Wednesday, April 04, 2018

अध्यात्मिक जागृती



नियतीचा फटकारा म्हणा अथवा ईश्वराचि कृपा म्हणा अगदि अनपेक्षीतरित्या मला अशी एक अद्भुत व वेगळी अवस्था प्राप्त झाली. त्यावेळे पासुन मी स्वत: एका संपूर्ण नवीन अशा जीवनशैलीच्या जगामध्ये जगत आहे. पूर्वी मी देवास प्रार्थना करायचो कि, 'अरे देवा, तू मला विसरलास कि काय?' आता मी प्रार्थना करतो कि, 'हे देवा, तू मलाच का हे दिलेस? 

या घटनेस मी आत्मसाक्षात्कार असे म्हणणार नाहि कारण आत्मसाक्षात्कार म्हणजे असीम शांतता, कधिहि न संपणाऱ्या अमर्याद अशा स्वर्गीय सुखाचि वा आत्मानंदाचि कल्पना यापुर्वीच्या सर्व आत्मसाक्षात्कारी (!) युगपुरूषांनी करून ठेवलेली आहे. परंतु मला तसे काहिहि प्राप्त झाले नाहि कारण तसे काहिहि नसते. या अवस्थेविषयी काहिहि गुढ अथवा धार्मिक, अध्यात्मिक अवस्थांचा संबंध नाहि. ति एक अतिशय साधारण अशी शारिरीक घटना असते ज्यामध्ये आपले मन संपुर्णपणे संपुष्टात येते, आपली विचार करण्याचि यंत्रणा पुर्णपणे बंद होते. ज्यावेळी ज्यागोष्टिचि आवश्यकता असते ति गोष्ट सहजपणे कोणत्याहि पुर्वविचारांशिवाय होत राहते. आपल्या सर्व संवेदना वासना रहित अशा अतिशय शुध्द स्वरूपामध्ये कार्य करू लागतात, आणि हि विलक्षण नैसर्गिक अवस्था प्राप्त होणे हेच मानवी जिवनाचे साफल्य होय. 

हे कोणतेहि बौद्धिक चातुर्य अथवा अध्यात्मिक आत्मज्ञान नव्हते. हि अवस्था ईतर कोणत्याही व्यक्तीस प्राप्त होऊ शकते त्यासाठि ईश्वर, गुरू किंवा आत्म्याशी देवाण घेवाण करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या घटनेमुळे त्या व्यक्तिच्या वैयक्तीक जिवनामध्ये, त्याच्या आसपासच्या माणसांवर किंवा एकंदरीतच संपुर्ण मानवजातीवर प्रभावी परिणाम होत असतो. पेटलेली ज्योत कधि लपवुन ठेवता येत नाहि. 

हि नैसर्गिक अवस्था प्राप्त करण्याचा कोणताही निश्चित असा मार्ग नाही. ति अवस्था कोणत्याहि गुरू कडुन प्राप्त करता येत नाहि वा कोणत्याहि गुरूस ति दुसऱ्यांना देता येत नाहि. हि अवस्था अतिशय सहज सोप्या आणि अनपेक्षित पद्धतीने प्राप्त होते, त्या अवस्थेविषयी आपण कसलीहि पुर्वकल्पना करू शकत नाहि, खुपच अकल्पनीय अशी ती अवस्था आहे व हेच त्या अवस्थेचे गुपित आहे. - यु जी कृष्णमुर्ती

https://youtu.be/IBaAun6ft8w

No comments:

Post a Comment