विश्वाचि रचना झाल्यानंतर पृथ्वीतलावर अनेक नैसर्गिक घडामोडिंमधुन सजीव निर्मिती झाली. सजिव निर्मितीमागे कोणाचाहि कोणताहि ऊद्देष नाहि, ती फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया होती. सजिवांमधिल मानव प्राण्याने संवादासाठि वेगवेगळ्या आवाजांमधुन भाषेचि निर्मिती केली. भाषेमुळे मानव विचार करू लागला व विचार लक्षात ठेऊ लागला. पिढि दर पिढि हे विचार अधिकाधिक ऊन्नत होऊ लागले व ऊपजिविका व स्वसंरक्षण यापलीकडे जाऊन त्याने विज्ञान, संस्कृती, धर्म, अध्यात्म, साहित्य, कला, खेळ आदि वेगवेगळी क्षेत्रे निर्माण केली. ऊन्नत विचारांमुळे मानवाने स्वतःस निसर्गापासुन वेगळे व श्रेष्ठ बनविले व तो सुखदुःखांच्या कधिहि न संपणाऱ्या मायाजालामध्ये अधिकाधिक अडकु लागला.
आजकाल जगभरचे बुध्दिमंत आपल्या बुध्दीला वाव मिळण्यासाठी नविन संधिच्या शोधात ज्याप्रमाणे अमेरिकेकडे धाव घेत असतात त्याप्रमाणे साधारणपणे ३ ते ४ हजार वर्षापुर्वी युरोप, आफ्रिका व आशिया खंडामधिल बुध्दिमंत मध्य पुर्व आशिया मधिल ईराण मध्ये एकत्रीत येत असत व वेगवेगळ्या विचारांचि देवाणघेवाण होत असे. यामधुन पर्शियन व वैदिक या एकाच ज्ञानाच्या दोन संस्कृती निर्माण झाल्या. या दोन्हि संस्कृती एकाच विचारांच्या होत्या, त्या एकाच ठिकाणि म्हणजे ईराण मध्ये निर्माण झाल्या व त्यांचा नंतर भारत, युरोप, अरबस्तान, आफ्रिका व तिथुन नंतर सर्व जगभर प्रसार झाला. ज्या विचारांना धनाश्रय व राजाश्रय मिळाला त्यांचा प्रसार जास्त झाला व ज्यांना तसा आश्रय मिळाला नाहि व स्थानीक शक्तिंचा विरोध झाला त्या अस्तंगत झाल्या. या संस्कृतींच्या विचारांमधुन वा त्यांच्या विरोधि विचारांमधुन नंतर वेगवेगळे प्रेषीत निर्माण झाले. प्रेषितांनी काळानुरूप नवनवीन समाज कायदे निर्माण केले आणि त्यांच्या अनुयायांनी त्या कायद्यांचे संप्रदाय निर्माण केले, संप्रदायांचा रूपांतरण धर्मामध्ये झाले.
धार्मिक व्यवस्था निर्माण होण्यापुर्वी जगभर वेगवेगळ्या वंशाचे राजे राज्य करीत असत. सुसंस्कृत व प्रस्थापित राज्यावर बाहेरील रानटि टोळ्या आक्रमण करीत व नंतर ते त्या समाजाचे एक भाग बनुन रहात. परत दुसरी रानटि टोळीचे आक्रमण होई व परत समाजामध्ये सरमिसळ होत असे. असे सतत वर्षानुवर्षे चाललेले असे. नाईल व सिंधु नद्यां दरम्यान अशा नवनवीन वसाहती व राजांचे ऊदयअस्त होत असत व हि भुमि भविष्यकालीन जागतीक धर्मांचि एक प्रयोगशाळा बनली गेली होती.
मध्य पुर्व आशियामध्ये पर्शियन म्हणजेच ईराणियन साम्राज्य होते. ईराणियन्स म्हणजेच आर्यन्स होत. ईराणि साम्राज्यामध्ये बाहमन वा वाहमन (Kai Bahman or -Wahman) या नावाचा एक महान सम्राट झाला होता. पारशी अवेस्था या धर्मग्रंथामध्ये त्याचा ऊल्लेख Vohu Manah म्हणजे चांगल्या मनाचा राजा असाहि आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये त्याचा ऊल्लेख विष्णुंचे वामन अवतार व परशुराम अवताराशी खुपच साधर्म्य आहे.
बाहमन चे वडिल Esfandiar यांचा Rostam या राजाने वध केला होता त्याचा बदला घेण्यासाठि बाहमन याने रुस्तमचा वध केला, रूस्तमचे वडिल झाल यांचा वध केला, रुस्तमच्या भावांचा वध केला. रुस्तमच्या मुली काश्मीरमध्ये होत्या त्यांचाही त्याने वध केला. भारतामध्ये येऊन त्याने रूस्तुमच्या Faramarz या मुलाचा वध केला होता. रुस्तमच्या पुर्वजांच्या कबरीसुध्दा बाहमनने ऊध्वस्त केल्या होत्या. यावरून परशुरामाने केलेल्या क्षत्रीय राजांच्या हत्यांचि आठवण येते. पर्शिया मध्ये पुर्वी परशु म्हणजे कुऱ्हाडिंचा युध्दशस्त्र म्हणुन वापर होत असे. भटक्या दरवेशींचे परशु हेच हत्यार असे. भारताच्या पश्चिमेकडे परशुरामाचि मंदिरे सापडतात याचे कारण ईराण व अरबस्तान मधुन बाहमनी वंशीय लोक येऊन पश्चिम व दक्षिण भारतामध्ये स्थायिक झाले होते.
मध्यपुर्व आशिया मध्ये नंतर बाहमनी वंशीय राजे झोरास्ट्रीयन म्हणजे पारशी धर्मीय बनले. भारतामध्ये त्याचि पुनरावर्ती ब्राम्हण धर्मामध्ये झाली. त्यांनी (पारशी परशुराम) भारतामधिल क्षत्रीय राजांचा पराभव करून त्यांचे वर्चस्व कमी करून स्वतः सर्वश्रेष्ठ झाले व त्याप्रमाणे वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली गेली. ईराणचा पारशी धर्म व भारतामधिल ब्राम्हण धर्मीयांमध्ये गोपालन, अग्नीपुजा, सोमरस, होमहवन, जानवे, वेद - अवेस्था ग्रंथ, देवांचि नावे आदि बरेचसे साम्य आहे. वेद व अवेस्ता या धर्मग्रंथामधिल विचार सारखेच आहेत.
मध्यपुर्व आशिया मध्ये बाहमनी पारशी धर्माविरूध्द अब्राहमीक ज्यु, ख्रिस्ती, मुस्लीम धर्म निर्माण होऊन तिथुन बाहमनी पारशी धर्म हद्दपार केला गेला. भारतामध्येहि बाहमनी ब्राम्हण धर्माच्या वर्णाश्रम आचरणा विरूध्द एतद्देशीय बौध्द, जैन, शैव, शिख धर्म निर्माण झाले. भारतामध्ये मात्र गुप्त राजांच्या काळामध्ये ब्राम्हण धर्मास राजाश्रय व धनाश्रय मिळाला व त्यांनी वेगवेगळ्या देवतांच्या मुर्तीपुजा व त्यांचि मंदिर निर्मिती करून भारतभर धार्मिक वातावरण निर्माण केले. ब्राम्हण वेदांतींनी बौध्दांचे मोठ्या प्रमाणावर परत धर्मांतरं केले. सिंधु नदीवरून ब्राम्हण धर्मास भारतामध्ये हिंदु धर्म हे नाव पडले गेले व ईंग्रजांनी जनगणने दरम्यान त्यावर शिक्कामोर्तब करून टाकले.
भारतामध्ये मुघलांच्या अगोदर अनेक मुस्लीम सुलतान राज्य करीत असत त्यामधिल एक होते बाहमनी सुलतान. हे बाहमनी सुलतान ईस्लामी झाल्यानंतर सुध्दा स्वतःस ईराणच्या पुर्वीच्या बाहमन या सम्राटाचे वंशज मानण्यात धन्यता मानत असत.
गायत्री व गोमाता यांचे मुळसुध्दा पर्शियन आहे. पारशी धर्माच्या अवेस्ता धर्मग्रंथा नुसार गायोमार्ट हा त्यांचा आदिगुरू आहे ज्याने त्यांच्या अहुरा माजदा या ईश्वराची आराधना सुरू केली. ग्रीक समाज धरतीमातेला गैया म्हणतात. मश्य व मश्याना या प्रथम दंपत्ती पासुन मानव वंशाचि सुरूवात झाली असे ते मानतात ज्यांस भारतामध्ये मस्त्यावतार असे संबोधले जाते. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, परशुराम, वामन हे दैवी अवतार पर्शियन धरतीवरील आहेत तर नंतरचे राम, कृष्ण, बुध्द या भारतीय महाविरांना अवतारांचा दर्जा दिला गेला.
अतिरिक्त व अनावश्यक विचारांमुळे बुध्दिचे वैभव वाढत गेले व बुध्दिमत्तेच्या फापटपसाऱ्या मधुन आधुनिक संस्कृती, धर्मांचे व विज्ञानाचे अवडंबर वाढत गेले व मुळचि नैसर्गिक जीवनशैली मानव हरवुन बसला. विज्ञानामुळे धर्माचे पितळ ऊघडे पडत चालले आहे परंतु त्यामधुन चंगळवाद जोपासला जात आहे. पहिला काटा काढण्यासाठि दुसऱ्या काट्याचा आधार घ्यावा लागतो परंतु त्याने जखम भरली न जाता ति अधिकच चिघळत जाते याचे भान रहायला हवे.