यु जी कृष्णमुर्ती हे जागतीक किर्तीचे भारतीय विचारवंत होते. आत्मसाक्षात्कारा भोवती असलेले अध्यात्मिक, धार्मिक, मानसिक वलये त्यांनी मोडुन काढली होती. त्यांच्या मते आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यासाठी काहि साधना कराव्या लागत नाहित व आत्मसाक्षात्कार म्हणजे सच्चिदानंद अवस्था वगैरे नव्हे. आत्मसाक्षात्कार हा शरीरामध्ये झालेला आमुलाग्र बदल असतो. या बदला दरम्यान शरिरामधिल प्रत्येक पेशी थरारत असतात, प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते, सतत पाणि प्यावे लागते नाहितर शरीर शुष्क होऊ लागते, यामुळे अतिशय शारीरिक यातना होत असतात, व जे काहि अनुभव येेत असतात ते पुर्णपणे शरीराचे अनुभव असतात व या यातना संपल्यानंतर जे हायसे वाटते त्याला पुर्वीच्या लोकांनी शांती, परमानंद असे संबोधले असावे. या नैसर्गिक बदला मध्ये ज्या काहि यातना भोगाव्या लागतात त्यामुळे ते त्याला आत्मसाक्षात्कारा एैवजी आपत्ती म्हणत असत व नंतर प्राप्त झालेल्या अवस्थेस त्यांनी नैसर्गिक अवस्था असे म्हटले आहे. त्यांनी त्या बदलांचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.
कमालीच्या शांत, निशब्द, गाढ निद्रेसारख्या अवस्थेमध्ये जे काहि होत असते ते आपल्या जाणीवे मध्ये येत नाहि त्यामुळे ते सर्व समजण्याच्या पलीकडचे असते. त्या विषयी काहिहि सांगता येणे शक्यच नाहि. मन हे अनुभव रेकॉर्ड करत असते, मनाच्या अनुपस्थीमध्ये काहिहि रेकॉर्ड होणे अशक्य असते. त्यामुळे मला जो काहि अनुभव आला तो केवळ शारीरिक होता त्याचा अध्यात्माशी, धार्मिकतेशी वा श्रध्देशी कसलाहि संबंध नाहि.
नैसर्गिक शारिरिक बदलांदरम्यान शरीराच्या बाह्य व अंतर्गत सर्व कार्यांचे प्रत्यक्षदर्षी अनुभव घेता येतात. आपले रक्ताभिसरण कसे होते, श्वासोच्छवास कसा होतो, ह्रदय, मेंदु, लिव्हर, किडनी कसे कार्य करतात हे प्रत्यक्ष दिसु लागते. रक्त नाड्यांमधुन फिरत असताना त्यांचा नदिच्या प्रवाहासारखा आवाज येत असतो. दररोज प्रत्येक वेळी नवनविन अनुभव येत असतात. आता काय होणार आहे, कोणता अनुभव येणार आहे याचि कसलीहि पुर्वकल्पना नसते, त्याबद्दल अंदाज बांधता येत नाहि, कल्पना करता येत नाहि.
आता माझ्या नैसर्गिक अवस्थेमध्ये मला विचार येत नाहित फक्त निर्विकार जाणीव असते. ज्यावेळी बाहेरून एखादा विचार माझ्या कडे येतो त्यावेळी माझी तंद्री भंग पावते. तंद्रि भंग पावल्यानंतर मी त्या विचारांचे अवलोकन करतो व त्यानुरूप कार्य करतो. कार्य संपल्यानंतर मी परत निर्विकार तंद्रि मध्ये परत जातो. मि एखादि वस्तु पहात असतो परंतु त्याबद्दल कसलेहि विचार मंथन चाललेले नसते त्यामुळे मी काय पहात आहे याचे मला भान नसते. विचारां अभावी मला कसल्याहि भावना निर्माण होत नाहित. एखादि गरज निर्माण होताच त्यांचि फक्त जाणिव होते. सुख, दुःख, नैराश्य, प्रेम, करूणा, दया, सहानुभुती, अश्रु या सर्वांचा माझ्यावर यत्किंचीतहि परिणाम होत नाहि. माझ्या दृष्टिने सर्व भावना एकसारख्या आहेत कारण मी त्यांचा फक्त दृष्टा आहे. अशी व्यक्ती कोणा बरोबर प्रेमसंबंध, लैंगिक संबंध ठेऊ शकेल काय? त्याच्या दृष्टिने नुसता स्पर्श, मिठी वा चुंबन हे सर्व एक सारखेच असते. अधिकाधिक सुखाच्या म्हणजे एका सुखाहुन दुसरे सुख अधिक चांगले असेल अशा कल्पना मला सुचत नाहित.
मन आहे परंतु पुर्वी सारखे ते आता मालक बनुन आज्ञा करत नाहि तर गुलाम बनुन सहाय्य करत असते. बालपणा पासुन गोळा केलेले माहितीवजा ज्ञान मनामध्ये साठवलेले असते परंतु आता ते चुपचाप पाठिमागे ऊभे असते व ज्यावेळी आवश्यकता भासेल त्याचवेळि ते पुढे येते. आपण जर मनाचा वापरच केला नाहि तर ते निष्क्रिय होऊन जाते. मनामध्ये जि काहि माहिती असते ति शब्दांचि वेगवेगळि ठेवण असते. वर्षानुवर्षांच्या अनुभवांनी धारदार बनलेले ते एक बुध्दिमान हत्यार असते. मनाचा केवळ हत्यार व चाकर या नात्यानेच वापर करायला हवा.
मन जाणीवे पलीकडील अनुभव ग्रहण करू शकत नाहि. मनाच्या या असमर्थतेमुळे जाणिवे पलीकडिल अनुभवांचा अनुभव घेणारा नसतो, त्यामुळे जाणीवे पलीकडील ज्ञानाचि मनाच्या ज्ञानामध्ये भर पडत नाहि.
विचारांच्या, मनाच्या, अऩुभवांच्या व ज्ञानाच्या अभावी भौतीक शरीर हे प्रत्येक क्षण वेगवेगळेपणाने जगत असते, भुतकाळाला भविष्यकाळाशी जोडणारा मनाचा दुवा तिथे नसतो. गुलाम बनलेले निष्क्रिय मन नवनवीन कल्पना, संकल्पनांचा पुरवठा करत बसत नाहि.
अशा या नैसर्गिक अवस्थेमधिल जिवनामध्ये आनंद नसतो, करमणुक नसते, नवीन ध्येय नसतात, नव्या आशा आकांक्षा नसतात. जिवन अतिशय साधे झालेले असते. मला खरेच समजत नाहि अशा साध्यासुध्या आयुष्याच्या मागे लोक का धावत असतात.
निर्भय पणा व संपुर्ण एकाग्रतेमुळे काहिहि नविन शिकु शकतो वा प्राप्त करू शकतो परंतु ती मागणीच नाहिशी झालेली असते. आशा आकांक्षा नसल्यामुळे नैराश्य सुध्दा नसते.
नैसर्गिक अवस्थेमध्ये ध्यानावस्था सहज प्राप्त होत असते त्यासाठि काहि करावे लागत नाहि, ध्यानासाठि बसावे लागत नाहि. ध्यानाअवस्था प्राप्त होण्यासाठी ध्यान करावे लागत नाहि, ध्यान करून ध्यानावस्था प्राप्त होत नसते. ध्यानसाधना करायला हवी या साधकांच्या विचारांमुळे ध्यान, गुरू, ध्यानकेंद्रे यांचा बाजार निर्माण केला गेला आहे. खरेतर ध्यानाचि संकल्पना व त्यासाठिच्या साधना आपणास ध्यानावस्थेमध्ये प्रवेश करण्या पासुन रोखत असतात.
आपण ज्याला आपले अस्तित्व समजत असतो ते केवळ विचारांचे व माहितीचा जुनाट सांगाडा असतो. आपल्या मधिल या जुनाट सांगाड्याचे आपण प्राणापलीकडे जतन करत असतो. जोपर्यंत आपण हा जुनाट सांगाडा मोडुन टाकुन देत नाहि तोपर्यंत आपण आपल्यामध्ये शांतता निर्माण करू शकणार नाहि.
माझ्याशी वैयक्तीक नातेसंबंध प्रस्थापित होणे अशक्य आहे कारण माझ्यासाठी सर्व नातेसंबंध सारखे आहेत. माझे अस्तीत्व सर्वत्वाशी एकरूप झालेले आहे. माझे आयुष्य एका एका क्षणांचे झाले आहे, त्याला दिशा नाहि, कोणतेहि ध्येय नाहि, काहि साध्य करावयाचे नाहि. जोपर्यंत माझ्या आसपास हालचाल आहे तोपर्यंत माझ्या आतमध्ये हालचाल होत असते अन्यथा माझ्या आयुष्यामध्ये फक्त शांतता आहे. शांतता हि मनाचि अवस्था नव्हे. आपण अंतर्यामी त्याचवेळि शांत होऊ शकतो ज्यावेळी आपली सर्व बाह्य कर्मे थंडावलेली असतात.
कमालीच्या शांत, निशब्द, गाढ निद्रेसारख्या अवस्थेमध्ये जे काहि होत असते ते आपल्या जाणीवे मध्ये येत नाहि त्यामुळे ते सर्व समजण्याच्या पलीकडचे असते. त्या विषयी काहिहि सांगता येणे शक्यच नाहि. मन हे अनुभव रेकॉर्ड करत असते, मनाच्या अनुपस्थीमध्ये काहिहि रेकॉर्ड होणे अशक्य असते. त्यामुळे मला जो काहि अनुभव आला तो केवळ शारीरिक होता त्याचा अध्यात्माशी, धार्मिकतेशी वा श्रध्देशी कसलाहि संबंध नाहि.
नैसर्गिक शारिरिक बदलांदरम्यान शरीराच्या बाह्य व अंतर्गत सर्व कार्यांचे प्रत्यक्षदर्षी अनुभव घेता येतात. आपले रक्ताभिसरण कसे होते, श्वासोच्छवास कसा होतो, ह्रदय, मेंदु, लिव्हर, किडनी कसे कार्य करतात हे प्रत्यक्ष दिसु लागते. रक्त नाड्यांमधुन फिरत असताना त्यांचा नदिच्या प्रवाहासारखा आवाज येत असतो. दररोज प्रत्येक वेळी नवनविन अनुभव येत असतात. आता काय होणार आहे, कोणता अनुभव येणार आहे याचि कसलीहि पुर्वकल्पना नसते, त्याबद्दल अंदाज बांधता येत नाहि, कल्पना करता येत नाहि.
आता माझ्या नैसर्गिक अवस्थेमध्ये मला विचार येत नाहित फक्त निर्विकार जाणीव असते. ज्यावेळी बाहेरून एखादा विचार माझ्या कडे येतो त्यावेळी माझी तंद्री भंग पावते. तंद्रि भंग पावल्यानंतर मी त्या विचारांचे अवलोकन करतो व त्यानुरूप कार्य करतो. कार्य संपल्यानंतर मी परत निर्विकार तंद्रि मध्ये परत जातो. मि एखादि वस्तु पहात असतो परंतु त्याबद्दल कसलेहि विचार मंथन चाललेले नसते त्यामुळे मी काय पहात आहे याचे मला भान नसते. विचारां अभावी मला कसल्याहि भावना निर्माण होत नाहित. एखादि गरज निर्माण होताच त्यांचि फक्त जाणिव होते. सुख, दुःख, नैराश्य, प्रेम, करूणा, दया, सहानुभुती, अश्रु या सर्वांचा माझ्यावर यत्किंचीतहि परिणाम होत नाहि. माझ्या दृष्टिने सर्व भावना एकसारख्या आहेत कारण मी त्यांचा फक्त दृष्टा आहे. अशी व्यक्ती कोणा बरोबर प्रेमसंबंध, लैंगिक संबंध ठेऊ शकेल काय? त्याच्या दृष्टिने नुसता स्पर्श, मिठी वा चुंबन हे सर्व एक सारखेच असते. अधिकाधिक सुखाच्या म्हणजे एका सुखाहुन दुसरे सुख अधिक चांगले असेल अशा कल्पना मला सुचत नाहित.
मन आहे परंतु पुर्वी सारखे ते आता मालक बनुन आज्ञा करत नाहि तर गुलाम बनुन सहाय्य करत असते. बालपणा पासुन गोळा केलेले माहितीवजा ज्ञान मनामध्ये साठवलेले असते परंतु आता ते चुपचाप पाठिमागे ऊभे असते व ज्यावेळी आवश्यकता भासेल त्याचवेळि ते पुढे येते. आपण जर मनाचा वापरच केला नाहि तर ते निष्क्रिय होऊन जाते. मनामध्ये जि काहि माहिती असते ति शब्दांचि वेगवेगळि ठेवण असते. वर्षानुवर्षांच्या अनुभवांनी धारदार बनलेले ते एक बुध्दिमान हत्यार असते. मनाचा केवळ हत्यार व चाकर या नात्यानेच वापर करायला हवा.
मन जाणीवे पलीकडील अनुभव ग्रहण करू शकत नाहि. मनाच्या या असमर्थतेमुळे जाणिवे पलीकडिल अनुभवांचा अनुभव घेणारा नसतो, त्यामुळे जाणीवे पलीकडील ज्ञानाचि मनाच्या ज्ञानामध्ये भर पडत नाहि.
विचारांच्या, मनाच्या, अऩुभवांच्या व ज्ञानाच्या अभावी भौतीक शरीर हे प्रत्येक क्षण वेगवेगळेपणाने जगत असते, भुतकाळाला भविष्यकाळाशी जोडणारा मनाचा दुवा तिथे नसतो. गुलाम बनलेले निष्क्रिय मन नवनवीन कल्पना, संकल्पनांचा पुरवठा करत बसत नाहि.
अशा या नैसर्गिक अवस्थेमधिल जिवनामध्ये आनंद नसतो, करमणुक नसते, नवीन ध्येय नसतात, नव्या आशा आकांक्षा नसतात. जिवन अतिशय साधे झालेले असते. मला खरेच समजत नाहि अशा साध्यासुध्या आयुष्याच्या मागे लोक का धावत असतात.
निर्भय पणा व संपुर्ण एकाग्रतेमुळे काहिहि नविन शिकु शकतो वा प्राप्त करू शकतो परंतु ती मागणीच नाहिशी झालेली असते. आशा आकांक्षा नसल्यामुळे नैराश्य सुध्दा नसते.
नैसर्गिक अवस्थेमध्ये ध्यानावस्था सहज प्राप्त होत असते त्यासाठि काहि करावे लागत नाहि, ध्यानासाठि बसावे लागत नाहि. ध्यानाअवस्था प्राप्त होण्यासाठी ध्यान करावे लागत नाहि, ध्यान करून ध्यानावस्था प्राप्त होत नसते. ध्यानसाधना करायला हवी या साधकांच्या विचारांमुळे ध्यान, गुरू, ध्यानकेंद्रे यांचा बाजार निर्माण केला गेला आहे. खरेतर ध्यानाचि संकल्पना व त्यासाठिच्या साधना आपणास ध्यानावस्थेमध्ये प्रवेश करण्या पासुन रोखत असतात.
आपण ज्याला आपले अस्तित्व समजत असतो ते केवळ विचारांचे व माहितीचा जुनाट सांगाडा असतो. आपल्या मधिल या जुनाट सांगाड्याचे आपण प्राणापलीकडे जतन करत असतो. जोपर्यंत आपण हा जुनाट सांगाडा मोडुन टाकुन देत नाहि तोपर्यंत आपण आपल्यामध्ये शांतता निर्माण करू शकणार नाहि.
माझ्याशी वैयक्तीक नातेसंबंध प्रस्थापित होणे अशक्य आहे कारण माझ्यासाठी सर्व नातेसंबंध सारखे आहेत. माझे अस्तीत्व सर्वत्वाशी एकरूप झालेले आहे. माझे आयुष्य एका एका क्षणांचे झाले आहे, त्याला दिशा नाहि, कोणतेहि ध्येय नाहि, काहि साध्य करावयाचे नाहि. जोपर्यंत माझ्या आसपास हालचाल आहे तोपर्यंत माझ्या आतमध्ये हालचाल होत असते अन्यथा माझ्या आयुष्यामध्ये फक्त शांतता आहे. शांतता हि मनाचि अवस्था नव्हे. आपण अंतर्यामी त्याचवेळि शांत होऊ शकतो ज्यावेळी आपली सर्व बाह्य कर्मे थंडावलेली असतात.
No comments:
Post a Comment