मनुष्य प्राणि हा जागृत अवस्थेमध्ये सतत विचार करीत असतो. जागृत अवस्थेमध्ये मेंदुमधिल न्युरॉन्स हे आसपासच्या स्पंदनांचा त्यांच्या पुर्वानुभवा नुसार अर्थ लावीत असतात. यातुनच विचारांचा जन्म होत असतो. बाह्य स्पंदनांचा लावलेला अर्थ आपल्या स्मृतीमध्ये अनुभव रूपाने साठविला जातो. अनुभवांच्या विचारांपासुन ज्ञान निर्मिती होत असते. मानवी संस्कृतीच्या आदिम कालापासुनचे जे अनुभवांचे विचार आहेत त्यामधुन ज्ञान भांडार विकसीत झालेले आहे. सर्व धर्मग्रंथे हि मानवी अनुभवांच्या विचारांचि फलनिष्पत्ती आहे. देश, काल परत्वे विचारांमध्ये जसजसा फरक पडत जातो तसतसे नवनविन संप्रदाय व त्यांचे नविन ग्रंथ रचले जातात. लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा म्हणुन त्यांना अपौरूषीय, स्वयंभु, ईश्वरीय ज्ञान अशा ऊपमा दिल्या जातात.
विचारांच्या कल्पनांमधुन निर्माण झालेल्या ज्ञानाचा आधार पकडुन, विचारांच्याच साधनेद्वारे मग सत्याचा शोध घेतला जाऊ लागतो. ज्या मनाने ईश्वराच्या संकल्पनेची निर्मिती केली त्याच मनाचा आधार घेऊन ईश्वराचा शोध सुरू होतो व अकस्मात कळुन येते कि हा सर्व मनाचाच खेळ आहे. मन हेच वेदांचा, वेदांताचा व सर्व ज्ञानांचा निर्माता आहे. मन हेच परत त्यानेच निर्माण केलेल्या वेदांचा अर्थ लावीत बसते.
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे, येरांनी वहावा भार माथा |
मनोनिर्मित सांप्रदायिक ग्रंथांचि कितीहि पारायणे केली तरी जोपर्यंत मनाचा खेळ समजत नाहि तोपर्यंत फळ हाती येत नाहि.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् || १५:१५||
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् || १५:१५||
I am seated in the hearts of all living beings, and from Me come memory, knowledge, as well as forgetfulness. I alone am to be known by all the Vedas, am the author of the Vedānt, and the knower of the meaning of the Vedas.

No comments:
Post a Comment