आपण कोण आहोत, सभोवतालचे विश्व काय आहे व हे सर्व कोणि व कशासाठी बनविले आहे हे प्रश्न ज्यावेळी आपणास पडायला लागतात त्यावेळी आपली ब्रम्हजिज्ञासा (कुंडलीनी) जागृत झाली असे समजावे. वेदांतात यालाच अथातो ब्रम्हजिज्ञासा असे संबोधले आहे.
पृथ्वीवरील सर्व संस्कृतींनी, धर्मांनी, गुरूंनी अशी शिकवण सर्व मानवजातीस दिलेली आहे कि ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे व तोच विश्वाचे पालन पोषण करत आहे. पिढि दर पिढि तेच ज्ञान सर्वत्र पसरविले जाते व आपण शहानिशा न करता केवळ श्रध्देने त्यावर विश्वास ठेवतो.
वैज्ञानिक संशोधनातुन असे सिध्द झाले आहे कि एका छोट्याशा अणुचा प्रचंड मोठा महास्फोट होऊन (big bang theory) हे विश्व निर्माण झाले. विश्वामधिल अगणित तारे व ग्रहांपैकि पृथ्वी हा एक ग्रह आहे. या ग्रहावर अनेक अपघातांमधुन जिवसृष्टिचि निर्मिती झाली आहे. लाखो वर्षांच्या जडण घडणि मधुन श्रेष्ठ पेशींचे संवर्धन व निकृष्ट पेशींचा विनाश होत अनेक प्रकारचे जैव वैविध्य पृथ्वीतलावर निर्माण झाले आहे. महास्फोटाच्या आवाजाचे ध्वनी व प्रतिध्वनी आजहि अवकाशामध्ये कंपनांच्या स्वरूपामध्ये निनादत आहेत. हि कंपने अवकाशाप्रमाणेच पृथ्वीवरील प्रत्येक अणुरेणुमध्येहि होत आहेत. या कंपनांच्या माध्यमातून सजिव आपल्या अस्तित्वासाठि व प्रजोत्पादनासाठि विचार निर्मिती करत असतात. सजिवांमधिल दोन पायांवर चालणाऱ्या मानव प्राण्याने आपल्या बुध्दिमत्तेच्या जिवावर या विचारांमधुन संवादासाठि भाषा विकसीत केली. भाषा विकसीत झाल्याने विचारांना स्मृतीमध्ये ठेवणे सहज शक्य झाले, यातुन नवनविन संकल्पना अस्तित्वात येऊ लागल्या. संकल्पनांना ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले. या काल्पनीक ज्ञानामधुन त्याने ईश्वराचि व धर्माचि निर्मिती केली व आपल्याच बुध्दिचा तो गुलाम बनला. हजारो वर्षांच्या संकल्पनांना चित्रे, मुर्ती, मंदिरे, ग्रंथ यामधुन मुर्त स्वरूप प्राप्त झाले व आपल्याच कल्पनांना तो सत्य समजु लागला व त्यांचा त्याने अध्यात्माच्या नावाने नविन शोधहि सुरू केला.
अध्यात्मिक साधने दरम्यान साधक आपल्या शरीरास व मनास तपश्चर्येच्या नावाखाली अत्यंतीक यातना देतो. खडतर साधनेच्या परिणाम स्वरूप मेंदु कडे जाणाऱ्या प्राणवायु व रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामुळे साधकाचा मेंदु काहिकाळ बधिर होतो. मेंदुविरहित अवस्थेमधिल अतींद्रिय अनुभव (out of body experiences) त्याला सुखावतात व त्याला स्वतःविषयी विशेष अभिमान होऊ लागतो व तो अधिकाधिक अध्यात्मिक, परोपकारी, विवेकि, संन्यस्त होऊ लागतो.
शरीर व मेंदु विरहित अवस्थेत आपण विचार करू शकतो, अनुभव घेऊ शकतो व ते स्मृतीतहि ठेऊ शकतो हे मानस शास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. अपघात वा गंभीर आजारा दरम्यान अनेक रूग्णांचा मेंदु निकामी होतो व ते बेशुध्द होतात. (Near death experience) सामान्य अवस्थेमध्ये मेंदु निकामी असताना विचार करणे वा कोणताहि अनुभव घेणे शक्य होत नाहि. परंतु बेशुध्द अवस्थेमधिल अनेक रूग्णांनी ते बेशुध्द असताना त्यांनी शरीराबाहेर येऊन काय पाहिले हे नंतर व्यवस्थीत सांगितलेले आहे. काहींनी त्यांच्या पुर्वजन्मा मधिल घटना सांगितलेल्या आहेत, काहींचा पुर्वजन्मी एखादा अवयव कापला गेला असेल तर याजन्मी तो अवयव अपंग होऊन त्यांनी जन्म घेतलेला आहे हे सुध्दा सिध्द झालेले आहे.
आपण जे काहि विचार करत असतो त्यामुळे आपल्या शरीरामधिल व आसपासच्या वातावरणामधिल कंपनामध्ये बदल होत असतो व ती कंपने आपल्या आयुष्यामध्ये त्यानुरूप बदल घडवीत असतात. विचारांशी निगडित कंपने हि आसमंतात जिवंत राहतात व एक शरीर नादुरूस्त झाल्यानंतर दुसऱ्या शरिराच्या संपर्कामध्ये येऊन परत आपला कार्यभाग चालु ठेवतात.
कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स हि अगदि अलीकडिल संशोधने आहेत फार पुर्वी ती अस्तित्वातहि नव्हती त्याप्रमाणे संपुर्ण विश्वाच्या कालगणनेच्या तुलनेमध्ये आधुनिक मनुष्य प्राणि हा खुप अलीकडिल आहे. कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स मध्ये एक हार्डवेअर रूपि सांगाडा असतो व दुसरे सॉफ्टवेअर रूपि प्रोगॅम्स व अॅप्स असतात. हार्डवेअर निकामी झाले तरी प्रोगॅम्स व अॅप्सचा बॅकअप दुसऱ्या हार्डवेअर मध्ये रिस्टोअर करून आपण तेच काम दुसऱ्या हार्डवेअर मधुन जसेच्या तसे करून घेतो. आपले शरीर हे एक हार्डवेअर आहे व मन हे एक सॉफ्टवेअर आहे. एक शरीर निकामी झाल्यानंतर मन दुसऱ्या नवीन शरीराचा आधार घेते. मनामध्ये कुटुंब, समाज, जात, धर्म, समाजकारण, राजकारण, संस्कृती, देश, स्वर्ग, देवता, आत्मा, परमात्मा, प्रेम, भक्ति, अध्यात्म आदि वेगवेगळे गेम्स लोड केलेले असतात. प्रत्येक जण तल्लीन होऊन आपापल्या आवडि प्रमाणे एकामागुन एक हे खेळ खेळत असतात.
(डॉ ब्रुस ग्रेसन यांचे मेंदु विरहित अवस्थेतील संशोधन जाणुन घेण्यासाठि हा व्हिडियो पाहु शकता: https://youtu.be/2aWM95RuMqU )

No comments:
Post a Comment