आपले विचार व आपली माहिती हि अज्ञानी व असत्य का आहे?
आपल्या अज्ञानामुळे आपणास ज्ञान प्राप्त होत नाही. अज्ञान म्हणजे आपल्या मेंदूच्या स्मृतिमध्ये साठवली गेलेली अज्ञानमुलक माहिती होय. सूर्य नित्य, सदोदित आहे परंतु त्याचे कधी कधी दर्शन होत नाही याचा दोष सूर्याचा नाही तर त्याच्या व आपल्या मध्ये येणाऱ्या रात्र, ढग आदि अडथळ्यांचा आहे. आपल्या कडील माहितीचा संग्रह हेच ज्ञान प्राप्तीस अडथळा करत असते. आपल्या माहिती मध्ये आपली वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहिती बरोबर इतर ग्रंथ, संप्रदाय, संत, तत्वज्ञानी, राजकारण, समाजकारण या सर्वांचे विचार असतात. हे सर्व विचार म्हणजे ज्ञान नसून ते अज्ञान आहे आणि या अज्ञानी विचारांमुळे आपणास ज्ञान प्राप्त होत नाही. हे केवळ ऐकून समजणे वेगळे आणि तेच सत्य आहे याची खात्री पटणे वेगळे आहे.
विचार व माहिती हे दोन्हीही भूतकाळातील आहेत, भविष्य काळामध्ये त्यावर आधारित कृती अपेक्षित असते म्हणून ते अर्धवट आहेत. या अर्धवट माहिती व विचारांमुळे आपल्या स्वतःमध्ये व समाजामध्ये सर्वत्र दुही, वितुष्ट, दुफळी, युद्धे होत असतात. आपली मने कलुशीत होण्यास ही अर्धवट माहिती कारणीभूत आहे. मनामधील कलुशित माहितीमुळे मेंदू सुद्धा दूषित होतो. दूषित मेंदूमधील प्रदूषित विचारांचे पूर्वग्रह दूषित अज्ञानाचे नमुने (pattern) तयार होवू लागले की संपूर्ण मानवी समाज सतत एकमेकांशी विरोध करीत राहतो.
मानवी स्वभावातील या विरोधिभासाचे कारणे बाहेर शोधली जातात. अनेक विद्वान त्यावर विद्वत्तापूर्ण लिखाण करतात, भाषणे देतात, पक्ष काढतात, सत्ता हस्तगत करतात परंतु मानवी समस्यांचे निराकरण होत नाहीच, समाजाचे एकत्रीकरण होत नाही, उलट ते सर्व fascisam कडे वाटचाल करत राहतात.
मानवी समस्यांचे मूळ आपले विचार आहेत. विचार आपल्या अस्तित्वाचे विभाजन करतात. एक विचार कर्ता बनून दुसऱ्या विचारांचे कर्मात रूपांतरण करून कर्ता व कर्म वेगळे आहेत असे भासविले जाते. कर्ता नेहमी आता मी काय कर्म करत आहे व भविष्यात काय कर्म करायचे आहे यांची नेहमी तुलना करत असतो. आपल्या अस्तित्व मधील हे प्राथमिक विभाजन हेच नंतर आपल्या कुटुंबातील, समाजातील दुहीचे कारण बनते, हे समजणे म्हणजे realisation आहे जे विचारांवर आधारीत नसून part of intelligence आहे. हि विवेक बुद्धी अज्ञानाचा नाश करते व आपणास ज्ञानाशी एकरूप करते.

No comments:
Post a Comment