Tuesday, October 30, 2018

मी विचार करतो म्हणून मी आहे

रेने डेकार्टेस (१५९६ - १६५०) हे एक जगप्रसिध्द फ्रेंच तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांना तर्क आणि विज्ञान यांच्या पाश्चात्य विचारांच्या मूलभूत विकासाचे एक तत्वचिंतक म्हणून श्रेय दिले जाते.

त्यांचे तत्त्वज्ञान हे मानवीय अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांच्या संकल्पनांशी बांधले गेले आहे. जे काही आपण अनुभवतो किंवा जे काहि आपण समजतो ते सत्य असतेच असे नाही.

डेकार्ट यांच्या मते शरीर व मन हे एक नसुन स्वतंत्र व
वेगवेगळे आहेत. परंतु मनाच्या अस्तित्वा ईतके शरिराच्या अस्तीत्वास ते किंमत देत नसत. याचे कारण आपले मन हे विश्वामधिल ईतर गोष्टिंप्रमाणेच आपल्या शरीराचेसुध्दा साक्षी असते. मन जसे विश्वाचा अनुभव घेत असते त्याप्रमाणे ते आपल्या शरीराचाहि अनुभव घेत असते.

1663 मध्ये डेस्कार्टेसचे लिखाण पोपने प्रतिबंधित पुस्तकांच्या यादीत टाकले होते, कारण त्याच्या तत्त्वज्ञानात देवाऐवजी तर्क आणि मनास प्राधान्य दिले गेले होते. ज्ञान प्राप्तीसाठि तार्किक मनाच्या केंद्रस्थानाबद्दल त्यांचे स्पष्टीकरण येथे दिले आहे:

मी जेव्हा सत्याच्या शोधात पूर्णपणे स्वतःस झोकुन देण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी अस्तीत्वात असलेल्या सर्व धार्मिक, अध्यात्मिक विचारसरणिंचा पुर्णपणे त्याग केला कारण पुर्वग्रह दुषीत मनाने मी सत्याचा छडा कधिहि लावु शकणार नाहि.
आपली ज्ञानेंद्रिये आपणास फसवत असतात, चुकिचि माहिती सादर करत असतात, हे पाहून मला असे वाटते की ते आपणास जे काही सादर करतात तसे खरोखर विश्व अस्तित्त्वात नसणार. जागेपणि विश्वाचा ज्या विचारांच्या माध्यमातुन आपण अनुभव करत असतो तसेच आपण झोपेमधिल स्वप्नांचा विचारांच्या माध्यमातुन अनुभव करत असतो. स्वप्न हि असत्य असतात हे आपणास माहित आहे. ज्याप्रमाणे झोपेमधिल स्वप्निल विचारांचे विश्व असत्य असते त्याप्रमाणे जागेपणाचे भौतिक विचारांचे जगतसुध्दा असत्य का असु नये?

जेव्हा मी असा विचार करण्याचा प्रयत्न केला की सर्व काहि असत्य आहे, तेव्हा लगेचच मला असे दिसले कि असा विचार करणारे जे साक्षी तत्व म्हणजे जे मन वा आत्मा आहे ते सुध्दा असत्यच असणार. आणि या सत्याचा मला जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा मी असा निष्कर्ष काढला कि, आपण विचार करतो म्हणूनच सर्व काहि सत्य भासते अन्यथा सर्व भ्रम आहे. आणि हे ईतके ठाम व तितकेच प्रकर्षाने मला जाणवले कि त्यासाठी मला कोणत्याही पुराव्याचि गरज द्यावीशी वाटत नाहि. त्यामुळे ज्या सत्याचा मी शोध घेत होतो त्याचे पहिले तत्व म्हणुन मी त्याचा स्वीकार करत आहे.

ज्याला मी ‘मी’ समजत आहे तो एक असा पदार्थ आहे कि ज्याचे संपूर्ण अस्तित्व केवळ आणि केवळ विचारांमुळे आहे. आणि या ‘मी’ ला अस्तित्वासाठि जागेचि आवश्यकता नाहि, तो कोणत्याहि वस्तुशिवाय राहु शकतो, त्याला कोणत्याहि वस्तुंचि आवश्यकता नाहि. तसेच तो शरीराहुन पुर्णतः वेगळा आहे आणि त्याला शरीरा व्यतिरिक्त समजले तर तो सहज लक्षात येण्यासारखा आहे. हे जे विचार करणारे तत्व आहे ते अगदि सुस्पष्ट आहे. तेच विचार करते, शंका घेते, समजुन घेते, कल्पना करते, होकार देते, नकार देते, भावना, प्रेम व्यक्त करते.

जागेपणि आपणास जे अनुभव येत असतात ते शरीराच्या जाणीवेमुळे आपणास सत्य भासत असतात परंतु ते सर्व विचारच आहेत व स्वप्नाप्रमाणे असत्य आहेत. शरीरास येणारे अनुभव हे मनाच्या अंतर्पटलावर ऊमटणाऱ्या जाणीवा, अनुमान, गृहितके आहेत जे अपुर्ण वा चुकिचे असु शकतात.

Sunday, October 28, 2018

आपले विचार हेच आपले अस्तीत्व अाहे


फ्रेंच विचारवंत डेकार्ट यांचे ‘I think therefore I am’ हा विचार पाश्चात्य विचारसरणी व विज्ञानाचा पाया आहे. अपघातामध्ये शरीर व मेंदु निकामी असताना कोमामध्ये गेलेले रूग्ण अनुभव व विचार करतात असे आढळुन आलेले आहे. पृथ्वीतलावर अपघाताने जिवसृष्टि निर्माण झाली व या जिवसृष्टिमधुन मनुष्य प्राणि निर्माण झाला. जिवांच्या ऊत्क्रांतावस्थेमध्ये मनुष्य प्राण्याने आपल्या अफाट बुध्दिमत्तेच्या जिवावर स्वतःचि प्रचंड प्रगती केली व ईतर जिवसृष्टिवर त्याने आपले अधिराज्य स्थापन केले. बुध्दि व स्मरणशक्तिचा मुळ पाया हा मानवी विचार होत.

विचार म्हणजे आपल्या मेंदुमधिल विद्युत रासायनीक आवेगांना आपण दिलेला अर्थ होय. त्यामुळे आपले विचार हे सत्य असतातच असे नाहि. आपण जे विचार करत असतो त्यावर लगेच विश्वास ठेवता कामा नये.

दररोज आपण ७०,००० ते १००,००० ईतके विचार करत असतो. या विचारांमुळे आपल्या सभोवतालच्या घटना, दृश्ये, आवाज, वास यांचे आपण आपल्या पुर्वानुभवाशी संबंधित असा अर्थ लावत असतो. त्यांचा खरा अर्थ लक्षात न घेता आपण त्यांचा आपणास हवा तसा अर्थ करून घेत असतो. आपण त्यांना चांगले, वाईट, धोकादायक, सुरक्षीत, ऊपयोगी, निरूपयोगी असे वर्गीकरण करत असतो.

काहीतरी घटना घडते किंवा काहितरी आठवते किंवा काहीतरी आपणास जाणवते त्यामुळे विचार सुरू होतात. विशिष्ट प्रकारचे विचार विशिष्ट भावनांना प्रवृत्त करत असतात.

मनुष्य प्राणि हा घटनांपेक्षा त्या घटनांचा विपरीत अर्थ लावण्याने जास्त दुःखी होत असतो. घटनांना भावना नसतात, परंतु त्या घटनांना आपण दिलेला अर्थ व त्या घटनांबाबत आपण करत असलेल्या विचारांतुन भावना निर्माण होत असतात.

एखाद्या घटने विषयीचे मुल्यांकन, त्याचा अर्थ व त्याच्याशी निगडीत असलेल्या भावना या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या असतात याचे कारण प्रत्येकांचा पुर्वानुभव, पालनपोषण, कौटुंबिक मुल्ये, धार्मिक श्रध्दा, संस्कार हे वेगवेगळे असतात.

आपला मेंदु हा विचार निर्माण करत नाहि तर बाह्य घटनांचा तो आपल्या परीने अर्थ लावत असतो व त्यानुरूप शरीर कार्य करत असते. मेंदुसहित शरीर हे आपल्या आईवडिलांचि देणगी असते तर त्यांचे शरीर हे त्यांच्या विचारानुरूप बनलेले असते. त्यांच्या केवळ शरीरांचिच नव्हेतर त्यांच्या विचारांचि फलनिष्पत्ती म्हणजे आपले शरीर व आपले विचार होत. प्रत्येकाच्या विचारांचि क्षमता म्हणजे बुध्दिमत्ता हि त्याच्या पुर्वजांच्या विचारांचा व नितीमत्तेचा वारसा असतो.

विचार हे स्वयंचलीत असल्यामुळे ते आपल्या मेंदुमध्ये निरंतर चालु असतात, बरेच विचार आपणास आठवतहि नाहित. तर काहि विचारांचे आपणास व्यसन लागते व ते परत परत येत राहतात. पुनरावर्ती विचारांबाबत आपणास खात्री होऊ लागते. हे पुनरावर्ती विचार नवीन ईच्छांच्या विचारांना जन्म देतात व त्यामधिल काहि विचार अनेक वर्ष आपला पिच्छा सोडत नाहित.

स्वयंचलीत विचारांना थांबवणे अशक्य आहे कारण तेच आपले अस्तित्व आहेत. दुःखद व वाईट विचारांपासुन मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न जरूर करता येतो. स्वयंचलीत विचारांबरोबर वहात असताना काहीतरी असे करावे ज्याने आपण आपल्या स्वयंचलीत विचारांना काहिकाळ थांबवु शकु. प्रत्येकाने आपापल्या शारीरीक व बौध्दिक पात्रतेनुसार व्यायाम, प्राणायाम, योगासने, ध्यान, वाचन, लेखण, कला, संगीत आदि वेगळी वाट चोखाळली कि वेगळा रस्ता व वेगळा मुक्काम आपण गाठु शकतो व आपल्या पुढिल पिढिंचे भवितव्य जास्तीत जास्त सुरक्षीत करू शकतो.