Thursday, June 28, 2018

अध्यात्मिक गुलामी


आपले सर्वांचे अध्यात्मिक ज्ञान हे अध्यात्मिक ग्रंथामधुन आलेले असते. या ज्ञानामध्ये आपले स्वतःचे असे काहिहि नसते. आपण ज्यांना गुरू समजत असतो त्यांनी सुध्दा गिता - ज्ञानेश्वरी तोंडपाठ केलेली असते. ज्ञानेश्वरी हि संस्कृत गितेचे प्राकृत रूपांतरण आहे. गिता हे ऊपनिषदांचे सार आहे. ऊपनिषदे हि प्राचिन ऋषि मुनींचे विचार आहेत. कोणताहि विचार मग तो अध्यात्मिक असो वा सांसारीक असो तो मनाचा आविष्कार असतो. मन व विचार हे अध्यात्मिक असु शकत नाहित. निर्गुण, निराकार, निर्विकार, निर्विचार अवस्थेमध्ये विचार व भावनांचा पुर्णपणे अभाव असतो. त्या अवस्थेचे आकलन होत नसते, त्या अवस्थेचे वर्णन करता येत नाहि व ति अवस्था नेमकि कशाने प्राप्त होते याचे नेमके ऊत्तर कोणाकडेहि नाहि. असे असताना अनेक संप्रदाय व अमेक गुरू परंपरा ऊभ्या राहिल्या आहेत. हे सर्वजण कोणत्या तरी महात्म्याचा वा ग्रंथांच्या आधारावर चाललेल्या असतात. ज्यांना अध्यात्माचे काहिच कळत नसते अशांना हे आपले शिष्य बनवतात. संप्रदायाचा जास्तीत जास्त प्रसार करणे हाच एकमेव सर्वांचा ऊद्देश असतो. अध्यात्मिक साधने एैवजी आश्रमाचा संसार सांभाळण्यासाठि शिष्यांना दिवस रात्र राबविले जाते.

आपण गुरू वा मंत्र अशा कोणावर तरी श्रध्दा ठेवलेली असते व त्या श्रध्देमधुन बाहेर पडण्यासाठि फार मोठ्या धैर्याचि आवश्यकता लागते. अध्यात्मामध्ये जोपर्यंत आपण कोणाचा तरी आधार घेत असतो तोपर्यंत आपण स्वतंत्र नसतो. जोपर्यंत आपण स्वतः स्वतंत्र नसतो व दुसऱ्यांच्या विचारांवर मनन, चिंतन व ध्यान करत असतो तोपर्यंत आपण त्या विचारांमध्ये अडकलेलो असतो. संप्रदायांचे गुलाम असो वा गुरूंचे गुलाम असो वा विचारांचे गुलाम असो, गुलामांना स्वातंत्र्याचि पहाट लाभत नाहि. सर्वप्रकारचि गुलामी झुगारून दिल्याशिवाय स्वातंत्र्याचा सुर्य ऊगवत नाहि.

जोपर्यंत आपणास धर्म, संप्रदाय, गुरू, ग्रंथ यांच्या मध्ये सत्याचा भास होत असतो तोपर्यंत आपण त्यांचे गुलाम बनुन रहात असतो. जर आपणास खरोखर सत्याचा ध्यास असेल तर आपणास या सर्व अधिकारी सत्ता स्थानांवरील ठेवलेला विश्वास व श्रध्दा काढावी लागेल. हे सर्व स्वतः चुकलेले आहेत व आपली दिशाभुल करत आहेत याबद्दल आपली खात्री व्हायला हवी. ज्यावेळी आपण या सर्वांच्या गुलामी मधुन मुक्त होऊ, स्वतंत्र होऊ त्यावेळी आपल्या सर्व चुकिच्या संकल्पना, चुकिचा शोध, चुकिचि ऊद्दिष्टे कोसळुन पडतील, आपले विचार व आपले मन आपले गुलाम होईल. असे जेव्हा होईल तेव्हा आपण त्या सत्याचे केवळ दार्शनिक नव्हे तर सत्यच होऊन राहु.  - यु जी कृष्णमुर्ती

No comments:

Post a Comment