Wednesday, July 25, 2018

शोध अस्तित्वाचा

वैज्ञानीक संशोधना मधुन हे सिध्द झाले आहे कि, १३.७ अब्ज वर्षांपूर्वी आतासारखे विश्व नव्हते. आताच्या विश्वामधिल सर्व ग्रह, तारे, आकाशगंगा मिळुन एक फार मोठि अजस्त्र अशी प्रचंड तापमानाचि एकच एक वस्तु अस्तित्वात होती. १३.७ अब्ज वर्षांपूर्वी त्या अजस्त्र वस्तुमध्ये प्रचंड मोठा महास्फोट झाला. त्या महास्फोटामुळे त्या अजस्त्र वस्तुमधिल सर्व काहि प्रचंड वेगाने सर्वदुर फेकले गेले. सुरूवातीस प्रचंड गती, प्रचंड ऊष्णता, एकमेकांवर आदळ आपट करत करत विश्व हळु हळु शांत होऊ लागले. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांच्या कोट्यावधि आकाशगंगा, तारे, ग्रह, ऊपग्रह, धुमकेतु आदि बनले गेले.
साधारणपणे महास्फोटा नंतर ६०० दशलक्ष वर्षांनंतर आपली आकाशगंगा बनली गेली. महास्फोटाच्या ९.५७ अब्ज वर्षांनंतर पृथ्वीसह आठ मोठ्या ग्रहांचे मिळुन आपले सौर मंडल विकसित झाले. पृ्थ्वी ग्रहावर थिअया नावाच्या एका छोट्या ग्रहाने जोरदार धडक मारली व त्यामधुन चंद्र या पृथ्वीच्या ऊपग्रहाचि निर्मिती झाली.
पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाल्यानंतर पृथ्वीवर जल निर्मिती झाली व कालांतराने सुमारे ३ अब्ज वर्षापुर्वी पासुन पृथ्वीवर जिवाश्म निर्मिती सुरू झाली. जिवाश्मापासुन प्राणवायु तयार झाला. नंतर वनस्पती, किटक, पशु, पक्षी यांनी पृथ्वी गजबजुन गेली. २ दशलक्ष वर्षांपूर्वी मनुष्याचा आद्य पुर्वज आदिमानव निर्माण झाला.
७५ हजार वर्षांपूर्वी आशिया खंडामधिल तोबा या बेटावर प्रचंड मोठा ज्वालामुखीचा विस्फोट झाला. संपुर्ण पृथ्वीवर त्यामधिल विषारी वायु, रसायने, राख पसरली गेली. ९९% जिवसृष्टिचा विनाश झाला, पृथ्वीचे तापमान ४°C ईतके कमी झाले, व नंतर १० वर्षे पृथ्वीवर हिमयुग अवतरले होते. अन्न व पाणि नाहिसे झाले होते. संपुर्ण पृथ्वीवर मध्य आफ्रिकेमधिल घनदाट जंगलामधिल फक्त ५००० च्या आसपास वन्यमनुष्य जिवंत राहिले होते. अचानक झालेल्या वातावरणा मधिल बदलाने घाबरून त्या सर्वांनी एकत्रीतपणे आफ्रिका सोडुन समुद्राच्या कडे कडेने पुर्व दिशेला मार्गक्रमण सुरू केले. अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये आफ्रिका, अरबस्तान मार्गे ते मजल दरमजल करत भारतामध्ये आले. भारतामध्ये तोपर्यंत वातावरण पुर्ववत झाले होते, अन्न व पाणि मुबलक मिळु लागले होते. भिषण परिस्थितीचा सामना करत आलेल्या त्या मनुष्य समुहाला भारत नंदनवन वाटु लागला व त्यांनी भारतामध्ये आपले बस्तान बसविले. शेती व गुरे पाळत त्यांनी आपली भाषा व रितीरिवाज समृध्द केले. हा एकत्र राहिलेला, समान भाषा बोलणारा व समान रीतीरिवाज पाळणारा मनुष्य समाज हळुहळू चारी दिशांना फैलावु लागला. भारतामधुन हाच मानव समाज युरोप, दक्षिण पुर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, ऊत्तर ध्रुव सगळीकडे पसरला. ५०,००० वर्षापासुन ते ३००० वर्षापुर्वी पर्यंतचा आधुनिक मानव हा देव व धर्म न मानता स्वतःच्या धाडसाच्या व बुध्दिमत्तेच्या जोरावर सर्व पृथ्वीवर निसर्गाशी एकरूप होऊन गुण्या गोविंदाने नांदत होता याचि साक्ष ईजिप्त, ईराण, भारतामधिल सिंधु संस्कृतीने दिली आहे. परंतु पोट भरले कि तत्वज्ञान सुचु लागते. माणसाची बुध्दिमत्ता जसजशी वाढु लागली तसतसे त्याला आकाश ठेंगणे वाटु लागले व त्याने आपल्या बुध्दिचि अचाट कल्पकता वापरून आकाशा मधिल बापाचा शोध लावला!!!
आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर 'आपण विचार करतो म्हणुन आपण आहोत' असे म्हणुन पाश्चात्य तत्वचिंतक गप्प बसले व वैज्ञानीक संशोधनाच्या मागे लागले. भारतीय नेहमी एक पाऊल पुढे असतात. आपल्या तत्वचिंतकांनी विचारशुन्य अवस्थेचा काल्पनीक शोध लावला व विचार नाहि म्हणजे आपण नाहि, हे जग सत्य नसुन एक माया आहे व या मायावी विश्वापलीकडे ईश्वर आहे व तोच एक सत्य आहे! झाले पिढ्यानपिढ्या सगळे अफाट बुध्दिमत्तेचे तरूण संन्यासी होऊन अफु गांजा सेवन करून विश्वा पलीकडिल ईश्वराचा शोध घेऊ लागले. देश दरिद्री झाला, नपुंसक झाला व परकिय सत्तांचा अगदि सहज गुलाम झाला. ज्या तत्वज्ञानाने भारत व भारतीयांचा विकास झाला नाहि तेच तत्वज्ञान परदेशात निर्यात केले जात आहे! विज्ञान व तंत्रज्ञान युगातील भारताचे पंतप्रधान परदेशात गायी घेऊन फिरत आहेत, हे किती भयानक व विदारक चित्र आहे?
करोडो वर्षामध्ये पृथ्वीवर जि काही उलथापालथ झाली त्यातुन अपवादाने प्रथम जिवसृष्टि व नंतर मानव प्राणि निर्माण झाला. पृथ्वी शिवाय ईतरत्र जशीच्या तशी उलथापालथ झाली असेल व तीथेहि जिवसृष्टि असेलच याचि फार कमी शक्यता आहे. त्यामुळे आपले अस्तीत्व फक्त या शरीरापुरतेच मर्यादित आहे. मनाच्या नादि लागुन आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यांचे खेळ बंद करून आपण आपला, आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास करूया.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पृथ्वीवरच्या सर्व जिवसृष्टिवर अधिराज्य गाजविणाऱ्या मानव प्राण्यामध्येच नंतर आपापसामध्ये स्पर्धा सुरू झाली. निसर्गाच्या नियमाविरूध्द राजसत्ता व धर्मसत्ता उदयास आल्या. त्यांच्यामध्ये एकमेकावर कुरघोडि करण्यासाठि एकिकडे रक्तरंजीत संघर्ष तर दुसरीकडे आधुनिक शस्त्रास्त्रांसाठिचे वैज्ञानिक संशोधन सुरू झाले. मानवता बाजुला पडली व सर्व गोष्टिंचे धर्मकारण व राजकारण सुरू झाले. या काळातील काहि महत्वाच्या घटना:

५००० वर्षापुर्वी ईजिप्त ते भारता पर्यंतचि सिंधु संस्कृती निर्माण झाली.
३५०० वर्षापुर्वी भारतामध्ये ऋग्वेदाचि निर्मिती
३२०० वर्षापुर्वी ईस्त्रायल येथे मोजेस या ज्यु धर्मगुरूने १० धर्माज्ञा दिल्या
२८०० वर्षापुर्वीच्या छांदोग्य ऊपनिषदामध्ये श्रीकृष्णाचा ऊल्लेख
२६०० वर्षापुर्वी ईराण मध्ये पारशी साम्राज्य व धर्म स्थापना
२५०० वर्षापुर्वी महावीर जैन व गौतम बुध्द यांचा जन्म व त्यांच्या धर्मांचि स्थापना
२३०० वर्षापुर्वी चंद्रगुप्त मौर्य याचे भारतामध्ये तर अलेक्झांडर याचे युरोपमध्ये साम्राज्य
२२०० वर्षापुर्वी सम्राट अशोक याचे साम्राज्य
२०२७ वर्षापुर्वी १५०० वर्षे युरोप, आफ्रिका व आशिया वर अधिपत्य गाजविणाऱ्या रोमन साम्राज्याचा ऊदय.
२००० येशु ख्रिस्त यांचा जन्म
१८०० वर्षापुर्वी भारतामध्ये गुप्त साम्राज्य, पुराण कथा व मंदिर निर्मितीस चालना
१४०० वर्षापुर्वी अरबस्तानात मोहम्मद पैगंबर यांचा इस्लाम धर्म
१२०० वर्षापुर्वी आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचि शिकवण भारतामध्ये रूजविली जि पुढे जाऊन हिंदु धर्माचा पाया बनला.
१५२६ भारतामध्ये बाबरचे मुघल साम्राज्य
१६७४ शिव राज्याभिषेक, मराठा साम्राज्य
१७०० पंजाब मध्ये गुरू नानक यांनी शिख धर्माची स्थापना केली.
१८५० भारतामध्ये ब्रिटिश कंपनीचे राज्य
१९१४ प्रथम विश्व युध्द, ३-४ कोटि मनुष्य हानी
१९३९ - १९४५ द्वितिय विश्व युध्द, ६ - ७ कोटि मनुष्य हानी, ब्रिटिश साम्राज्याचा अंत
१९४७ भारताची फाळणि व स्वातंत्र्य

लाखो वर्षांच्या मानवी ईतिहासामध्ये अलीकडच्या २-३ हजार वर्षापासुन देव, देश व धर्म यांचे खुळ मुठभर चतुर लोकांनी बहुसंख्य अज्ञानी लोकांच्या गळी ऊतरवले आहे. बहुसंख्य अज्ञानी समाज हा देव व धर्म यांच्यावरील श्रध्दांमुळे धार्मिक गुरूंच्या मोहजालामध्ये अलगद सापडला जातो. राजकिय नेते हे धर्मगुरू व धर्माला राजाश्रय देतात व देवाधर्माच्या नावाखाली अनियंत्रीत राज्य करतात हा ढळढळीत ईतिहास आहे. अमेरिकन, फ्रेंच, रशियन सामाजिक क्रांतीने धर्माला राजकारणा पासून वेगळे केले होते. भारतामध्ये गांधी व नेहरूंनीही धर्मास बाजुस ठेऊन निधर्मी प्रजासत्ताक निर्माण केले होते. परंतु भारत व ईतरत्र धर्म व राजकारण परत एक होत आहेत, परत मानवी रक्त सांडण्यासाठि. जोपर्यंत बहुसंख्य समाजाला खरा शास्त्रीय ईतिहास माहित होणार नाही तोपर्यंत मुठभर धर्मगुरू व भ्रष्ट राज्यकर्ते खोटा ईतिहास अंधश्रध्दांच्या अपप्रचाराद्वारे पसरवुन त्यांचि पिळवणुक करत रहाणार.

https://youtu.be/MX8j7aPnAuI

No comments: