Sunday, October 18, 2020

विचार आणि मन

एका साधक मित्रा बरोबर चर्चा करताना त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की, ब्रम्ह तत्व हे स्वतःस जाणीत नाही, त्याच्या ठायी जाणीव नेणीव नाही. पृथ्वी तलावरील जीवांना काय हवे व काय नको हे त्या तत्वाच्या गावीही नसेल. मग बऱ्याचदा आपणास अज्ञात शक्ती कडून मदत आणि मार्गदर्शन केले जाते असा अनेकांचा अनुभव असतो. हे नेमके कोण करते? की तो योगायोग असतात?

या विषया वर तत्वचींतक श्री विजय पांढरे सरांचे चिंतन ( https://vijaypandhare.blogspot.com/2020/10/blog-post_17.html?m=1 ) वाचण्यात आले आणि J Krishnamurti आणि Dr Bohm यांची चर्चा याच विषयावर ऐकायला मिळाली. ( https://youtu.be/VVTiAw7K-bw ) हा सुद्धा योगायोग नसावा.

श्री पांढरे सरांनी consciousness चे वेगवेगळे स्तर सांगून ते एकमेकांशी कसे संबंधित आहे हे सांगितले.

कृष्णमूर्ती आणि Dr Bohm यांच्या संवादातून अनेक नवीन गोष्टी समजल्या. पूर्वसुरिंचे न ऐकता या दोघांचे का ऐकावे? असा प्रश्न उपस्थित केला जावू शकतो. Dr Bohm हे Einstein बरोबर काम केलेले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या analytical mind ने कृष्णमूर्ती सारख्या दार्शनिका कडून जास्तीत जास्त तत्वांचे निरसन करून घेतले आहेत. दोघांनी एकेक पायरी चढत, एकेक संकल्पना विशद करत सत्याप्रत साधकास ते त्यांच्या सुसंवाद द्वारे घेवून जातात, कोणत्याही धार्मिक श्रद्धांचा आधार न घेता.

या दोघांच्या चर्चेमध्ये असे समजते की, आपला प्रत्येकाचा वैयक्तिक मेंदू हा जन्मतः आपल्या वांशिक जडण घडणी नुसार आणि नंतरच्या बालपना पासूनच्या संस्कारांनी संमोहित झालेला असतो. त्या समोहनानुसर आपला मेंदू विचार करीत असतो, जे विचार आपल्या वरील संस्कार नुसार संकुचित असतात.

या उलट मन हे वैश्विक असते, सर्वत्र असते ज्यामध्ये intelligence, compassion, silence यांचा भरणा असतो. आपला मेंदू आणि आपले संकुचित विचार जोपर्यंत वैयक्तिक, स्वार्थी, संकुचित विचार करणे थांबत नाहीत तोपर्यंत वैश्विक मन आपल्या अंतरंगात प्रवेश करत नाही. 

Silence is the key. अपेक्षा रहित जीवन जगताना वैश्विक मन आपल्या मध्ये अवतरीत होते, त्यामध्ये आपला मी विरघळत जातो आणि आपले स्वार्थी आचार आणि विचार सुद्धा वैश्विक होतात. 

विचार आणि मन यामध्ये फरक करायला हवा. आपल्या मेंदूतील विचार ज्यांना खरेतर अविचार म्हणायला हवेत थांबले की वैश्विक बुद्धिमत्ता, वैश्विक शांती आणि वैश्विक करुणा यांचे संयुक्तिक मन आपल्या अस्तित्वात उतरते आणि आपले जीवन वैश्विक होते. अशा अद्वैत अवस्थेमध्ये दुही नाही, द्वेष नाही, अपेक्षा नाही, चिंता नाही, काळजी नाही, देवाक काळजी अशी नैसर्गिक अवस्था निर्माण होते.

No comments:

Post a Comment