Meditation हा विषय आपण स्वतःच संशोधन करण्याचा विषय आहे. प्रत्येकाने स्वता: तो शोध घेतला पाहीजे, मार्गदर्शन J.Krishnmurti यानी व भगवान बुद्धाने करुन ठेवलेच आहे पण त्यांच्या शिकवणुकीचा सार काही कुणाच्या लक्षात येत नाही व मग फक्त बुद्धीच्या स्तरावर शब्दश: अर्थ काढले जातात. प्रत्यक्षात practically काही ध्यान घडतच नाही.
प्रथम meditation चा उद्देश आपल्या मनात स्पष्ट झालेला असायला हवा.
मी चा शोध घेणे म्हणजे meditation आहे.
या मीचा शोध घ्यायचा असेल तर मनाचा शोध घ्यावा लागतो कारण मी ची भावना हि मनाशी संबंधीत आहे. मन म्हणजे काय याच्यावर चिंतन केले तर मन हे नाम - रुप स्वरुपाचे आहे असे लक्षात येते. मी शोधायचा असेल तर मन समजुन घ्यावे लागते, मन म्हणजेच consciousness होय. Consciousness हा नेहमी दोन घटकांचा बनलेला असतो व ते दोन घटक असतात अनुभवणारा आणि अनुभव. Consciousness म्हणजे experience - experiencer.
अनुभव व अनुभवणारा यांचे स्वरुप समजुन घेणे, त्यांची कार्यपद्धती समजुन घेणे, त्यांचे स्वाभावीक गुणधर्म समजुन घेणे, त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध समजुन घेणे म्हणजे Real meditation होय.
या अनुभवणारा - अनुभव यासाठी अध्यात्मात नाम - रुप असा शब्द आहे. नाम म्हणजे अनुभवणारा व रुप म्हणजे पंचभुतांचा अनुभव. यालाच इतर अनेक विशेषणे आहेत:
experiencer - experience
द्रष्टा - दृश्य
subject - object
अहम - इदम
अस्मद - युष्मद
म्हणजेच Real meditation चा अर्थ आहे
या experiencer - experience विषयी सतत अखंड प्रतिक्षण वर्तमान क्षणात सजग रहाणे. प्रतिक्षण जिवन जगत असताना या दोघा विषयी आपल्याला सजग रहायचे आहे ही एक कला आहे ही कला आत्मसात करणे म्हणजे Real meditation होय.
आता आपल्याला जिवन जगताना निरनिराळ्या गोष्टीचे अनुभव येत असतात, जे खालील गोष्टींचे असु शकतात,
(१) कायेचे अनुभव
(२) इंद्रियांचे अनुभव
(३) चित्ताचे अनुभव
(४) अनुभवणाऱ्याचा अनुभव
अनुभवणाऱ्या शिवाय अनुभव कधीच अस्तित्वात नसतो व अनुभवाशिवाय अनुभवणारा कधीच अस्तित्वात नसतो. हे प्रथम आपल्याला पक्के माहीत पाहीजे. कारण नाम - रुप म्हणजे experiencer - experience ही joint psycho- physical
Phenomenon आहे. ही joint psycho - physical phenomenon विषयी आपल्याला काहीच फारसे माहीत नसते व या मनो कायीक प्रक्रियेविषयी नीट माहीती नसण्यालाच अविद्या / अज्ञान म्हटले गेले आहे.
प्रत्यक्ष वर्तमानातील क्षणात या experiencer - experience ला जाणणे म्हणजेच Real meditation होय, आता real
meditation अजुन सोपे करुन टाकु
experiencer -experience या दोन गोष्टीसाठी आपण एकच शब्द वापरु experience मग experience म्हणजे काय याचा शोध घेणे म्हणजे real meditation अशी सोपी व सुटसुटीत व्याख्या आपण real meditation ची करु.
ईतक सोप आहे real meditaion, वर्तमानात जो काही अनुभव येत आहे त्या अनुभवाचे वर्तमानात निरीक्षण करत त्या अनुभवाचे संपुर्ण स्वरुप जाणणे म्हणजे real meditation होय.
मला वाटते real meditation चा खरा अर्थ आता सर्वांच्या लक्षात नक्की आला असेल, बस real meditation असे असते. Real meditation काही रहस्यमय बाब नव्हे ती आपल्या जिवनाशी direct संबंधीत असलेली बाब आहे.
असा वर्तमानातील आपल्या जिवनात अनुभवास येणाऱ्या प्रत्येक experience चा समजुन उमजुन निरीक्षण करत आपण शोध घेतला तर आपल्याला experience चा स्वभाव, experience चे प्रकटने व experience चा लय होणे ही प्रक्रिया सतत घडत असल्याचे आपल्याला उमजु लागते.
बाहेर प्रसंग घडतो व अंतरंगात काही तरी अनुभव येतो, जर मनासारखी घटना घडली तर सुखाचा, समाधानाचा, तृप्तीचा अनुभव येतो व मनाविरुद्ध घटना घडली तर दुखाचा, असमाधानाचा, निराशेचा, अतृप्तीचा अनुभव येतो किंवा ती घटना आपल्याशी संबंधीत नसेल तर मग कोणताही सुखाचा वा दुखाचा अनुभव आपल्या अंतरगात उठत नाही, ज्या गोष्टीशी आपले तादात्म्य असते त्याच गोष्टीचे अनुभव सुखदायक वा दुखदायक बनुन अंतरंगात प्रकटतात. जसे जर भारत पाकीस्तानची one day cricket match झाली व भारत हरला तर भारताशी तादात्म्य असल्याने सर्व भारतीयाना दुखाचा व निराशेचा अनुभव येतो व पाकीस्तानी लोकाना सुखाचा व समाधानाचा अनुभव येतो, जितके तादात्म्य अधिक, जितके conditioning अधीक तेव्हढा जास्त तीव्रतेचा अनुभव येत असतो, एखाद्याला जर भारताविषयी खुप जास्त तादात्म्य असेल तर त्याला भारताच्या पराभवाने प्रचंड दुख होत असते व जर एखाद्याचे भारताशी फार तादात्म्य नसेल तर भारताच्या पराभवाने त्याला फार दुख वा निराशा अनुभवाला येत नसते, ही गोष्ट आपण अगदी clearly समजुन घेणे गरजेचे आहे, आता पहा घटना तर एकच घडली की cricket match चा निकाल लागला पण त्या एकाच घटनेने भारतीय मन दुखी झाले तर पाकीस्तानी मन सुखी झाले, आता आपण ही match ची घटना जर एका जपानी माणसाला कळली तर त्याला सुखही होत नाही व दुखही होत नाही कारण त्याला भारताशीही तादात्म्य नाही व पाकीस्तानशी ही तादात्म्य नाही व cricket शी ही तादात्म्य नाही त्यामुळे त्याला कोणताही सुखाचा वा दुखाचा अनुभव येत नाही, सुख वा दुखाचा अनुभव येण्यासाठी आधीचे तादात्म्य वा conditioning वा संस्कार असावे लागतात तरच त्या conditioning नुसार अनुभव येतात हे नीट उमजले तर मग सर्व अनुभवांचे गणीत स्पष्ट होत असते. तसेच हे अनुभव कसे निरास पावतात हेही आपण नीट समजुन घ्यायचे आहे कारण सर्व अनुभवांच्या निरासात सत्य प्रकटन होत असते.
J. Krishnmurti नेहमी म्हणतात if you can end all experiences of conscious, subconscious, unconscious and universal consciosness then in ending of totality of all experiences there is realization of truth. म्हणुन या अनुभवांच्या निरासाचेही गणीत आपण नीट समजुन घ्यायचे आहे या अनुभवां विषयी जर आपण आसक्ती द्वेषाची प्रतिक्रिया केली तर हे अनुभव अधीक बळकट होत असतात व जर या अनुभवाविषयी आपण सजग निर्विकल्प राहीलो तर या अनुभवांची ताकद संपुन जात असते व शेवटी हे अनुभव पुर्णपणे निरास पावत असतात.
J. Krishnmurti म्हणतात, Choiceless awareness is a process of meditation. हा अनुभवांचा निरास आपण एका दृष्टांतानुसार समजुन घेवु.
आपल्या कार ची battery चे उदाहरण आपण घेवु जर कार पुढे चालवली तरी battery charge होते व कार मागे, reverse चालवली तरी battery charge च होते. तुम्ही positive reaction करा की negative reaction करा, battery charge च होते पण जर तुम्ही कार जागेवरच दोन- चार महीने उभी ठेवली तर battery आपोआप discharge होते तसे मन रुपी अनुभव वा अनुभवरुपी संस्कार निरास करण्यासाठी साक्षीभावात स्थीर असलेल्या सजग निर्विकल्प निरीक्षणाची गरज असते असे choiceless observation घडले तर अनुभव निरास पावत असतात जशी battery आपोआप dishcharge होते तसे. ही गोष्ट तुम्हाला नीट समजली तर तुमच्या meditation ला सुरवात झाली म्हणुन समजा. असे आपले नेहमीचे जिवन जगत असताना ज्या घटना आपल्या जिवनात वर्तमानात अनुभवायला येतात त्या सर्व अनुभवां सोबत निर्विकल्प निरीक्षणात स्थीर असणे म्हणजे real meditation.
अशा पद्धतीने समजेतुन साक्षीभावात स्थीर झाल्यास सुख, दुख, चिंता काळजी, भय, क्रोध, greed, desire ईत्यादी सर्व अनुभवांचे गणीत सुटत असते.
अशा पद्धतीने प्रत्येक अनुभवासोबत खालील प्रमाणे contemplation हे सुरु ठवायचे आहे हे contemplation म्हणजे अनुभव समजुन घेणे होय.
आता Real meditation ची theory आपल्याला समजली मग ही समजेची पट्टी आता आपण आपल्या जिवनात येणाऱ्या सुख व दुखाच्या अनुभवाना खाली दिल्याप्रमाणे लावायची आहे, प्रत्येक अनुभव आला की आपण contemplation सुरु ठेवायचे,
experience is past, संस्कार नेहमी भुतकाळातील संस्कार असतो.
experience is conditioning, अनुभव नेहमी पुर्व मान्यता असतो.
experience च्या मुळाशी cause - effect असतो, कार्यकारणभाव असतो.
experience म्हणजे Recycling असते
experience म्हणजे Remoulding असते,
experience एक यांत्रीक घटना आहे.
experience is illusion, अनुभव हा भ्रम असतो.
experience is transient असतो, अनुभव नेहमी अनित्य असतो, नेहमी बदलणारा असतो
experience is joint psycho - physical phenomenon, अनुभव ही मनातील मनोकायीक द्वैत प्रक्रिया आहे.
experience is time process and becoming process, अनुभव हा भुतकाळातील असतो व तो वर्तमानात प्रकटतो व आपण आवड निवडची प्रतिक्रिया केली तर भविष्यकाळाची निर्मिती होते व काळाचे चक्र अखंड कार्यान्वीत रहाते.
आणी सर्वात महत्वाचे व कदाचीत आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे experience is experiencer ही अद्वैत बुद्धीची समज.
ही समज जर आली तर द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होत असते व अद्वैत बुद्धीत खरा choiceless awareness प्रकटत असतो जो समजेतुन प्रकटलेला असतो, हा साक्षीभाव बळजबरीचा काही हेतु धरुन बळजबरीचा साक्षीभाव नसतो या खऱ्या choiceless awareness च्या दिव्य अशा अद्वैत दृष्टीच्या समजेत अनुभवाचा निरास आपोआप घडत असतो. ही experience is experiencer ही समज खरी समज आहे, meditation शिकवणारे सर्व अज्ञानी गुरु शिकवतात की experiencer हा experience पेक्षा भिन्न असतो पण J.Krishnmurti सारखा खरा मार्गदर्शक आपल्या experience is experiencer अशी जगावेगळी समज देवुन आपल्या द्वैत बुद्धीचे परीवर्तन अद्वैत बुद्धीत कसे करतो हे अनुभव घेण्यासारखे आहे. experience असेल तर सोबत experiencer असलाच पाहीजे, experiencer असेल तर सोबत experience असलाच पाहीजे, जेव्हा असतात तेव्हा दोन्ही असतात व जेव्हा नसतात तेव्हा दोन्ही नसतात असे जेव्हा असते तेव्हा ते भिन्न नसतात ते एकच असतात, आता पहा रात्री दोन वाजता जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असतात तेव्हा तुमचे पाचही इंद्रिय झोपलेली असतात, विचार बंद असतात, स्वप्नही नसते, कोणताच experience नसतो तेव्हा experiencer असतो का ? तेव्हा experiencer नसतोच आपण झोपेत कोठे आहोत याचा पत्ताही नसतो, पलंगावर आहोत की गटारीत पडलो आहोत की जंगलात आहोत की मच्छरदाणीत आहोत, जिवंत आहोत की मेलेलो आहोत याचेही भान नसते म्हणुन J.Krishnmurti सांगतात
या नाम रुपात्मक joint psycho - physical phenomenon ची समज येणे हीच गीतेतील दिव्यदृष्टी आहे, ही दिव्यदृष्टी प्रकटली, ही समज आली तर पुढील आत्मज्ञान घटना आपोआप घडते. ही समज ध्यानाची गुरुकिल्ली आहे हे ज्याला ज्याला समजेल व ज्याचे चित्त शुद्ध असेल त्याला ज्ञान झाल्याशिवाय रहाणार नाही याची ग्वाही खरे मार्गदर्शक दोन्ही बाहु उभारुन देत असतात जसे व्यासानी बाहु उभारुन सांगीतले तसे.
सर्व अज्ञानी गुरु मात्र या समजेच्या विरुद्ध शिकवण देवुन अज्ञानी जीवाला कायमचे भवचक्रात अडकवुन ठेवत असतात ही 100% fact आहे.
हे ज्याला उमजेल तो भाग्यवान.
conscious
subconscious
unconscious
universal consciousness
या सर्व स्तरावरील असे हे सर्व संपुर्ण नामरुपात्मक भ्रमाचे अनुभव निरास पावतात तेव्हा नामरुपाचा खेळ ज्या निर्गुण निराकार तत्वाच्या अधीष्ठानावर सुरु असतो त्या निर्गुण निराकार तत्वाची ओळख त्या निर्गुण निराकार तत्वाला होते याला आत्मज्ञान म्हणतात.
यापेक्षा अध्यात्म दुसरे काहीच नाही.