Saturday, February 02, 2019

रोमान्स चा व्यापार


प्रेम हे कळत नाहि, कारण ते मुळात अस्तीत्वातच नाहि. ज्याला तुम्हि प्रेम समजता ते माझ्या सारख्या नायलॉनचे कपडे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या जाहिरातींचा एक बागुलबुवा आहे. आपण जन्मतो एकटे, मरतोहि एकटेच परंतु स्वार्थाने भरलेले हे जग त्याचे काहि भ्रमित नियम आपणावर लादुन आपणास ते वास्तव विसरायला भाग पाडते. - डॉन ड्रेपर. ‘रोमान्स’ च्या रोमांटिक कल्पना या अगदि अलीकडिल काळामधिल आहेत. रोमॅंटिक कादंबऱ्या व चित्रपटांद्वारे या कल्पना रूजविण्यामध्ये व्यावसाईक यशस्वी झाले. झगमगीत कपडे, दागदागिने, साजशृंगाराच्या साहित्यांचि एक फार मोठि नविन बाजारपेठ त्यामधुन ऊभी राहिली. लाखो वर्षांच्या रक्तरंजीत मानवी ईतिहासामध्ये पुर्वी फक्त अन्न व सुरक्षा या दोन गोष्टिंनाच महत्व दिले जात असे. असुरक्षीत वातावरणामध्ये मोठे कुटुंब व आपल्याच लोकांच्या मोठ्या वस्त्या अन्न व सुरक्षेचे कवच देत असत त्यामुळे त्यांच्या निती नियमाविरूध्द जाण्याचा प्रश्न नसे. औद्योगिकरणा नंतर हे दोन प्रश्न बऱ्यापैकि सुसह्य झाले. तरूण तरूणि रोजगारासाठी आपल्या कुटुंब व गावापासुन दुर जाऊ लागले आणि त्यांना अधिक स्वातंत्र्य मिळु लागले. नवनविन कल्पनांच्या प्रेमात पडणारे जिव रोमॅंटिक कल्पनेने हुरळुन जाऊन एकमेकांच्या प्रेमात पडु लागले. रोमान्स विषयीच्या रोमॅंटिक कल्पना हाच बहुतेक प्रेम विवाहांचा प्रमुख दुवा असे. लग्नानंतर कळुन येते कि प्रेम हि खुप चांगली गोष्ट आहे परंतु रोमांस वगैरे सर्व काहि कवि कल्पना आहेत आणि जाहिरातीद्वारा व्यावसायिकांनी त्या आपल्या माथी मारल्या आहेत. वाढलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत संसाराचा गाडा हाकलताना रोमांसचा खुपच कमी ऊपयोग होतो. मग नसणारा रोमांस खुलत ठेवण्यासाठि परत परत शॉपिंग व टुर्सचा भडिमार सतत सुरू ठेवावा लागतो. रोमांसच्या भडीमाराचा ओसर कमी होताच दोन संपुर्णतः वेगळ्या विचारसरणीच्या जिवांनी आयुष्यभर एकत्र राहणे अवघड होऊ लागते व प्राणप्रिय जोडिदारांकडुन चुका होऊ लागतात. ज्याच्यावर जिव ओवाळुन टाकला त्यांच्याकडुन होणारी फसवणुक असहय्य होऊन जाते. दोन जिवांनी एकत्र येणे म्हणजे प्रेम असते हा भ्रम नाहिसा होतो व राहतो तो केवळ सांसारीक व्यवहार. आणि ईतर सर्व व्यवहारांमध्ये जे होते तेच प्रेमाच्या व्यवहारामध्ये होते, विश्वास नसेल तर प्रेमाचा व्यवहार सुध्दा मोडुन पडतो. अनेकदा सुखाच्या अपेक्षेने केलेले प्रेम हे प्राणांतीक दुःखास कारणिभुत ठरते. दुःखी, निरस, कंटाळवाण्या जिवनामधुन मुक्ति मिळविण्यासाठी प्रेम व रोमांस यांनी जगभरातील प्रेमिकांना रोमांचक अनुभव दिले आहेत. परंतु माणसा माणसांच्या नातेसंबंधातील लबाडि, अविश्वास, फसवणुक, स्वार्थी वृत्तींना सुध्दा सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. जिथे अपेक्षा आहेत तिथेच अपेक्षा भंग होत असतो.