आपणा सर्वांस आपले शरीर व मन यांचा नित्य अनुभव येत असतो. त्या पलीकडिल आत्मा व परमात्मा यांचा अनुभव आपणास कदापिहि येत नाहि. कारण कि ते अनुभव घेणारे साक्षी वा त्याहीपलिकडील निर्गुण व निराकार तत्व आहेत असे आपले शास्त्र सांगते. काया, वाचा, मने जे जे अनुभवास येते ते आत्मतत्व नाहि हे ऩिश्चित आहे. जे आत्मतत्व अनुभवास येत नाहि ते अनुभव घेण्यासाठि वा ईतर कोणत्याहि कारणास्तव आकारास येणे शक्य नाहि. म्हणजे आत्मतत्व अाहे असेहि म्हणता येत नाहि वा ते नसावे असेहि म्हणता येणार नाहि. आत्मतत्व अनुभवास येत नाहि असे असताना त्याबद्दल काहि बोलणे वा लिहिणे कोणासहि शक्य नाहि. परंतु जर ते असेल तर ते आपल्या अनुभवाच्या व कल्पनेच्याही पलीकडे असेल अर्थात ज्याला आपण सध्या आत्मतत्व वा परमात्म तत्व असे समजत आहोत वा त्यांचे अंश आहेत असे समजत आहोत ते सर्व केवळ संकल्पनांचे अवडंबर आहेत, त्यामध्ये सत्यांश यत्किंचीतहि नाहि.
शास्त्र असेहि सांगते कि आपल्या स्थुल शरिरा मध्ये सुक्ष्म शरीर आहे. मन, चित्त, बुध्दि व अहंकार यांचे मिळुन सुक्ष्म शरीर बनते. परंतु ते वेगवेगळे नसुन मनाचि विविध रूपे आहेत. मन हे विचारांचे पुंजके आहे. मनन करणाऱ्या विचारांना मन, चिंतन करणाऱ्या विचारांना चित्त, निर्णय करणाऱ्या विचारांना बुध्दि तर मीपणाच्या विचारांना अहंकार असे विचारांना त्यांच्या भुमिकेवरून स्वरूप प्राप्त झालेले आहे.
विचार जर अशी बेमालुम पणे विविध रूपे घेऊ शकत असेल तर कदाचित या विचारांनीच आत्मा व परमात्म्याचि रूपे घेऊन आपणास झुलवत ठेवले नसेल कशावरून. आपले मन सांगेल तेच आपण खातो व पचवितो तर मनास नावडते असणारे पदार्थ आपल्या पचनी पडत नाहित. मन हेच आपले खाद्य, पेय, कपडे वगैरे निवडत असते आणि मनाने निवडलेल्या वस्तु शरीरास वापराव्या लागतात.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: |
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् || १५:१४ ||
It is I who take the form of the fire of digestion in the stomachs of all living beings, and combine with the incoming and outgoing breaths, to digest and assimilate the four kinds of foods.
