राजकारणासाठी राजकारणी देव, देश, धर्म अशा श्रद्धाचा गैरवापर करतात याचे आकलन होणे म्हणजे त्या राजकारणाचे सत्य समजणे होय. हे साधे सत्य का समजत नाही तर त्यामध्ये आपला सुद्धा काही स्वार्थ असतोच. जोपर्यंत स्वार्थ आहे तो पर्यंत सत्य आकलन होत नाही. आणि तो पर्यंत सुराज्य अशक्य आहे.
जीवनातील सत्य अवस्था न समजण्या मागे स्वार्थी वृत्ती हीच जबाबदार असते. सत्य सतत असते परंतु स्वार्थी अंतःकरणाने त्याचा बोध नाही. तो बोध करून घेण्यासाठी आपण परत तशाच स्वार्थी गुरूकडे जात असतो.
आपणच आपल्या मध्ये जे काही न्यून आहे ते शोधले पाहिजे आणि त्याचा समाचार घ्यायला हवा. बाहेरचे कोणीही आपल्या आतील स्वच्छता करू शकत नाही. आपल्या वृत्ती हाच आपला मी असतो, वृत्ती क्षीण झाल्या की मी सुद्धा क्षीण होतो. सत्य तत्क्षणी समजू लागते.
No comments:
Post a Comment