मनुष्य हा सुखी जिवनासाठि अखंडपणे प्रयत्नशील असतो. आपल्या जिवनामध्ये सुख येण्यासाठि व ते टिकुन रहाण्यासाठि त्याचि सर्व मेहनत चाललेली असते. कष्ट, मेहनत व हुषारीचे प्रयत्न कमी पडायला नको म्हणुन तो नशिबाचे प्रयत्न हि अजमावत असतो.
ज्यांना कष्ट व मेहनत न करता एैषोआरामामध्ये सुखी जिवन जगायचे आहे अशा हुशार लोकांनी नशीब, देव, धर्म, अध्यात्माच्या मनगढंत मालीका ऊभ्या केल्या. सांसारीक जिवनापेक्षा धार्मिक जिवन चांगले आहे व या दोन्हिपेक्षा अध्यात्मिक जिवन सर्वश्रेष्ठ आहे हे समाजाच्या मनावर पुर्णपणे बिंबवले गेलेले आहे. खरेतर धार्मिक व अध्यात्मिक जिवन असे वेगवेगळे काहि नसतेच, सर्व काहि सांसारीक आहे. सांसारीक मनुष्य मेहनत करत असतो व त्याच्या मेहनतीच्या जिवावर देवांचि, धर्मांचि व अध्यात्माचि शिखरे ऊभी आहेत.
सांसारीक, धार्मिक व अध्यात्मिक अशा तिघांनाहि सुख हवे असते. सुखाचि, स्वर्गाचि ईच्छा व मुक्तिचि ईच्छा या सर्व ईच्छा या सांसारीक ईच्छा आहेत. त्यांना कनिष्ठ व श्रेष्ठ बनविणारे आपले मन असते. प्रत्येकजण आपापल्या बुध्दिमत्ते प्रमाणे सुखाच्या शोधात असतात. सुख हे नेहमी आपल्या कक्षा रूंदावित असते. सांसारीक व धार्मिक सुख अल्पकाळ लाभते म्हणुन मग मनुष्य चिरकाल टिकणाऱ्या अध्यात्मिक सुखांकडे आकर्षित होतो.
आपले मन आपणास फसवित असते. प्रथम ते सुखाचे मृगजळ तयार करते व त्यासाठी आपणास त्याचा पाठलाग करावयास भाग पाडते. मनाचे सामर्थ्य अचाट आहे, ते आपणास पाहिजे तो अनुभव देऊ शकते. सुखाचा, आनंदाचा, शांतीचा, ऊन्मादाचा अनुभव आपणास आपले मन देण्यास सक्षम असते.
जोपर्यंत आपण सुखाच्या शोधात असतो तोपर्यंत मन आपल्या कक्षा रूंदावित राहते व तोपर्यंत आपण दुःखी राहतो.
सुखाचा शोध थांबायला हवा, सुखांचा शोध संपताच स्वर्गाचे व मुक्तिचे मृगजळ आपोआप समाप्त होते.

No comments:
Post a Comment