Sunday, October 28, 2018

आपले विचार हेच आपले अस्तीत्व अाहे


फ्रेंच विचारवंत डेकार्ट यांचे ‘I think therefore I am’ हा विचार पाश्चात्य विचारसरणी व विज्ञानाचा पाया आहे. अपघातामध्ये शरीर व मेंदु निकामी असताना कोमामध्ये गेलेले रूग्ण अनुभव व विचार करतात असे आढळुन आलेले आहे. पृथ्वीतलावर अपघाताने जिवसृष्टि निर्माण झाली व या जिवसृष्टिमधुन मनुष्य प्राणि निर्माण झाला. जिवांच्या ऊत्क्रांतावस्थेमध्ये मनुष्य प्राण्याने आपल्या अफाट बुध्दिमत्तेच्या जिवावर स्वतःचि प्रचंड प्रगती केली व ईतर जिवसृष्टिवर त्याने आपले अधिराज्य स्थापन केले. बुध्दि व स्मरणशक्तिचा मुळ पाया हा मानवी विचार होत.

विचार म्हणजे आपल्या मेंदुमधिल विद्युत रासायनीक आवेगांना आपण दिलेला अर्थ होय. त्यामुळे आपले विचार हे सत्य असतातच असे नाहि. आपण जे विचार करत असतो त्यावर लगेच विश्वास ठेवता कामा नये.

दररोज आपण ७०,००० ते १००,००० ईतके विचार करत असतो. या विचारांमुळे आपल्या सभोवतालच्या घटना, दृश्ये, आवाज, वास यांचे आपण आपल्या पुर्वानुभवाशी संबंधित असा अर्थ लावत असतो. त्यांचा खरा अर्थ लक्षात न घेता आपण त्यांचा आपणास हवा तसा अर्थ करून घेत असतो. आपण त्यांना चांगले, वाईट, धोकादायक, सुरक्षीत, ऊपयोगी, निरूपयोगी असे वर्गीकरण करत असतो.

काहीतरी घटना घडते किंवा काहितरी आठवते किंवा काहीतरी आपणास जाणवते त्यामुळे विचार सुरू होतात. विशिष्ट प्रकारचे विचार विशिष्ट भावनांना प्रवृत्त करत असतात.

मनुष्य प्राणि हा घटनांपेक्षा त्या घटनांचा विपरीत अर्थ लावण्याने जास्त दुःखी होत असतो. घटनांना भावना नसतात, परंतु त्या घटनांना आपण दिलेला अर्थ व त्या घटनांबाबत आपण करत असलेल्या विचारांतुन भावना निर्माण होत असतात.

एखाद्या घटने विषयीचे मुल्यांकन, त्याचा अर्थ व त्याच्याशी निगडीत असलेल्या भावना या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या असतात याचे कारण प्रत्येकांचा पुर्वानुभव, पालनपोषण, कौटुंबिक मुल्ये, धार्मिक श्रध्दा, संस्कार हे वेगवेगळे असतात.

आपला मेंदु हा विचार निर्माण करत नाहि तर बाह्य घटनांचा तो आपल्या परीने अर्थ लावत असतो व त्यानुरूप शरीर कार्य करत असते. मेंदुसहित शरीर हे आपल्या आईवडिलांचि देणगी असते तर त्यांचे शरीर हे त्यांच्या विचारानुरूप बनलेले असते. त्यांच्या केवळ शरीरांचिच नव्हेतर त्यांच्या विचारांचि फलनिष्पत्ती म्हणजे आपले शरीर व आपले विचार होत. प्रत्येकाच्या विचारांचि क्षमता म्हणजे बुध्दिमत्ता हि त्याच्या पुर्वजांच्या विचारांचा व नितीमत्तेचा वारसा असतो.

विचार हे स्वयंचलीत असल्यामुळे ते आपल्या मेंदुमध्ये निरंतर चालु असतात, बरेच विचार आपणास आठवतहि नाहित. तर काहि विचारांचे आपणास व्यसन लागते व ते परत परत येत राहतात. पुनरावर्ती विचारांबाबत आपणास खात्री होऊ लागते. हे पुनरावर्ती विचार नवीन ईच्छांच्या विचारांना जन्म देतात व त्यामधिल काहि विचार अनेक वर्ष आपला पिच्छा सोडत नाहित.

स्वयंचलीत विचारांना थांबवणे अशक्य आहे कारण तेच आपले अस्तित्व आहेत. दुःखद व वाईट विचारांपासुन मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न जरूर करता येतो. स्वयंचलीत विचारांबरोबर वहात असताना काहीतरी असे करावे ज्याने आपण आपल्या स्वयंचलीत विचारांना काहिकाळ थांबवु शकु. प्रत्येकाने आपापल्या शारीरीक व बौध्दिक पात्रतेनुसार व्यायाम, प्राणायाम, योगासने, ध्यान, वाचन, लेखण, कला, संगीत आदि वेगळी वाट चोखाळली कि वेगळा रस्ता व वेगळा मुक्काम आपण गाठु शकतो व आपल्या पुढिल पिढिंचे भवितव्य जास्तीत जास्त सुरक्षीत करू शकतो.

No comments: