आपल्या प्रत्येकांचे वेगवेगळे वा वैयक्तिक मन नसते. हवा वा आकाशासारखे सर्वांचे मिळुन एकच एक विशाल असे अदृश्य वैश्विक मन असते. पुर्वीच्या सर्व पिढ्यांपासुन ते आताच्या या क्षणापर्यंतचे सर्वांचे सर्व विचार व सर्व अनुभव या वैश्विक मनामध्ये साठविलेले आहेत. आपणास येणारे सर्व अनुभव व विचार हे या वैश्विक मनाकडुन येत असतात. आपणास ते नविन भासतात परंतु ते पुर्वी कोणि ना कोणि अनुभवलेले असतात. म्हणजे आपणास येणारे सर्व अनुभव व सर्व विचार हे नवीनतम व आपल्या एकट्याचे नसतात!
वैश्विक मन हे सर्वव्यापि माहितीचे प्रचंड मोठे असे भांडार आहे त्याला सर्वजण सतत वापरत असतात. परंतु यामधिल माहितीच्या आधारे आपण सत्य अनुभवु शकत नाहि. सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक प्रश्न व त्यांचि ऊत्तरे वैश्विक मनाच्या या महाजालामध्ये ठासुन भरलेली आहेत. पिढि दर पिढि आपण सर्वजण या महाजालामधिल तेच प्रश्न व त्यांचि तिच ऊत्तरे वापरत आहोत. जोपर्यंत ऊत्तरे चुकिचि आहेत तोपर्यंत प्रश्न अनुत्तरीतच राहतात. एकदा का एखाद्या प्रश्नाचे ऊत्तर बरोबर मिळाले कि तो प्रश्न त्या ऊत्तरासहित महामना मधुन नाहिसा होतो. - यु जी कृष्णमुर्ती

No comments:
Post a Comment