Sunday, August 19, 2018

बौध्दिक गुलामि

आदिमानवा पासुन आधुनिक मानवा पर्यंतचि ऊत्क्रांती हि मानवाच्या बुध्दिमत्तेमुळे झाली आहे. पिढि दरपिढि हि बुध्दिमत्ता अधिकाधिक विकास पावत आहे. आपल्या पुढिल पिढीच्या बुध्दिमत्तेचा विकास कळत नकळत आपल्या बुध्दीच्या विकासावर अवलंबुन असते. बुध्दिमान मनुष्य बिकट परिस्थिती मधुन आपला व आपल्या समाजाचि प्रगति करत असतो.

मनुष्याच्या बुध्दिमत्तेचा विकास झाला आहे हे त्याच्या वाचन, लेखण, कला, साहित्य, संगित, सामाजिक कार्ये व सामाजिक चळवळी मधिल सहभाग, व्यायाम, योग, ध्यान आदि अतिरिक्त छंदामधुन दिसून येतो.

सतत एकच प्रकारचा कामधंदा केल्याने, एकाच संप्रदायाचि वा एकाच गुरूंचि एककल्ली साधना केल्याने, एकाच राजकिय पक्षाची सतत पाठराखण केल्याने मनुष्याच्या विवेक बुध्दिचा पुर्ण विकास होत नाहि. विवेकि बुध्दि शिवाय कामाधंद्या मधिल बारकावे वा अध्यात्मा मधिल सुक्ष्मातीत सुक्ष्म ज्ञान आकलन होत नाहि.

काहितरी एकच छंद जोपासुन आयुष्यभर त्यामध्येच अडकण्याने त्या छंदाचे आपण गुलाम बनत असतो. 'सांग काम्या हो नाम्या' प्रकारच्या गुलाम अवस्थेमध्ये बुध्दिचा विकास संभवत नाहि. प्रत्येक स्त्री पुरूषास स्वातंत्र्य देण्याने त्यांचि बुध्दिमत्ता स्वतंत्र होत असते.

वेगवेगळे काम केल्याने, वेगवेगळे छंद जोपासल्यामुळे वा आहे त्या कामामध्ये व छंदामध्ये सतत नाविन्य आणल्यामुळे बुध्दिचा अधिक विकास होत असतो व मानसिक समाधान सुध्दा मिळत असते. विवेकि बुध्दि व समाधानी मानसिकता हि आर्थिक स्वावलंबनाचे आधारस्तंभ आहेत.

विवेकि बुध्दिस निरक्षीर बुध्दि असेहि म्हणतात. हंस हा पक्षी दुधामधिल पाणि वेगळे करतो व फक्त दुध पितो. सत व असत काय आहे हे समजावून घेऊन सत चा स्विकार करणे म्हणजे योग करणे होय व असतचा अस्विकार करणे म्हणजे असतचा संन्यास करणे होय. जि बुध्दि मनुष्यास अशाप्रकारच्या योग व संन्यासापर्यंत घेऊन येते तिला सदसद्विवेक बुध्दि असे म्हणतात.

|| तन्नो हंस प्रचोदयात ||

No comments: