Sunday, March 04, 2018

संत तुकारामांच्या सदेह वैकुंठ गमनाचे रहस्य


आपण भक्तजण ईश्वर स्वर्गामध्ये आहे असे समजतो. ईश्वराच्या परमधामास कोणि वैकुंठ म्हणतात तर कोणि कैलास म्हणतात. ईश्वराचे हे परमधाम स्वयंप्रकाशी आहे तिथे प्रकाशासाठि चंद्र, सुर्य, अग्नी आदि माया जगतामधिल पंच महाभुतांचि आवश्यकता नसते. खरेतर ईश्वर हा निर्गुण निराकार स्वरूपाचा आहे, तो सर्वत्र आहे, त्याच्या विना रिता ठाव नाहि. सर्वव्यापि ईश्वराचे केवळ एखादे ठिकाण असु शकत नाहि. त्यामुळे तो वैकुंठामध्ये, कैलासावर वा स्वर्गामध्ये आहे असे म्हणणे हे रुपकात्मक आहे. पुराण कालापासुन पुराणिकांनी सामान्य मनुष्यास ईश्वराविषयी माहिती सांगण्यासाठि गोष्टिरूप पुराणकथा तयार केल्या. या सर्व पुराणकथा या कपोकल्पित व केवळ ईश्वरीय शक्तीच्या निर्देशासाठि वापरल्या जातात. साधनेच्या सुरूवातीस या कथांचा श्रध्देसाठि ऊपयोग होतो परंतु जसजशी साधना परिपक्व होऊ लागते त्याप्रमाणे साधक गोष्टिंमधुन तत्वज्ञानाकडे वळु लागतो. ईश्वरीय ज्ञान हे आकारामध्ये नाहि, ते सर्व अनुभवांच्या पलीकडील आहे. साधकास येणारे सर्व अनुभव हे मनाशी निगडीत असतात. जोपर्यंत मन आहे (आशा, आकांक्षा) तोपर्यंत अनुभव येत राहतात, मन निर्मन झाल्यानंतर अद्वैत अवस्थेमध्ये सर्व काहि शुन्य होते. या अवस्थेमध्ये सुख नसते, दुःख नसते, आनंदहि नसतो, परमानंदहि नसतो. काहि अनुभव आहे असे म्हणणे म्हणजे मनाच्या अस्तित्वाचे लक्षण होय. 

संत तुकारामांनी अशी अद्वैत स्थीती (वैकुंठ) जिवंतपणि (सदेह) प्राप्त केली होती. त्यांच्या साधनेचा मार्ग हा आकाशमार्गे गुप्तपंथे (विहंगम - विमान) असा होता. साधनेचे पिपिलका - मुंगीचा व विहंगम - पक्षांचा असे दोन मार्ग त्यांच्या गतीनुसार शास्त्रामध्ये सांगीतले आहेत. 

ईश्वराच्या परमधामास सुर्य, चंद्र वा अग्नी प्रकाशीत करत नाहित. अशा ईश्वराच्या परमधामास गेलेला परत संसारामध्ये परतुन येत नाहि. - #ज्ञानेश्वरी १५:६

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम || गिता १५:६ ||

उस तेजोमय धामको यानी परमपदको सूर्य प्रकाशित नहीं कर सकता। वैसे हि चन्द्रमा और  अग्नि भी प्रकाशित नहीं कर सकता। ऊस परमधामको पाकर मनुष्य पीछे नहीं लौटते वह मेरा परमधाम है। 

Neither doth the sun illumine there nor the moon, nor the fire; having gone thither they return not; that is My supreme abode.