Friday, January 22, 2021

नेती नेती

 


आपण दिवसभर मेंदूतून निर्माण होणाऱ्या विचारांवर सतत मनन, चिंतन, ध्यान करत असतो. मंत्र जप करणे हा सुद्धा विचार आहे.

जेव्हा जेव्हा आपल्या हे लक्षात येते की आपण उगाच, अनाठायी विचार करीत आहोत, त्याक्षणी विचार थांबतात त्यांना तसेच काही काळ थांबून द्यावे. याद्वारे त्या क्षणापूर्ती शांतता आपल्या अंतरंगात झिरपते. हे थोडे थोडे झिरपणे सतत चालू राहिले तर आपले पूर्वीचे विचार त्यामध्ये विरघळले जातात, शांतता पसरण्यास जागा निर्माण होवु लागते. 

विचार कितीही क्षुद्र असो किंवा कितीही महान असो तो विचारच असतो आणि आपली शांतता भंग करण्यासाठी तो वेगवेगळ्या रुपात येत राहतो ते त्याचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी. 

प्रत्येक विचाराचे नेती नेती म्हणून अस्विकार करणे हेच जीवनात शांतता प्रस्थापित करण्याचे सूत्र ठरावे.

No comments: