Monday, May 24, 2021

परिवर्तन

कितीही सामाजिक क्रांत्या झाल्या तरी मानव समाज फक्त एका संकल्पना मधून दुसऱ्या काल्पनिक संकल्पना मध्ये ढकलला जात असतो. मानव समाजामध्ये कोणताही आमूलाग्र बदल बाहेरील बदलाने होत नसतो. बाहेरून आदिवासी समाज असो किंवा आधुनिक उच्च शिक्षित समाज असो सर्वजण आतमधून तितकेच स्वार्थी, राग, लोभ, मत्सर बाळगणारे असतात. 

आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये परिवर्तन झाले तरच समाजामध्ये परिवर्तन होवू शकते. समाजमन आणि आपले मन एकमेकांशी घट्ट जुळलेले असते 


आपल्या आतमध्ये परिवर्तन कसे होवू शकेल?


आपण आपल्या स्मृतीमध्ये जसा संपूर्ण मानवजातीचा इतिहास भरून ठेवलेला असतो तसाच आपण आपले कुळ, आपला धर्म, जात, संप्रदाय, देश, भाषा आदींचा स्वाभिमान सुद्धा जपत असतो. यातून आपली स्वतःची एक वैयक्तिक वैचारिक भूमिका बनलेली असते. अशाच वैचारिक भूमिका इतरांच्या बनलेल्या असतात. अगदी नवरा बायको सुद्धा त्यांच्या वैयक्तिक वैचारिक भूमिका जपत असतात. आणि कोणत्याही दोन वैचारिक भूमिका मध्ये संघर्ष हा अटळ असतो. यामुळेच आपले कुटुंब असो किंवा देश असोत प्रत्येकामध्ये संघर्ष होत राहतात. या संघर्षामुळे प्रत्येक मनामध्ये वितुष्ट, कलह आणि त्यामधून दुःख निर्माण होत राहते. त्यामध्ये आपण धर्म, राजकारण, अध्यात्म, खेळ अशा अनेक इतर विषयांची भर घालत असतो. 


आपला मेंदू आणि त्यामध्ये निर्माण होणारे विचार हे आपल्या शरीराच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी निसर्गाने दिलेले असतात. परंतु कलह, संघर्ष, मनोरंजन इत्यादी अनावश्यक विचारांनी आपण सतत विचार करीत असतो आणि तेव्हढा जास्त वेळ मेंदूचा दुरुपयोग होत असतो. यामुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो, विचार भरकटले जातात परिणामी निर्माण होणाऱ्या नैराश्य आदि मानसिक विकारामुळे आपण आपले खरे जीवन जगणं विसरून जातो.


यावर उपाय म्हणून आपण मन शांत करण्याच्या साधना करू लागतो. कोणत्या साधना कराव्यात, त्या कशा कराव्यात, त्याने काय होईल इत्यादी विचार सुरू होतात. म्हणजे जुन्या विचारांना शांत करण्यासाठी नवीन विचार सुरू होतात !!!


मग विचारांना कसे बंद करता येतील?


जेव्हा आपण शांत बसतो, कशावरही लक्ष ठेवत नसतो, मनाला कोठेही केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत नाही जेव्हा मनात कोणताही विचार नाही तेव्हा आपण आपल्या आसपास काय चालले आहे हे स्वच्छपणे पाहु शकतो, सर्वकाही ऐकू शकतो. एरव्ही अवांतर विचारांमुळे आपल्या आसपास काय चालले आहे याकडे आपले लक्ष लागत नसते. 


मनाला असे काही क्षण शांत करणे, स्थिर करणे यासाठी कोणतीही साधना करावी लागत नाही. फक्त शक्य होईल तेव्हा मनाला आपण जे काही करीत आहोत त्याजागी आणण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे आता या क्षणी काय चालले आहे त्याच्या फक्त जाणिवेत राहण्याचा सतत प्रयत्न करीत राहायचे. भूतकाळात काय घडले होते किंवा भविष्यकाळात काय होईल याचे विचार येवू द्यायचे नाहीत. 


सतत भटकत राहणाऱ्या विचारांना, मनाला अशा प्रकारे अधूनमधून अटकाव केल्याने त्यांचा मूलभूत चौफेर उधळण्याचा स्वभाव नाहीसा होईल आणि आपणास खरे जीवन समजू लागेल. खऱ्या जीवनातील खरे सौंदर्य, खरे प्रेम अपेक्षा न करता उमजू लागेल. काहीच अवांतर विचार नसताना जे घडत जाते त्यांना विचारात पकडता येत नाही. 


Have you ever sat very silently, not with your attention fixed on anything, not making an effort to concentrate, but with the mind very quiet, really still? Then you hear everything, don't you? 


You hear the far off noises as well as those that are nearer and those that are very close by, the immediate sounds—which means really that you are listening to everything. 


Your mind is not confined to one narrow little channel. If you can listen in this way, listen with ease, without strain, you will find an extraordinary change taking place within you, a change that comes without your volition, without your asking; and in that change there is great beauty and depth of insight. - J Krishnamurti