Sunday, June 10, 2018

अंतीम सत्याचा सावळा गोंधळ

स्वर्ग, ईश्वर, आत्मा आदि संकल्पनांमुळे अंतीम सत्याचा फार मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ते अंतीम सत्य काय आहे हे कोणिहि अनुभवु शकत नाहि यामुळे ते आहे अथवा नाहि याचा कोणि पडताळा घेऊ शकत नाहि. तरीहि ब्रम्ह सत्य आहे असे समजायचे व नित्य अनुभवास येणारे जगत मात्र मिथ्या समजायचे. हे शब्दांचे खेळ बुध्दिमंत विचारवंतांनी अनेक शतके चालविलेले आहेत. खरेतर आपल्याभोवती असलेले जग हेच सत्य आहे. बुद्धिमान विचारवंतांनी बनविलेल्या काल्पनीक अंतिम सत्याचा व या वास्तविक सत्याचा परस्पर संबंध नाही. जोपर्यंत आपण अंतीम सत्यास आपल्या कल्पनाविश्वामध्ये शोधत राहु तोपर्यंत वास्तवामध्ये असलेले सत्य आपणास दिसणार नाहि.

काल्पनीक परमशांती प्राप्त करण्यासाठी आपण वास्तविक सत्यापासुन पळ काढत असतो व त्यासाठि जे काहि करतो त्यामुळे या जिवामध्ये विद्यमान असणारी सहज शांतअवस्था लक्षात येण्यास अडथळे निर्माण होतात. भोवतालच्या जगताशी आपला सुसंवाद साधणे हि खरी शांती होय. आपणास या जगामध्ये सुखा समाधानाने जगायचे असेल तर या जगाच्या म्हणजे समाजाच्या नितीनियमां प्रमाणे वागणे फार महत्वाचे असते. संस्कृतीने व समाजाने लादलेल्या वास्तवतेचा स्विकार करत असताना हे सुध्दा ध्यानात घ्यायला हवे कि काल्पनीक स्वर्ग वा मुक्तावस्था प्राप्त करण्यासाठी आपण काहीहि करू शकत नाही.

जेव्हा स्वतःस फार मोठा पुण्यात्मा बनविण्याचि ईच्छा संपुष्टात येते आणि आत्मसाक्षात्कारा सारखी आदर्श ऊद्दिष्टे पुर्ण करण्याचि मागणि नसते तेव्हा आपण आपल्या वास्तविक नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. या अवस्थेमध्ये आपला आपणाशी संघर्ष नसतो, आपला समाजाशी संघर्ष नसतो. जेव्हा आपण आपल्या स्वतःशी शांततापूर्ण असतो तेव्हाच आपण समाजातील इतरांशी शांततापुर्ण सौहार्दाने नांदु शकतो.

जेव्हा आपणास जगापासुन काहीही नको असते,  जेव्हा आपण कशाचाही शोध घेत नसतो, जेव्हा देव, गुरु, ग्रंथ, त्यांची शिकवण आणि त्यांचि साधना यांसारख्या बाहेरील हालचाली जेव्हा नसतात, तेव्हा आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या जीवनऊर्जा प्रवाहास ऊर्ध्वगती प्राप्त होते, या ऊर्ध्वगतीचा अनुभव करता येत नाहि. प्राणशक्तीच्या ऊर्घ्वगतीस बाह्यशक्तिंचि आवश्यकता नसते, तिला पुर्णपणे स्वातंत्र्य हवे असते, स्वतःचा वेगळा प्रवाह हवा असतो व सर्वार्थाने एकांताचि शुन्यावस्था हवी असते.

मी ध्यानसाधने विरूद्ध नाही. परंतु, आपण आपल्यासमोर ठेवलेले तथाकथीत निस्वार्थी बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे ते साधन नाही. आत्मसाक्षात्काराचे लक्ष्य आणि ते प्राप्त करण्यासाठी लागणारे ध्यानाचे तंत्र हे दोन्हि आत्मकेंद्रित आहेत. आणि आपण यादोघांद्वारे जे काही मिळवू इच्छितो तोही स्वार्थी क्रियाकलाप आहे. काहितरी केल्याने सहज अवस्था प्राप्त होत नाहि व काहि न केल्याने सुध्दा सहज अवस्था प्राप्त होत नाहि. 

- यु जी कृष्णमुर्ती

No comments: