडणघडण हि पुढल्या पिढिकडे जनुकांमार्फत प्रसारीत केली जाते. आपल्या जनुकांमध्ये पुर्वीचि वंशपरंपरागत माहिती असते व आताच्या आपल्या कर्म व विचारांनुसार त्यांमध्ये बदलहि होत असतात.
स्वार्थी कर्म व स्वार्थी विचारांमुळे आपली जनुके प्रदुषीत होत असतात तर निष्काम कर्म व वासना रहित विचारांमुळे आपल्या जनुकांचे शुध्दिकरण होत असते. पुर्ण निष्काम व वासना रहित अवस्थेमध्ये जनुकांचे संपुर्ण शुध्दिकरण झाल्यानंतर विचार शांत होतात आणि अशी विचारहिन अवस्था हिच मनाचि मुक्तावस्था होय. मुक्तावस्थे मध्ये शरीराचि काळजी रहात नाहि फक्त त्याचा भार वाहण्यासाठिचे जुजबी विचार गरजेनुसार येतात व जातात.
प्रदुषित जनुकांना वासना तृप्ततेसाठि कर्म करत रहावे लागते, कर्मभोगांचा कारावास भोगण्यासाठि परत परत जन्म घ्यावा लागतो. कर्माच्या कार्य व फलाशेस्तव सतत विचार येत राहतात. सांसारीक विचार हे जनुकांमध्ये बदल करत राहतात व हे जनुकिय बदल विचारांना बदलवीत असतात. या निरंतर खेळाला अंत देतात ते फक्त निष्काम कर्म.
या विश्वामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नाशीवंत वस्तुंचे कारण हे स्पंदने, विचार व मन हे आहेत तर आपल्या विचारांचा व मनाचा नाश करणारेच या स्पंदनांच्या भवसागरात तरून ( विरून ) जातात.
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च |
क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते || गिता १५:१६ ||
There are two kinds of beings in creation, the kṣhar (perishable) and the akṣhar (imperishable). The perishable are all beings in the material realm. The imperishable are the liberated beings.






