Sunday, June 17, 2018

चिरंतन सुखाचे रहस्य


सजीवांना स्वतःचे संरक्षण, संगोपन व प्रजोत्पादन करण्यासाठी विचारांचि गरज असते. मनुष्य सोडुन ईतर सर्व सजीव केवळ त्याच कामासाठि विचारांचि मदत घेतात व स्वतःस अधिक विचारां पासुन अलीप्त ठेवतात. मनुष्य प्राण्याला अधिकाधिक व चिरंतन सुख हवे असते, दुःख कदापिहि नको असते यासाठी तो अधिकाधिक विचार करत बसतो. विचारांनाहि स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असते त्यासाठि विचारांनाहि सातत्य हवे असते. अधिकाधिक सुखांच्या लालसेने मनुष्याने प्रथम देवाचि निर्मिती केली नंतर धर्मांचि निर्मिती केली व त्यानंतर विज्ञानाचि निर्मिती केली. धर्म मार्तंडांनी, अध्यात्मिक गुरूंनी व वैज्ञानीकांनी चिरंतन सुख शक्य आहे असे सांगितले व सर्वजण त्याच्या शोधासाठि अहोरात्र झटत आहेत. मनुष्याला धार्मिक कर्मकांडामध्ये सुख सापडले नाहि म्हणुन काहिंनी अध्यात्माचा मार्ग पकडला तर काहिंनी विज्ञानाचा मार्ग पकडला. दोघांचाहि सतत शोध चालु आहे. अध्यात्मिक गुरूंनी ध्यानसाधना करून काल्पनीक आत्मा व काल्पनीक परमात्म्याचा शोध लावुन स्वत:चि व आपल्या भक्तांचि घोर फसवणुक केली आहे व भविष्यामध्ये हि ते चालुच राहणार आहे. वैज्ञानीकांनी भितीवर मात करण्यासाठी भयंकर अस्त्रे, शस्त्रे व रोबोट बनवुन मानवाच्या विनाशाचि पायाभरणि केली आहे. या दोघांनिहि मनुष्याला कष्ट, मेहनत न करता व नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करत एैषोआरामामध्ये कसे जगायचे यावर आपल्या मोठमोठ्या संस्था ऊभारल्या आहेत. एैषोआरामामध्ये राहणे म्हणजेच सुख अशी त्यांचि जाहिरात करणारे पटवुन देण्यात यशस्वी झालेले आहेत.

मनुष्याला देव, धर्म, धर्म मार्तंड, गुरू व विज्ञान चिरंतन सुख कदापिहि देऊ शकणार नाहित कारण या सर्वांचा पाया स्वार्थी विचार हे आहेत. विचार हे स्वार्थासाठीच निर्माण होतात त्यामुळे त्यामधुन निष्काम कर्म योग साधणे अशक्य आहे. भौतीक सुखाचि अपेक्षा असो वा अध्यात्मिक मुक्तिचि अपेक्षा असो दोन्हि सारखेच आहेत कारण दोन्हिमध्ये अपेक्षा आहेत व अपेक्षा हि स्वार्थीच असते.

निसर्ग हा सतत बदलत असतो, त्याला नित्य नुतन वैविध्य हवे असते. निसर्गामध्ये चिरंतन काहिहि नसतेे. आपल्या सभोवतालचे विश्व आहे तसे म्हणजे त्यामधिल सुखदुःखांसहित स्विकार करायला शिकलो कि स्वार्थी विचार आपणास मुर्ख बनवित नाहित. अधिकाधिक व चिरंतन सुखांचि लालसा दाखविणारे सर्व विचार हे मनुष्य जातीचे शत्रु आहेत याचि खात्री आल्यानंतर चिरंतन सुखांचि आवश्यकता संपुन जाते. सुखांचि अपेक्षा संपल्यानंतर दुःख वाट्यास येत नाहि.

ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ति असो द्यावे समाधान ।।