ई.स. पुर्व सुमारे ३००० वर्षापुर्वी पृथ्वीतलावर स्वर्ग साकारला होता. कारण त्या काळि कोणताहि देव, देश वा धर्म अस्तित्वात नव्हता. त्यावेळी आताच्या ईराण, ईजिप्त पासुन ते भारता मधिल महाराष्ट्रा पर्यंत पसरलेल्या सिंधु नदिच्या संस्कृतीमध्ये हस्तकला, धातुशास्त्र, अनेक मजली भाजक्या विटांचि घरे, कालवे, स्नानगृहे, सांडपाणि वाहुन नेण्याचि व्यवस्था, रूंद रस्त्यांचे आखीव रेखीव शेकडो शहरे अस्तित्वात होती. राजसत्ते शिवाय व्यापार ऊदिम जोरात चालत असे याचा अर्थ सर्वत्र शांततापुर्ण सहजिवन होते.
नंतर धर्म व राजसत्ता ऊदयास आल्या व त्या दोघांच्या एकत्रीत शक्तिने अनेक शतके सामान्य जनतेवर जुलमी राज्य केले होते. १८व्या शतकामध्ये अनेक वैज्ञानीक शोधांमुळे औद्योगिक क्रांती सामान्यांच्या मदतीला आली. औद्योगिक क्रांतीमुळे नविन संघटित मजदुर वर्ग निर्माण झाला व त्यांनी ऊठाव करून प्रथम जुलमी राजसत्ता ऊलथवुन टाकल्या, लोकशाहि शासन आणले व नंतर धर्मसत्तेला राजकारणा पासुन वेगळे करून निधर्मी लोकशाहि शासन यंत्रणा निर्माण केल्या.
जगभरामधिल असंख्य क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांचे मोल देऊन लोकसत्ताक शासन आणल्या नंतर सुध्दा १९४७ साली पाकिस्तान हे जगामधिल पहिले मुस्लीम राष्ट्र निर्माण झाले.धर्माच्या अतिरेकि वापराने ते आज अतिरेकि राष्ट्र झाले आहे. हा अनुभव आपल्या शेजारी असताना सुध्दा भारतामधिल राजकारणी सत्तेसाठि परत धर्माचा वापर करत आहेत. जो धर्म कधि निर्माण झाला नाहि, ज्याचि कोणि स्थापना केली नाहि, ज्याचा कोणि संस्थापक नाहि, ज्याचा अधिकृत ग्रंथ नाहि, नियम नियमावली नाहित त्यावर आधारित पोकळ राष्ट्रवाद बनविला गेला आहे व त्याचा साम, दाम, दंड, भेद नितीने देश विदेशामध्ये प्रचार व प्रसार चालु आहे.
धर्म निर्मितीचा खालील ईतिहास पाहिल्या नंतर धर्म हि एक अफुचि गोळि आहे हे आपल्या लक्षात येते.
ई.स.पुर्व २००० वर्षापुर्वी ईजिप्त मध्ये कोणत्याहि धर्मा शिवाय पिरॅमिड व त्याबद्दलचा ग्रंथ अस्तित्वात होते.
ई.स.पुर्व १५०० वर्षापुर्वी कोणताहि धर्म अस्तित्वात नसताना भारतामध्ये पहिला वेद म्हणजे ऋग्वेद जन्माला आला होता.
धर्म व राजसत्तेशिवाय सिंधु संस्कृती सारख्या एका फार मोठ्या भुभागावर साहित्य, संस्कृती, कलाकृती, व्यापार वगैरे मानवास शांततापुर्वक जिवन जगण्यास आवश्यक असणारे सर्व काहि चरम अवस्थेमध्ये नैसर्गिकरित्या प्राप्त होत होते.
कालांतराने अतिशय हुशार परंतु स्वार्थी मनुष्यांनी धर्म व राज्ये स्थापन केली. सामान्य जनतेला देवा धर्माच्या श्रध्दांचे व देशप्रेमाचे डोस पाजुन त्यांना स्वतःचे गुलाम बनविले. त्यामुळे लढण्यासाठि व मजुरीसाठि स्वस्तामध्ये प्रचंड प्रमाणात जन शक्ति ऊपलब्ध होत असे.
मानवतावादि तत्वचिंतक धर्म प्रेषितांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांचे संप्रदाय निर्माण केले. नंतर संप्रदायांच्या वर्तणुकिसाठि धर्मग्रंथ लिहिले गेले. राज्यकर्त्यांनी संप्रदायांच्या सामुहिक लोकशक्तिचा फायदा राजकारणासाठि केला तर धर्मगुरूंनी राज्यसत्तेच्या शक्तिचा ऊपयोग धर्मप्रसारासाठि करून घेतला.
नंतर अस्तित्वात आलेले सर्व धर्म हे ज्या तत्वज्ञानावर आधारित आहेत ती वैदिक ऊपनिषदे हि ई.स.पु्र्व १२०० वर्षापुर्वी निर्माण झाली होती. मध्य आशिया मधुन हे ज्ञान सर्वदुर पसरले होते. जगभरामधिल तत्ववेत्त्यांच्या विचारसरणिंचा ऊपनिषदिक ज्ञान हा पाया आहे.
ई.स.पु्र्व ८०० वर्षापुर्वीच्या छांदोग्य ऊपनिषदामध्ये श्रीकृष्णाचा देवकिपुत्र व घोर अंगिरसांचा शिष्य असा ऊल्लेख आहे. भगवद गिता या काळामध्ये लिहिली गेली. परंतु हिंदु वा ईतर धर्म नव्हते.
ई.स.पु्र्व ८०० वर्षापुर्वी पार्श्वनाथ हे जैन तिर्थंकर होऊन गेले. परंतु जैन धर्म महाविरा नंतर खऱ्या अर्थाने सुरूवात झाला.
ई.स.पु्र्व ६०० वर्षापुर्वी ईराण मध्ये पारशी धर्म अस्तित्वात आला.
ई.स.पु्र्व ५०० वर्षापुर्वी महाविर जैन व गौतम बुध्द होऊन गेले.
ई.स.पु्र्व २५० वर्षापुर्वी सम्राट अशोकाने बौध्द धर्म स्विकारला व त्याचा सर्वदुर प्रसार केला.
ई.स.पु्र्व ३० वर्षापुर्वी येशु ख्रिस्ताचा जन्म.
येशुच्या निधना नंतर ई.स.३५० साली बायबल लिहिले गेले व ई.स.३८० साली रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्मास राजमान्यता दिली.
ई.स.५७० - ६३२ पैगंबर मोहम्मद यांचा कालावधि. मोहम्मद यांच्या मृत्युनंतर ई.स. ६५० साली कुराण लिहिले गेले.
ई.स. ७८८-८२० हा आदि शंकराचार्य यांचा कालखंड. त्यांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला. त्यांच्या विद्वत्तेमुळे बौध्द धर्माचा भारतामधिल प्रभाव खुप कमी झाला. या काळापासुन जैन व बौध्द व्यतिरिक्त भारतीयांचा हिंदु असा ऊल्लेख परदेशी करू लागले. हिंदु धर्म स्थापन झाला नाहि तर ती ईतर धर्माची एक प्रतिक्रिया आहे.
ई.स.१६९९ साली गुरू गोविंदसिंग यांनी शिखांचा खालसा निर्माण केला.
संदर्भ:
https://en.m.wikipedia.org/wiki/Indus_Valley_Civilisation
https://en.m.wikipedia.org/wiki/Timeline_of_religion

No comments:
Post a Comment