Saturday, September 04, 2021

सत्य आकलन कसे होते?


 सत्य आपणास दुसरा कोणी देवू शकत नसतो. ते तुमचे तुम्हीच ओळखायचे असते फक्त ते ओळखण्यासाठी आपल्या मनाची अशी अवस्था असायला हवी की त्याच्यात ते आकलन करण्याची पात्रता असावी. ज्यावेळी मनात विरोध असतो, पूर्वग्रह असतात त्यावेळी मन आकलन करण्यास पात्र नसते. 

आपण आत्ता जे काही करीत असतो तिकडे आपण लक्ष न देता भलत्याच गोष्टींचा सतत विचार करीत असतो. आत्ता जे काही होत आहे त्याची जाणीव असली तर ते समजणे शक्य होते. जे काही होत आहे ते आहे तसे समजून तेव्हाच घेतले जाते जर आपण त्यास विरोध करीत नसू किंवा त्याचे समर्थन करीत नसू किंवा त्यावर टीका करीत नसू किंवा त्याचा गैरअर्थ काढीत नसू. अशी ज्यावेळी मनाची अवस्था होते तेव्हा ते मन विवेकी बनते. जेव्हा आपण त्याचा गैरार्थ काढू, टीका टिप्पणी करू, विरोध करतो तेव्हा त्या वास्तवाचे सत्य समजणे शक्य होत नाही. 


एखादे संशोधन करताना शास्त्रज्ञ ते जे काही आहे त्याचे फक्त अवलोकन करीत असतात. ते कसे असावे किंवा कसे नसावे असा ते अंदाज लावीत बसत नाहीत तसेच आपले आकलन असावे. जर आपण सर्वजण बघताना, ऐकताना, अवलोकन करताना अशी काळजी घेवू की जे जसे आहे ते तसेच त्याच्या फक्त जाणिवेत राहिलो तर सर्व प्रश्न सहज सुटू शकतात. सर्व संघर्ष समाप्त होवू शकतील. जर मी लबाड असेन आणि ते मी कबूल करीत असेन तर सर्व प्रश्न तिथेच निकालात निघतील. आपण जसे आहोत तशी त्याचे प्रत्येकानी कबुली देणे हाच विवेकाचा जन्म असतो, वास्तव परिस्थीती समजण्याची ती सुरुवात असते, त्यातूनच आपली काळाच्या बंधनातून मुक्तता शक्य होणार असते. 


आपण आता यापुढील संवाद मध्ये आपण तेच करणार आहोत. आत्ता जे काही आहे ते तसेच मी आपल्या निदर्शनात आणून देत जाईन, त्याचे माझ्या पूर्वग्रह अनुसार मी अर्थ लावणार नाही, आपण सुद्धा आपल्या पूर्वज्ञाना नुसार ते जे आहे त्याचा अर्थ लावीत बसू नये.


J Krishnamurti,

Introduction,

फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम




No comments:

Post a Comment