Tuesday, January 23, 2018

ज्ञान्याचे औदासिन्य


ऊदासीन ज्ञानी भक्त  


त्रिगुणांमुळे प्रत्येक मनुष्य हा देव, देश, धर्म यांच्या संस्कारामध्ये व रूढि परंपरांमध्ये गुंतला जातो. आपण खरे कोण आहोत याचा आपणास पत्ता लागु नये म्हणुन आपले मन हे आपणास नेहमी तथाकथीत ऊच्च मुल्यांच्या नादि लावते. आपल्या खऱ्याखुऱ्या अस्तित्वाचा म्हणजे आपल्या आत्मतत्वाचा शोध लावण्या एैवजी आपण आपली संपुर्ण क्षमता केवळ त्रिगुणांनी तयार केलेल्या या ऊच्च मुल्यांच्या संवर्धनासाठि व रक्षणासाठि खर्च करत असतो प्रसंगी आपण त्यासाठि बलीदानासहि तयार होतो. आतापर्यंतच्या सर्व महापुरूषांनी या संस्कार व ऊच्चमुल्ये यांचा नेहमीच पाठपुरावा केला आहे त्यामुळे त्यांना जणु अढळपदच प्राप्त झाले आहे.

संस्कार व त्याचि नितीमुल्ये हि कितीहि महान असली तरी ते सर्व मानवी समस्या सोडविण्यास पुर्णपणे हतबल ठरले आहेत. याऊलट आपलेच संस्कार व संस्कृती सर्वात महान आहेत हे दुसऱ्यांवर ठसविण्यासाठि आजपर्यंत अनेकदा प्रचंड नरसंहार झाले आहेत व अजुनही ते होतच आहेत.

आपल्या प्रत्येकांच्या स्वस्वरूप प्राप्तीच्या आड आपलेच जतन केलेले, संवर्धित केलेले संस्कार आहेत हे समजल्या नंतर ज्ञानी पुरूष ऊदासीन होतो नाहितर त्यालाच सुळावर चढविण्यास समाज मागेपुढे पहात नाहित.

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते || गिता १४:२३ ||

शरीर व ईंद्रिये याबरोबर त्रिगुण असणारच असे समजुन त्रिगुणातीत मनुष्य त्रिगुणांमुळे विचलीत होत नाहि, तो स्वस्वरूपासुन ढळला जात नाहि, शरीरधारी असुनहि शरिरधर्माच्या कर्तव्यापासुन तो नेहमी ऊदासिन राहतो.

गुणातीत उदासीनकी भाँति स्थित हुआ, गुणोंद्वारा विवेकज्ञानकी स्थितिसे विचलित नहीं किया जा सकता। चलायमान नहीं होता अर्थात् अविचलभावसे स्वस्वरूपमें ही स्थित रहता है।

He who, seated like one unconcerned, is not moved by the qualities, and who, knowing that the qualities are active, is self-centred and moves not.

No comments: