संवादासाठि आवाजाचे भाषेमध्ये रूपांतर करण्यात आदिम मानव यशस्वी झाले. भाषेमुळे विचार व मन अस्तित्वात आले. मनाने मानवी जिवनाच्या विकासा बरोबर श्रध्दा व भावनांच्या मोठमोठ्या कल्पना निर्माण केल्या. भाषेविना शरीर विचार करू शकत नाहि, विचारांविना मनास अस्तित्व प्राप्त होत नाहि. सुख, दुःख, आनंद, शांती या सर्व मनाच्या, विचारांच्या, भाषेच्या कल्पना आहेत. मनाच्या कल्पनां शिवाय शरीर आपले नैसर्गिक जिवन जगु शकते. डॉक्टर असूनही जंगलामध्ये राहणारे आमटे कुटुंबिय सुखी आहेत कि गडगंज संपत्ती असुनहि बँकांचे पैसे बुडवुन देश सोडणारे कोट्याधीश सुखी आहेत? मन हे सतत एैश्वर्याचि नवनविन ऊंचि गाठत असते परंतु ते कधिहि सुखी होत नाहि. मनाच्या वासना व हव्यास या कधिहि तृप्त होत नाहित.
लहानपणी आईवडिलांचे बोट धरून चालावयास शिकणारे मुल मोठे होताच स्वावलंबी होते व आपल्या विश्वामध्ये भराऱ्या मारू लागते. यासाठि त्याला यथावकाश आपल्या आईवडिलांचे बोट सोडावे लागते. आठवा ते अजरामर गीत,
आकाशी झेप घेरे पाखरा, सोडि सोन्याचा पिंजरा....
मुक्त वाहणाऱ्या नदि प्रमाणे आपले नैसर्गिक जिवन असते, तिथे सुख व दुःख या कल्पनांचे बांध नसतात. झाडापासुन पाने, फुले व फळे अलग होताना ना झाडाला दुःख होते व ना झाडाला सोडणाऱ्यांना सुख होते. सतत वाहणे हा सृष्टिधर्म आहे. त्यागेन एक अमृतत्व लभते...
विचारांच्या व मनांच्या श्रध्दांच्या व भावनांच्या विविध संकल्पनांनी मानवी जिवनास ठिकठिकाणी बांध घातले जातात. खळाळत वाहणारा जिवन प्रवाह डबक्या डबक्यामध्ये नासवला, सडवला जातो. अशा कुजक्या जिवन प्रवाहांचे संस्कार व संस्कृतीच्या रितीरिवाजांखाली अवडंबर माजवले जातात. डबक्यांमधिल नाशीवंत जिवन प्रवाहांचि वेगवेगळी नक्षीदार कुंडे नदिच्या प्रवाहाच्या भितीने आपले वेगवेगळे अस्तित्व कसोशीने टिकवुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओबडधोबड खडकाळ दगड गोट्यांच्या व धबधब्यांच्या जिवंत नदि प्रवाहा एैवजी प्रवाहा पासुन वेगळ्या असणाऱ्या नक्षिदार कुंडामधिल जिवन सुरक्षित व सुखी भासणे हेच आपले फार मोठे दुर्दैव असते.
लहानपणी आईवडिलांचे बोट धरून चालावयास शिकणारे मुल मोठे होताच स्वावलंबी होते व आपल्या विश्वामध्ये भराऱ्या मारू लागते. यासाठि त्याला यथावकाश आपल्या आईवडिलांचे बोट सोडावे लागते. आठवा ते अजरामर गीत,
आकाशी झेप घेरे पाखरा, सोडि सोन्याचा पिंजरा....
मुक्त वाहणाऱ्या नदि प्रमाणे आपले नैसर्गिक जिवन असते, तिथे सुख व दुःख या कल्पनांचे बांध नसतात. झाडापासुन पाने, फुले व फळे अलग होताना ना झाडाला दुःख होते व ना झाडाला सोडणाऱ्यांना सुख होते. सतत वाहणे हा सृष्टिधर्म आहे. त्यागेन एक अमृतत्व लभते...
विचारांच्या व मनांच्या श्रध्दांच्या व भावनांच्या विविध संकल्पनांनी मानवी जिवनास ठिकठिकाणी बांध घातले जातात. खळाळत वाहणारा जिवन प्रवाह डबक्या डबक्यामध्ये नासवला, सडवला जातो. अशा कुजक्या जिवन प्रवाहांचे संस्कार व संस्कृतीच्या रितीरिवाजांखाली अवडंबर माजवले जातात. डबक्यांमधिल नाशीवंत जिवन प्रवाहांचि वेगवेगळी नक्षीदार कुंडे नदिच्या प्रवाहाच्या भितीने आपले वेगवेगळे अस्तित्व कसोशीने टिकवुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओबडधोबड खडकाळ दगड गोट्यांच्या व धबधब्यांच्या जिवंत नदि प्रवाहा एैवजी प्रवाहा पासुन वेगळ्या असणाऱ्या नक्षिदार कुंडामधिल जिवन सुरक्षित व सुखी भासणे हेच आपले फार मोठे दुर्दैव असते.
No comments:
Post a Comment