Sunday, February 25, 2018

दुःख नको असेल तर...



जोपर्यंत मनुष्याला सुख हवे असते तोपर्यंत ते प्राप्त करण्यासाठी त्याचे विचारचक्र व तदनुसार कर्म सतत चाललेले असते. विचार व कर्म मनुष्याला संसारामध्ये बांधुन ठेवत असतात. सुखांच्या लालसेने संसारामध्ये राबणाऱ्या मनुष्याला सतत दुःखांचाच सामना करावा लागत असतो. अवतारी पुरूष असो, साधुसंत असोत वा गर्भश्रीमंत असो सर्वांना दुःखांचा सामना करावा लागत असतो. बुध्दिमान व विचारी मनुष्यजन्माला दुःख हे मोफत वाटले जात असते. दुःखामुळे विचारी मनुष्य त्या दुःखांच्या मुळाशी जाऊन त्यांचा समुळ बिमोड करू शकतो. 

सांसारीक सुखांच्या वासनेमधुन मनुष्याला बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे सुखाचा पाठलाग बंद करणे. हे अशक्यप्राय असल्यामुळे या संसारसुखांचा जिथुन ऊगम होतो अशा ईश्वरीय शक्तिचि साधना करण्यासाठी मनाला ग्रंथ, गुरू, मंत्र यांच्या स्वाधिन करावे लागते. मन जसजसे साधनेमध्ये रमु लागते तसतसे ते संसार सुखांपासुन निवृत्त होऊ लागते. मन जेव्हा पुर्णपणे संसार सुखांपासुन निवृत्त होते तेव्हा ते परत संसाराकडे ढुंकुनहि पहात नाहि. मनुष्याच्या गरजा अतिशय कमी असतात परंतु वासनांना अंत नसतो. 

या संसारमार्गाच्या प्रवृत्तीपासुन निवृत्त होण्यासाठी त्याच ईश्वरास शरण जायला हवे जिथुन या संसार वृक्षाचि मुळे निघाली आहेत व केवळ त्यालाच शरण गेलेले सत्पुरूष परत या संसारामध्ये येत नाहित. - #ज्ञानेश्वरी १५:४

ततः पदं तत्परिमार्गितव्य यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी।। #गिता १५:४ ||

जिस परमपुरुषसे इस मायारचित संसारवृक्षका विस्तार हुआ है, उस परमपदको शरणागत होकर खोजना चाहिये अर्थात् जानना चाहिये कि जिस परमपदमें पहुँचे हुए पुरुष फिर संसारमें नहीं लौटते -- पुनर्जन्म ग्रहण नहीं करते।  - आदि #शंकराचार्य

Singleminded devotion which consists of ceaselessly thinking of or meditating on the Supreme Being is the sure means of attaining Selfrealisation. Supreme Being Who is 'Existence Knowledge Bliss Absolute' is the goal. Taking sole refuge in the Primeval Purusha is the means to know or realise that supreme goal going whither the wise do not return again to this world of death. - Swami #Sivanand