Sunday, April 08, 2018

ऊंबरठा

जगभरामधिल बहुतेक सर्व संस्कृती मध्ये विवाहानंतर स्त्रीस सासरी जावे लागते. माहेरच्यांच्या दृष्टिने परक्याचे धन तर सासरच्यांच्या दृष्टिने बाहेरून आलेली, अशा स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये किती तडजोडि कराव्या लागत असतील याचि पुरूष वर्गाला जाणिव असणे कमीच असणार परंतु स्त्रीवर्गाने हे सर्वस्वी मान्य का केले असावे? 

आजच्या दृष्टिने स्त्रीने सासरी जावे हा रिवाज बनलेला आहे त्यामुळे त्याचे कोणास काहि वाटत नसावे. परंतु ज्यावेळी हि प्रथा सुरू झाली असेल त्यावेळी याबाबत नक्किच काहितरी संघर्ष झाला असणार त्याशिवाय एक वर्ग सरसकट दुसऱ्या वर्गाचि गुलामी पत्करणार नाहि. 

निसर्गामध्ये ईतर कोणताहि प्राणि विवाह करून रहात नाहि वा आयुष्यभर एकत्र राहत नाहित कारण निसर्गाला तोचतोचपणा, एकसुरी जगणे मान्य नाहि. निसर्ग हा विविधतेचा भोक्ता आहे. गंमत म्हणुन नव्हे तर केवळ प्रजोत्पादनासाठि दोन जिव एकत्र येतात, मादि पिलांना जन्म देते, पिले मोठि होताच, सर्व स्वतंत्र व वेगवेगळे होतात. आयुष्यभराचे कसलेहि बंधन वा जबाबदाऱ्या नसतात. कारणपरत्वे तात्पुरते एकत्र येणे व कारण संपताच स्वतंत्र होणे हा निसर्गाचा सहज व साधासोपा नियम आहे. 

निसर्गाचाच एक भाग असलेला मनुष्य प्राणि यास अपवाद का झाला? मानवजातीच्या ऊत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये मानवास विचार करता येऊ लागला, विचारांमुळे मन निर्माण झाले, मनामुळे सुखाचि लालसा निर्माण झाली व एकदा प्राप्त झालेले सुख परत परत हवेसे वाटु लागले यातुनच सुख देणाऱ्या वस्तुंचा संग्रह करण्याचि वृत्ती निर्माण झाली. संग्रहित केलेल्या वस्तुंच्या संरक्षणाचि व्यवस्था निर्माण केली गेली. 

Survival of the fittest, जो जिव समर्थ आहे तो टिकुन राहतो हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपली पुढिल पिढि सशक्त निर्माण होणे हा प्रत्येक प्राण्यांच्या कळपाच्या जिवंत राहण्याच्या दृष्टिने अनिवार्य असते. यासाठि कळपातील मादि प्रजोत्पादनासाठि कळपामधिल धडधाकट नराचे सहाय्य घेत असते तो तिचा पुर्वीचा मुलगा असला तरी. नितीमत्ता वगैरे निसर्गामध्ये नसते गरज असते ति फक्त स्वसंरक्षण व प्रजोत्पादनाचि.

आदिम मानवामध्ये फक्त प्रजोत्पादनासाठि एकत्र येणारे स्त्री पुरूष नंतर प्रगत अवस्थेमध्ये मनाने निर्माण केलेल्या सुखांच्या म्हणजे प्रेमाच्या बंधनामध्ये अडकु लागले. स्त्री हि निसर्गतःच अबला आहे, ति एकटि सुरक्षित राहु शकत नाहि. याचा फायदा घेत पुरूष हा स्त्रीस आपणास सुख देणारी एक भोगवस्तु समजु लागला. बळी तो कानपिळी प्रमाणे रावणासारख्या कामपिपासुपासुन सिता सारख्या स्त्रियाहि पिडित होऊ लागल्या यासाठि जमीन जायदाद सांभाळण्यासाठि जसे कायदे झाले त्याप्रमाणे स्त्रीयांना सांभाळण्यासाठि विवाह संस्था निर्माण केली गेली. विवाहापुर्वी पित्याने व विवाहानंतर पतीने स्त्रीयांना सांभाळण्याचि जबाबदारी घातली गेली. पुर्वी लहान वयातच मुलीचे लग्न ऊरकावयाचे कारण पिता व पति यांशिवाय ति ईतरत्र कोठेहि सुरक्षित नाहि. एका जोडिदाराबरोबर आयुष्यभर राहणे नैसर्गिक नसल्यामुळे कौटुंबिक संस्कार वा संस्कृतीच्या बाह्य दडपणाशिवाय काहि अपवाद वगळता असे विवाह टिकणे अशक्य असते. आणि जर बाह्य दबावामुळे आणि असमाधानाने जर दोघे एकत्र राहत असतील तर तोहि विवाह नाहि. 

आजकाल प्रगत समाजामध्ये स्त्री स्वतंत्र आहे, ति स्वतःचे संरक्षण करू शकते, स्वतःचे भरणपोषण करू शकते, स्वतःचा जोडिदार निवडु शकते. म्हणजे पुर्वीचिच नैसर्गिक अवस्था परंतु आधुनिक ढंगामध्ये परत येत आहे. विवाह बंधनामध्ये न अडकता आपले जिवन आपल्या स्वतंत्र विचाराने जगणाऱ्या निना गुप्ता, सुश्मिता सेन सारख्या अनेक स्त्रीया आपणाकडेहि आहेत. परंतु विवाहसंस्थेच्या संरक्षीत जिवनाचा आधार घेऊन स्त्रीने अथवा पुरूषाने विवाहबाह्य संबंध ठेवणे म्हणजे स्वातंत्र्य नसुन तो व्यभिचारच आहे व तो कोणत्याहि प्रगत वा अप्रगत समाजात मान्य नाहि. 

No comments: