Tuesday, January 12, 2021

पुनर्जन्म की मुक्तता


 कृष्णमूर्ती यांची बौद्ध सन्यासी बरोबर पुनर्जन्म, मुक्ती बाबत चर्चा

बौद्ध सन्यासी: सर्व धर्म या ना त्या स्वरुपा मध्ये पुनर्जन्म मानतात. हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञान असे सांगते की जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत स्थूल शरीराच्या मृत्यू नंतर सूक्ष्म तत्वे पुनर्जन्म, पूनार्भव घेतात.

कृष्णमूर्ती: जगातील सर्व मानवांच्या (देश आणि धर्म सह) समस्या सारख्या आहेत कारण सर्वजण एकाच वैचारिक धारणेचे बळी आहेत. त्यामुळे असे म्हणता येते की जग आणि मी हे एकच आहेत. वैयक्तिक धर्म काय सांगतो यापेक्षा संपूर्ण मानव समाजाचा आपण विचार करू या. 

मृत्यू कशाचा होतो? शरीर? शरीराची ओळख (नाम – रूप)? शरीराच्या समस्या यांचा होतो काय?

मानवी जीवनात थोडेसे आनंदाचे क्षण सोडले तर बहुतांश मानवी जीवनाची दुःखाची नदी अखंड वाहत असते. मृत्यूनंतर या मानवी समस्यांचे काय होते? 

दुःखाच्या नदीमध्ये वाहत जाणाऱ्या एखाद्या जिज्ञासुला याची जाणीव होते की यातून बाहेर पडण्याचे सर्व जुने मार्ग नदिमधील आहेत ते आपणास नदिमधून बाहेर पडू देत नाहीत. तो नदीतील सर्व मार्गदर्शकांचे सल्ले बाजूला ठेवतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि तत्क्षणी त्याला ठाव सापडतो, त्याला आता प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचे कारण रहात नाही.

त्या माणसाचा स्वभाव काय असू शकतो? त्याने त्याच्या सर्व संकल्पनांचा, सर्व इच्छांचा अंत केलेला असतो आणि हाच खरा मृत्यू होय. आणि तिथूनच सत्य, ज्ञान, प्रेम, करुणा, विवेक त्याच्या  जीवनात येवू लागतात. जाणीव नेणीव विरहित निरपेक्ष जीवनामध्ये सहजता येते. अशी सहजता नसेल ते ध्यान असू शकतं नाही आणि त्या शिवाय सत्याला काही अर्थ असू शकत नाही.

बौद्ध सन्यासी: हेच खरे बुद्धाचे सती पठ्ठान आहे परंतु जे शिकविले जाते ते हे नव्हे. बुद्धाचे खरे ध्यान शिकविले जात नाही कारण ते समजत नाही.

कृष्णमूर्ती: इतर प्रवाह पतीत त्यातून तत्क्षणी बाहेर पडण्याऐवजी नंतर बघुया म्हणत भावी योजनांच्या कल्पना करीत वाहत राहतात, त्यांना यासाठी वेळ नसतो, इतर काहीजण सांसारिक सुखांच्या मागे धावत राहतात, काहीना तेच आपले नशीब आहे असे वाटते आणि या सर्वांमुळे दुःखाची नदी दुथडी भरून अखंड वाहत राहते. 

https://youtu.be/np57tASzQyc



No comments:

Post a Comment